शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

By admin | Updated: June 29, 2017 02:59 IST

रायगड जिल्ह्याला गेल्या चार दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने, २८ धरणांपैकी रोहे तालुक्यातील सुतारवाडी आणि म्हसळा

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्याला गेल्या चार दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने, २८ धरणांपैकी रोहे तालुक्यातील सुतारवाडी आणि म्हसळा तालुक्यातील पाभरे या धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पाटबंधारे विभागाने या दोन्ही धरणांतून विर्सग सुरू केला आहे. पावसाचा तडाखा असाच कायम राहिल्यास उर्वरित २६ धरणेही धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे.रायगड जिल्ह्यात मान्सून चांगलाच स्थिरावला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पाऊस चांगलाच बरसत आहे. रायगड जिह्यामध्ये लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित २८ धरणे येतात. संततधार पावसामुळे धरणे चांगलीच भरून गेली आहेत. रोहे तालुक्यातील सुतारवाडी आणि म्हसळा तालुक्यातील पाभरे धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सुतारवाडी धरणाची पूर्ण संचय पातळी ही ९३ मीटर आहे. गेल्या २४ तासांमध्ये या भागात ७० मिलीमीटर पाऊस पडला आहे, तर १ जूनपासून आतापर्यंत ७२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे धरणामध्ये २.६६४ दलघमी पाणीसाठा झाला आहे. धरणाने धोक्याची पातळी ओलांडल्याने त्यामधून ५६४.१५७ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे म्हसळा तालुक्यातील पाभरे धरणातून ६२२.२७७ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. धरण परिसरात गेल्या २४ तासांमध्ये ३८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत ८४४ मि.मी. पाऊस पडला आहे. धरणामध्ये आजच्या स्थितीमध्ये १.७८७ दलघमी पाणीसाठा आहे.पावसाचा तडाखा असाच सुरू राहिल्यास उर्वरित २६ धरणांच्या पाणीपातळीत वाढ होऊन, ते धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वेळास येथील समुद्रकिनाऱ्याची धूपलोकमत न्यूज नेटवर्कश्रीवर्धन : समुद्रातील पाण्याला उधाण आल्याने श्रीवर्धन तालुक्यातील किनारी पाण्याची पातळी वाढली आहे. मोठमोठ्या लाटांमुळे तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या वेळास आगर समुद्रकिनारपट्टीची मोठ्या प्रमाणात झीज होत असून, येथील झाडे उन्मळून पडत आहेत. यामुळे या किनाऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम होत असून उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी, पर्यटक व स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.वेळास समुद्रकिनारा शांत असला, तरी भरतीच्या वेळी लाटा झाडाच्या खोडांवर येऊन आदळत असतात. त्यामुळे किनारपट्टीची झीज होऊन झाडे कोलमडून पडण्याच्या घटना घडत आहेत. येथील समुद्रकिनारा हा अतिशय सुंदर असल्याने येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी पाहवयास मिळते. त्यातच समुद्रकिनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक सुरूची झाडे येथील सौंदर्यामध्ये एक वेगळीच भर टाकतात आणि हीच झाडे भविष्यात नष्ट झाली, तर वेळास समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य नष्ट होईल, अशी भीती स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे.सुरू प्रकारची झाडे वाचवणे काळाची गरज असल्याने, या गंभीर घटनेकडे मेरिटाइम बोर्ड, तसेच स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी आणि समुद्राच्या भरतीच्या लाटांनी किनारपट्टीची होणारी धूप थांबवावी, या मागणीसाठी पत्रव्यवहार सुरू असल्याचे सरपंच बाबुराव शिलकर यांनी सांगितले. वेळास समुद्रकिनाऱ्यापासून दोनशे मीटरहून कमी अंतरावर वेळास-आदगाव मार्ग आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशीच उरलेली सुरूची झाडे उन्मळून पडत राहिली तर समुद्राच्या लाटा वेळास-आदगाव मार्गावर येतील.