शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

ऑनलाइन शिक्षणावर प्रश्नचिन्ह; अभ्यासक्रम कमी करून दोन सत्रांत परीक्षा घ्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 01:14 IST

शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सूर

- आविष्कार देसाईअलिबाग : लॉकडाउनमुळे शिक्षण क्षेत्राला लागलेले टाळे उघडण्याची सरकारची मानसिकता विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करणारी आहे. अभ्यासक्रम कमी करून दोनच सत्रांच्या परीक्षा घेण्यात याव्यात, असा एक प्रयोग पुढे येत आहे. मात्र, आॅनलाइन शिक्षण पद्धती हा त्यावरचा एकमेव उपाय नाही, असाही सूर शिक्षण तज्ज्ञांकडून आळवला जात आहे.

कोरोनाने बहुतांश जगाला आपल्या विळख्यात घट्ट पकडले आहे. कोरोनाबाधितांचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा मुकाबला करताना दुसरीकडे रेंगाळलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारने नियमांत शिथिलता आणली आहे. त्यामुळे कंपन्या, छोटेमोठे उद्योग-व्यवसाय, दुकाने, शेती, मत्स्य व्यवसाय यांच्या व्यवहारांना गती प्राप्त होत आहे.

कोरोनाचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रही त्यापासून दूर राहिलेले नाही. मार्च-एप्रिल हा परीक्षांचा हंगाम असतो आणि त्यानंतर उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या जातात. मात्र मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट अधिक गहिरे होत असल्याने देशात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे देशातील सर्वच व्यवहार, कामकाज ठप्प पडले.

शिक्षण क्षेत्रातही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाउन सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. जून महिन्यापासून शाळा सुरु होतात मात्र शैक्षणीक सत्र कधी सुरू होणार याबाबत अद्यापही सरकारने स्पष्ट आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम आहे. कोरोना वाढत असल्याने आम्ही आमच्या पाल्यांना शाळेत कसे पाठवायचे, अशी भीती कायम सतावत आहे; परंतु त्यांच्या शिक्षणाचेही नुकसान झाले नाही पाहिजे, अशी पालकांची मानसिकता असल्याचे दिसून येते.

सरकार आॅनलाइन शिक्षण घेण्याबाबत आग्रह धरत आहे. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाकडे मोबाइल, लॅपटॉप नाहीत; तसेच इंटरनेटची असुविधा आणि विशेष म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये आवश्यक असलेला ह्युमन टच आॅनलाइन शिक्षण पद्धतीत राहणार नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी किती वेळ मोबाइल, लॅपटॉपपुढे बसून राहायचे, हाही प्रश्न आहे. शिवाय त्या अनुषंगाने मुलांना पाठीची, मानेची दुखणी होऊ शकतात.

याच कारणांनी आॅनलाइन शिक्षण पद्धती सुरू करणे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने हिताचे ठरणार नसल्याचे बोलले जाते.जून महिन्यात शाळा सुरू करणे आज शक्य होणार नाही. कारण शाळांच्या प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत, असाही सूर ऐकायला मिळत आहे.

पीटी, चित्रकला, संगीत विषय वगळावेत

कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून ठरलेल्या वेळेनुसारच शाळा सुरू करण्याचा काही शिक्षण संस्थांचा कल आहे. एक दिवस अर्धे विद्यार्थी आणि दुसऱ्या दिवशी अर्धे विद्यार्थी अशा पद्धतीने केल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे शक्य होईल.

अभ्यासक्रम कमी करावा, पीटी, चित्रकला, संगीत, क्राफ्ट असे विषय वगळावेत; जेणेकरून तो वेळ अन्य विषयांसाठी शिक्षकांना शिकवताना उपयोगी पडेल. त्यामुळे वेळापत्रक आपोआप कमी होईल. परीक्षा दोनच सत्रांत घ्याव्यात (सहामाही आणि वार्षिक). तोंडी परीक्षा रद्द कराव्यात, त्यामुळे अधिक वेळ मिळू शकेल.

कोरोना अधिक कालावधीसाठी सर्वत्र राहणार असल्याने कोरोनासोबतच जगावे लागणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने याआधीचजाहीर केलेले आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीसुद्धा हेच सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेताना त्यांचे आरोग्य कसे सुरक्षित राहील याचाही विचार सरकार आणि समाजाला करावा लागणार आहे.

मुलांच्या भवितव्याचा विचार करता शाळा बंद करून चालणार नाही. अद्याप सर्वदूर तंत्रज्ञान पोहोचलेले नाही. त्यामुळे सर्वांना आॅनलाइन शिक्षण देता येईल हा समज साफ चुकीचा आहे. उपस्थिती कमी करून, दिवसातून एकदा अथवा तीन दिवसांतून एकदा शाळा सुरू ठेवता येईल. राष्ट्रहीत म्हणून शिक्षकांनी त्रास सहन करणे गरजेचे आहे.- डॉ. सचिन पाटील, अध्यक्ष,

रिसोर्स सेंटर फॉर ह्युमन डेव्हलपमेंट

१५ जून रोजी शाळा सुरू करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे तेथे शाळा सुरू करणे, जास्त असणाºया ठिकाणी बंद ठेवणे, तर अन्य ठिकाणी सम-विषम पद्धतीने उपस्थिती ठेवून सामाजिक अंतर राखून शाळा सुरू करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र हा अंतिम निर्णय नाही.- भाऊसाहेब थोरात, शिक्षणाधिकारी माध्यमिक

कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शाळा जून महिन्यात सुरू झाल्या तरी मुलांना कोणाच्या जबाबदारीवर पाठवायचे, तर दुसरीकडे शाळेत न गेल्याने त्यांचे नुकसानही होणार आहे. अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने यातून लवकर मार्ग काढावा.- धनंजय कवठेकर, पालक

सरकारने शाळा सुरू करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या बाबतीतील नियमांचे पालन करून शाळा सुरू करणे शक्य आहे. एक दिवशी मुले आणि एक दिवशी मुली या पद्धतीने शाळेत सामाजिक अंतर राखता येईल. तसेच शाळांनी काय शिकविले पाहिजे याचा अभ्यासक्रम दिला पाहिजे. अभ्यासक्रम कमी करावा. महत्त्वाचे विषय ठेवून अन्य विषय वगळण्यात यावेत. त्यामुळे अधिक वेळ शिक्षकांना शिकवण्यासाठी वापरता येईल. आॅनलाइनमुळे प्रश्न अधिक जटिल होतील. - अमर वार्डे, अध्यक्ष, डीकेएटी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षण