शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते डहाणूतील शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:25 IST

कृषी विभागामार्फत फळबाग लागवड योजनेतून चिकू, आंबा या झाडांची लागवड केली. तसेच १० सफेद जामची कलमे लावली. त्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला. या फळबागेत आंतरपीक म्हणून फुलशेती व भाजीपाला लागवडीतून नफा मिळवला.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : डहाणू तालुक्यातील आगर गावातील चंद्रकांत रामचंद्र पाटील हे ४६ वर्षांचे शेतकरी उच्चशिक्षित आहेत. एका खाजगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करताना, त्यांनी सेंद्रिय पद्धतीची शेती सुरू केली. त्यांची पत्नी कीर्तिका या ‘ग्रामीण विकास’ या विषयात पदवीधर असल्याने, त्यांच्या कृषी शिक्षणाचा फायदा होतो. या कुटुंबाने १० वर्षांपूर्वी दोन एकर शेतजमीन खरेदी केली.कृषी विभागामार्फत फळबाग लागवड योजनेतून चिकू, आंबा या झाडांची लागवड केली. तसेच १० सफेद जामची कलमे लावली. त्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला. या फळबागेत आंतरपीक म्हणून फुलशेती व भाजीपाला लागवडीतून नफा मिळवला.शिवाय गांडूळखत, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, कंपोस्ट खत, जीवामृत, दशपर्णी अर्क इत्यादी शेतीपूरक व्यवसायांची जोड दिली. त्यांच्याकडे गीर जातीच्या गायी असून त्यांचे शेण आणि शेतातील गवत व कचऱ्यापासून गांडूळखत तयार केले जाते. कृषी विभागामार्फत २०१६ साली सेंद्रिय शेतीच्या गटशेती योजनेेतून २९ शेतकऱ्यांचा ‘संजीवनी सेंद्रिय शेती गट’ स्थापन झाला. या गटाच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्र सरकारच्या आत्माअंतर्गत संजीवनी सेंद्रिय कृषी उत्पादन गटात खजिनदार या पदावर नियुक्ती झाली.कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र कोसबाडमार्फत प्रशिक्षणातून सेंद्रिय शेतीची माहिती त्यांना झाली. त्याद्वारे विविध प्रकारच्या निविष्ठा तयार करण्यास शिकून सेंद्रिय शेती आणि गांडूळखताचे उत्पादन प्रथम सुरू करायचे ठरवले.कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातून ईसेनिया फेटिडा या जातीची गांडूळ बीजे आणली. त्यांच्याकडे गांडूळखतासाठी जुन्या पद्धतीच्या दोन सिमेंट टाक्या, नवीन पद्धतीने गांडूळखत बनविण्यासाठी चार गांडूळ बॅगा असून इतर गांडूळखत फळझाडांच्या सावलीत तयार केले जाते. शेणखत आणि शेतातील गवत कचरा एकत्र केले जाते. हे सर्व झाडांच्या सावलीत सिमेंटच्या टाकीत टाकून त्यावर पाणी शिंपडून एक महिना ठेवले जाते. त्यामुळे हे मिश्रण अर्धवट कुजते. नंतर हे गांडूळखतासाठी बनवलेल्या टाकीत किंवा बॅगमध्ये टाकून त्यावर दोन ते तीन किलो गांडूळ सोडतात. त्यावर रोज पाणी शिंपडल्याने ओलावा मिळून गांडुळांची संख्या भरपूर वाढून एक ते दीड महिन्यात गांडूळखत तयार होत असल्याचे पाटील सांगतात. खत काढण्यापूर्वी पाणी शिंपडणे थांबवून वरच्या थरातील खत हलक्या हाताने काढले जाते. महिन्याकाठी ७ ते ८ टन या खताचे उत्पादन घेतले जाते. या खताचा उपयोग शेतीसाठी होतोच शिवाय विक्रीतून आर्थिक फायदाही होतो.अर्धा एकर क्षेत्रामध्ये भाजीपाला लागवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने मिरची, टोमॅटो, वांगी आणि वाल ही पिके घेतली जातात. या भाजीपाल्यावर संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने कीड रोग नियंत्रण केले जाते. त्यासाठी विविध सापळे, दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते. जमिनीतीतून जीवामृत आणि गांडूळ पाणी दिले जाते. हा सर्व भाजीपाला स्थानिक बाजारात विकला जातो. भाजीपाल्यासोबत झेंडू व चवळी लागवडही केली जाते. त्यांनी तीन गीर जातीच्या गायी व २० देशी कोंबड्या पाळल्या आहेत. गोमूत्र जीवामृत बनविण्यासाठी वापरले जाते. अंडी व दूध विक्री केली जाते.किडींचे अशाप्रकारे केले जाते नियंत्रणभाजीपाला पिकामध्ये रस शोषक किडी येत असतात. त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी ३० याप्रमाणे लावतात. हिरव्या आळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे एकरात ५ ते ६ लावले जातात. तसेच १० ते १२ ओळींनंतर एक ओळ झेंडूची लावली जाते. ही फुले नियमित तोडली जातात. त्यामुळे भाजीपाल्यामध्ये हिरव्या अळीची अंडी आणि अळी अवस्था फुलांसोबत शेतातून बाहेर जाऊन किडीच्या प्रादुर्भाव रोखता येतो.