शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते डहाणूतील शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:25 IST

कृषी विभागामार्फत फळबाग लागवड योजनेतून चिकू, आंबा या झाडांची लागवड केली. तसेच १० सफेद जामची कलमे लावली. त्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला. या फळबागेत आंतरपीक म्हणून फुलशेती व भाजीपाला लागवडीतून नफा मिळवला.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : डहाणू तालुक्यातील आगर गावातील चंद्रकांत रामचंद्र पाटील हे ४६ वर्षांचे शेतकरी उच्चशिक्षित आहेत. एका खाजगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करताना, त्यांनी सेंद्रिय पद्धतीची शेती सुरू केली. त्यांची पत्नी कीर्तिका या ‘ग्रामीण विकास’ या विषयात पदवीधर असल्याने, त्यांच्या कृषी शिक्षणाचा फायदा होतो. या कुटुंबाने १० वर्षांपूर्वी दोन एकर शेतजमीन खरेदी केली.कृषी विभागामार्फत फळबाग लागवड योजनेतून चिकू, आंबा या झाडांची लागवड केली. तसेच १० सफेद जामची कलमे लावली. त्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला. या फळबागेत आंतरपीक म्हणून फुलशेती व भाजीपाला लागवडीतून नफा मिळवला.शिवाय गांडूळखत, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, कंपोस्ट खत, जीवामृत, दशपर्णी अर्क इत्यादी शेतीपूरक व्यवसायांची जोड दिली. त्यांच्याकडे गीर जातीच्या गायी असून त्यांचे शेण आणि शेतातील गवत व कचऱ्यापासून गांडूळखत तयार केले जाते. कृषी विभागामार्फत २०१६ साली सेंद्रिय शेतीच्या गटशेती योजनेेतून २९ शेतकऱ्यांचा ‘संजीवनी सेंद्रिय शेती गट’ स्थापन झाला. या गटाच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्र सरकारच्या आत्माअंतर्गत संजीवनी सेंद्रिय कृषी उत्पादन गटात खजिनदार या पदावर नियुक्ती झाली.कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र कोसबाडमार्फत प्रशिक्षणातून सेंद्रिय शेतीची माहिती त्यांना झाली. त्याद्वारे विविध प्रकारच्या निविष्ठा तयार करण्यास शिकून सेंद्रिय शेती आणि गांडूळखताचे उत्पादन प्रथम सुरू करायचे ठरवले.कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातून ईसेनिया फेटिडा या जातीची गांडूळ बीजे आणली. त्यांच्याकडे गांडूळखतासाठी जुन्या पद्धतीच्या दोन सिमेंट टाक्या, नवीन पद्धतीने गांडूळखत बनविण्यासाठी चार गांडूळ बॅगा असून इतर गांडूळखत फळझाडांच्या सावलीत तयार केले जाते. शेणखत आणि शेतातील गवत कचरा एकत्र केले जाते. हे सर्व झाडांच्या सावलीत सिमेंटच्या टाकीत टाकून त्यावर पाणी शिंपडून एक महिना ठेवले जाते. त्यामुळे हे मिश्रण अर्धवट कुजते. नंतर हे गांडूळखतासाठी बनवलेल्या टाकीत किंवा बॅगमध्ये टाकून त्यावर दोन ते तीन किलो गांडूळ सोडतात. त्यावर रोज पाणी शिंपडल्याने ओलावा मिळून गांडुळांची संख्या भरपूर वाढून एक ते दीड महिन्यात गांडूळखत तयार होत असल्याचे पाटील सांगतात. खत काढण्यापूर्वी पाणी शिंपडणे थांबवून वरच्या थरातील खत हलक्या हाताने काढले जाते. महिन्याकाठी ७ ते ८ टन या खताचे उत्पादन घेतले जाते. या खताचा उपयोग शेतीसाठी होतोच शिवाय विक्रीतून आर्थिक फायदाही होतो.अर्धा एकर क्षेत्रामध्ये भाजीपाला लागवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने मिरची, टोमॅटो, वांगी आणि वाल ही पिके घेतली जातात. या भाजीपाल्यावर संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने कीड रोग नियंत्रण केले जाते. त्यासाठी विविध सापळे, दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते. जमिनीतीतून जीवामृत आणि गांडूळ पाणी दिले जाते. हा सर्व भाजीपाला स्थानिक बाजारात विकला जातो. भाजीपाल्यासोबत झेंडू व चवळी लागवडही केली जाते. त्यांनी तीन गीर जातीच्या गायी व २० देशी कोंबड्या पाळल्या आहेत. गोमूत्र जीवामृत बनविण्यासाठी वापरले जाते. अंडी व दूध विक्री केली जाते.किडींचे अशाप्रकारे केले जाते नियंत्रणभाजीपाला पिकामध्ये रस शोषक किडी येत असतात. त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी ३० याप्रमाणे लावतात. हिरव्या आळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे एकरात ५ ते ६ लावले जातात. तसेच १० ते १२ ओळींनंतर एक ओळ झेंडूची लावली जाते. ही फुले नियमित तोडली जातात. त्यामुळे भाजीपाल्यामध्ये हिरव्या अळीची अंडी आणि अळी अवस्था फुलांसोबत शेतातून बाहेर जाऊन किडीच्या प्रादुर्भाव रोखता येतो.