शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शैक्षणिक धोरण स्वागतार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 06:47 IST

सद्यस्थितीत इयत्ता १ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत सरसकट पास करावे लागत आहे. दरवर्षी आठवीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना कमी गुण पडले अथवा ते परीक्षेला गैरहजर राहिले तरी सुध्दा पुढच्या वर्गात पास होऊन जात होते.

कांंता हाबळे नेरळ : सद्यस्थितीत इयत्ता १ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत सरसकट पास करावे लागत आहे. दरवर्षी आठवीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना कमी गुण पडले अथवा ते परीक्षेला गैरहजर राहिले तरी सुध्दा पुढच्या वर्गात पास होऊन जात होते. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार त्यावेळी राज्य शासनाने तशी अंमलबजावणी केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची क्षमता असो किंवा नसो तरी पास करावे लागत होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकाचे मूल्यमापन होत नव्हते. त्यांचा आजच्या स्पर्धेच्या युगात कसा टिकाव लागणार अशी चिंता पालकांना भेडसावत होती. त्यासाठी राईट टू एज्युकेशन कायद्यात कुठेतरी बदल होणे अपेक्षित होते. त्यामुळे नुकताच केंद्र सरकारने पाचवी व आठवीच्या शाळकरी मुलांना उत्तीर्ण होण्याएवढे मार्क न पडल्यास नापास करण्याचा जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रि या पालक वर्गातून उमटत आहे.पूर्वी शाळेतील मुले नापास झाल्यावर विशेष करून ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांचा कल शाळा सोडण्याकडे असायचा. यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण लक्षणीय होते. राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना म्हणजेच १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाबाबत त्यावेळेसही पालक तसेच शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांमधून संमिश्र प्रतिक्रि या उमटल्या होत्या. त्यामुळेच अखेर केंद्र सरकारने त्यावेळी घेतलेला निर्णय बदलून पूर्वीप्रमाणेच किमान ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून नापास करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गुणवत्तेचे मूल्यमापन शक्य आहे.मूल्यमापन करु ननापासचा निर्णयपहिली ते आठवीपर्यतच्या मुलांना शिक्षण घेत असताना परीक्षेत पास करावे लागत असे, मात्र केंद्र सरकारने त्यावेळी घेतलेला निर्णय बदलून पूर्वीप्रमाणेच किमान ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून नापास करण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन होण्यास शिक्षकांना मदत मिळणार असून त्यांनी समाधान व्यक्त के ले आहे.सरसकट मुलांना पास केल्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची मानसिकता नव्हती. पाचवी व आठवीला नापास करण्यामुळे अभ्यास करण्याची मानसिकता वाढेल. विद्यार्थ्यांवर अन्याय न होता परीक्षेची दुसरी संधी देणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल.- ज्ञानेश्वर वाडिले, शिक्षक, कडाव, कर्जतयापूर्वी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केल्यामुळे काही विद्यार्थ्यांकडून या काळात योग्य अध्ययन केले जात नव्हते. परिणामी नववीत गेल्यावर विद्यार्थी नापास होण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. यापुढे या बदलत्या निर्णयामुळे नववीचा निकाल चांगला लागण्याची शक्यता आहे.- राजेंद्र बोराडे, शिक्षक, भिसेगावराईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना पास केल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता नसतानाही पास करावे लागत होते. या बाबीला अडचण निर्माण होत आहे.- श्रीकृष्ण लोहारे,शिक्षक, चिंचवाडीआठवीच्यापर्यंत सर्वांना पास करण्यामुळे राईट टू एज्युकेशन कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे.- रोहू गवळी,शिक्षक, तिवणविद्यार्थ्यांना आठवीपर्यंत पास केल्यामुळे विद्यार्थी आळशी बनले होते. भविष्यात स्पर्धात्मक युगाला ते हानिकारक होते.-रमेश आहिरे,शिक्षक, नसरापूर