शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

नवीन शैक्षणिक धोरण स्वागतार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 06:47 IST

सद्यस्थितीत इयत्ता १ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत सरसकट पास करावे लागत आहे. दरवर्षी आठवीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना कमी गुण पडले अथवा ते परीक्षेला गैरहजर राहिले तरी सुध्दा पुढच्या वर्गात पास होऊन जात होते.

कांंता हाबळे नेरळ : सद्यस्थितीत इयत्ता १ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत सरसकट पास करावे लागत आहे. दरवर्षी आठवीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना कमी गुण पडले अथवा ते परीक्षेला गैरहजर राहिले तरी सुध्दा पुढच्या वर्गात पास होऊन जात होते. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार त्यावेळी राज्य शासनाने तशी अंमलबजावणी केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची क्षमता असो किंवा नसो तरी पास करावे लागत होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकाचे मूल्यमापन होत नव्हते. त्यांचा आजच्या स्पर्धेच्या युगात कसा टिकाव लागणार अशी चिंता पालकांना भेडसावत होती. त्यासाठी राईट टू एज्युकेशन कायद्यात कुठेतरी बदल होणे अपेक्षित होते. त्यामुळे नुकताच केंद्र सरकारने पाचवी व आठवीच्या शाळकरी मुलांना उत्तीर्ण होण्याएवढे मार्क न पडल्यास नापास करण्याचा जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रि या पालक वर्गातून उमटत आहे.पूर्वी शाळेतील मुले नापास झाल्यावर विशेष करून ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांचा कल शाळा सोडण्याकडे असायचा. यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण लक्षणीय होते. राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना म्हणजेच १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाबाबत त्यावेळेसही पालक तसेच शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांमधून संमिश्र प्रतिक्रि या उमटल्या होत्या. त्यामुळेच अखेर केंद्र सरकारने त्यावेळी घेतलेला निर्णय बदलून पूर्वीप्रमाणेच किमान ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून नापास करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गुणवत्तेचे मूल्यमापन शक्य आहे.मूल्यमापन करु ननापासचा निर्णयपहिली ते आठवीपर्यतच्या मुलांना शिक्षण घेत असताना परीक्षेत पास करावे लागत असे, मात्र केंद्र सरकारने त्यावेळी घेतलेला निर्णय बदलून पूर्वीप्रमाणेच किमान ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून नापास करण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन होण्यास शिक्षकांना मदत मिळणार असून त्यांनी समाधान व्यक्त के ले आहे.सरसकट मुलांना पास केल्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची मानसिकता नव्हती. पाचवी व आठवीला नापास करण्यामुळे अभ्यास करण्याची मानसिकता वाढेल. विद्यार्थ्यांवर अन्याय न होता परीक्षेची दुसरी संधी देणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल.- ज्ञानेश्वर वाडिले, शिक्षक, कडाव, कर्जतयापूर्वी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केल्यामुळे काही विद्यार्थ्यांकडून या काळात योग्य अध्ययन केले जात नव्हते. परिणामी नववीत गेल्यावर विद्यार्थी नापास होण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. यापुढे या बदलत्या निर्णयामुळे नववीचा निकाल चांगला लागण्याची शक्यता आहे.- राजेंद्र बोराडे, शिक्षक, भिसेगावराईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना पास केल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता नसतानाही पास करावे लागत होते. या बाबीला अडचण निर्माण होत आहे.- श्रीकृष्ण लोहारे,शिक्षक, चिंचवाडीआठवीच्यापर्यंत सर्वांना पास करण्यामुळे राईट टू एज्युकेशन कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे.- रोहू गवळी,शिक्षक, तिवणविद्यार्थ्यांना आठवीपर्यंत पास केल्यामुळे विद्यार्थी आळशी बनले होते. भविष्यात स्पर्धात्मक युगाला ते हानिकारक होते.-रमेश आहिरे,शिक्षक, नसरापूर