शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

नवीन शैक्षणिक धोरण स्वागतार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 06:47 IST

सद्यस्थितीत इयत्ता १ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत सरसकट पास करावे लागत आहे. दरवर्षी आठवीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना कमी गुण पडले अथवा ते परीक्षेला गैरहजर राहिले तरी सुध्दा पुढच्या वर्गात पास होऊन जात होते.

कांंता हाबळे नेरळ : सद्यस्थितीत इयत्ता १ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत सरसकट पास करावे लागत आहे. दरवर्षी आठवीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना कमी गुण पडले अथवा ते परीक्षेला गैरहजर राहिले तरी सुध्दा पुढच्या वर्गात पास होऊन जात होते. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार त्यावेळी राज्य शासनाने तशी अंमलबजावणी केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची क्षमता असो किंवा नसो तरी पास करावे लागत होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकाचे मूल्यमापन होत नव्हते. त्यांचा आजच्या स्पर्धेच्या युगात कसा टिकाव लागणार अशी चिंता पालकांना भेडसावत होती. त्यासाठी राईट टू एज्युकेशन कायद्यात कुठेतरी बदल होणे अपेक्षित होते. त्यामुळे नुकताच केंद्र सरकारने पाचवी व आठवीच्या शाळकरी मुलांना उत्तीर्ण होण्याएवढे मार्क न पडल्यास नापास करण्याचा जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रि या पालक वर्गातून उमटत आहे.पूर्वी शाळेतील मुले नापास झाल्यावर विशेष करून ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांचा कल शाळा सोडण्याकडे असायचा. यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण लक्षणीय होते. राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना म्हणजेच १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाबाबत त्यावेळेसही पालक तसेच शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांमधून संमिश्र प्रतिक्रि या उमटल्या होत्या. त्यामुळेच अखेर केंद्र सरकारने त्यावेळी घेतलेला निर्णय बदलून पूर्वीप्रमाणेच किमान ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून नापास करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गुणवत्तेचे मूल्यमापन शक्य आहे.मूल्यमापन करु ननापासचा निर्णयपहिली ते आठवीपर्यतच्या मुलांना शिक्षण घेत असताना परीक्षेत पास करावे लागत असे, मात्र केंद्र सरकारने त्यावेळी घेतलेला निर्णय बदलून पूर्वीप्रमाणेच किमान ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून नापास करण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन होण्यास शिक्षकांना मदत मिळणार असून त्यांनी समाधान व्यक्त के ले आहे.सरसकट मुलांना पास केल्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची मानसिकता नव्हती. पाचवी व आठवीला नापास करण्यामुळे अभ्यास करण्याची मानसिकता वाढेल. विद्यार्थ्यांवर अन्याय न होता परीक्षेची दुसरी संधी देणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल.- ज्ञानेश्वर वाडिले, शिक्षक, कडाव, कर्जतयापूर्वी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केल्यामुळे काही विद्यार्थ्यांकडून या काळात योग्य अध्ययन केले जात नव्हते. परिणामी नववीत गेल्यावर विद्यार्थी नापास होण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. यापुढे या बदलत्या निर्णयामुळे नववीचा निकाल चांगला लागण्याची शक्यता आहे.- राजेंद्र बोराडे, शिक्षक, भिसेगावराईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना पास केल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता नसतानाही पास करावे लागत होते. या बाबीला अडचण निर्माण होत आहे.- श्रीकृष्ण लोहारे,शिक्षक, चिंचवाडीआठवीच्यापर्यंत सर्वांना पास करण्यामुळे राईट टू एज्युकेशन कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे.- रोहू गवळी,शिक्षक, तिवणविद्यार्थ्यांना आठवीपर्यंत पास केल्यामुळे विद्यार्थी आळशी बनले होते. भविष्यात स्पर्धात्मक युगाला ते हानिकारक होते.-रमेश आहिरे,शिक्षक, नसरापूर