शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

अवकाळी पावसाने पाओलीचे भाव घसरले, शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:05 IST

तालुक्यातील शेतक-यांना निसर्गाने फसवल्याने भाताचे पीक नुकसानीत गेल्याने आता आशा होती ती गवत, पाओलीतून मिळणा-या थोड्या फार आधाराची.

राहुल वाडेकर विक्रमगड : तालुक्यातील शेतक-यांना निसर्गाने फसवल्याने भाताचे पीक नुकसानीत गेल्याने आता आशा होती ती गवत, पाओलीतून मिळणा-या थोड्या फार आधाराची. मात्र, ओखी वादळामुळे पडलेल्या पावसामुळे शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले आहे. त्यात व्यापाºयांनाही फटका बसल्याने सगळा धंदाच चौपट झाल्याचे चित्र आहे.तालुक्यातील आपटी, आलोंडे, झडपोली, केव, यशवंतनगर, गडदे, दादडे, उपराळे अशा विविध भागामध्ये गवत पाओलीची खरेदी करणाºया वखारी सुरु झाल्या आहेत. या खरेदी विक्र ीला जोर आला असला तरी गवताला ४००० रु टन भाव दण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. विक्र मगड ही गवत खरेदी विक्रीची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे वाडा, जव्हार, पालघर, डहाणू तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी इकडे येतात.या वर्षी मात्र पाऊस लांबल्याने व अवकाळी पावसामुळे वखारींची संख्या कमी होऊन अंदाजे १५ ते २० वखारी सुरु आहेत. या वखारीत आलेल्या गवत व पाओलीला प्रेस द्वारे तारेने ६ ते ७ ताणाच्या गाठ्या बनवून वखार मालक मुबई, वसई, नालासोपारा, ठाणे, गोरेगाव भागातील दुध डेअरींना विक्र ीसाठी पाठविल्या जातात. मात्र, या गठ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने वखारी मालक मागणी नुसार वखारीत साठवणूक करून ठेवत असतात. पावसाळ्यात गठ्याना मोठी मागणी व योग्य भाव असल्याने वखार मालक दुध डेअरींना विक्र ी करतात.या वर्षी गाठ्यांनाच योग्य भाव न मिळाल्याने आम्हाला तोट्यात जावे लागेल असे वखारी मालकांचे म्हणणे आहे. या पूर्वी आदिवासी विकास महामंडळाने गवत-पाओलीला एका-धिकारी खरेदी केली होती. परंतु त्यांना त्यामध्ये योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ही खरेदी केंद्रे बंद करण्यात आली.वखारीमध्ये व गवत रचण्यासाठी प्रेसमध्ये गठ्या रचण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूरांची आवश्यकता लागते असते त्यामुळे ऐका वखारीत ४० ते ५० मजुरांना रोजगार मिळतो. तालूक्यात १५ ते २० वखारी सुरु असून अंदाजे १२०० मजुरांना या वखारी द्वारे रोजगार मिळतो आहे. त्याच प्रमाणे गवत-पाओली ने - आन करण्यासाठी बैलगाडीचा उपयोग केला जात असून बैलगाडीमध्ये पाओली आणणाºया एका फेरीला १५० ते २०० रु पये भाडे वखारी मालक देत असतात. त्यामुळे बैलगाडीवाले भाडयाच्या रूपात दिवसकाठी ४ ते ५ फेरीत ८०० ते १००० रु पये मिळवतात. तालुक्यातील या गवत -पाओली वखारी मुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे.इतर तालुक्याच्या तुलनेत कमी भावतालुक्यात व्यापारी शेतकºयांना एक टन पाओलीला २४०० ते २६०० रु पये भाव देत आहेत. गेल्या वर्षी हाच भाव तीन हजार ते बत्तीसशे रुपये होता. या वर्षी पाऊस लांबल्याने तसेच अवकाळी पावसामुळे पाओली कुजल्याने भाव घसरला असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले. दरम्यान, वाडा तालुक्यातील काही भागात पाओलीला २८०० ते ३००० रु पये टन भाव दिला जात आहे. पालघर जिल्हातील काही वखारीनवर पाओलीला ३००० रु पये भाव आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी