शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

अवकाळी पावसाने पाओलीचे भाव घसरले, शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:05 IST

तालुक्यातील शेतक-यांना निसर्गाने फसवल्याने भाताचे पीक नुकसानीत गेल्याने आता आशा होती ती गवत, पाओलीतून मिळणा-या थोड्या फार आधाराची.

राहुल वाडेकर विक्रमगड : तालुक्यातील शेतक-यांना निसर्गाने फसवल्याने भाताचे पीक नुकसानीत गेल्याने आता आशा होती ती गवत, पाओलीतून मिळणा-या थोड्या फार आधाराची. मात्र, ओखी वादळामुळे पडलेल्या पावसामुळे शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले आहे. त्यात व्यापाºयांनाही फटका बसल्याने सगळा धंदाच चौपट झाल्याचे चित्र आहे.तालुक्यातील आपटी, आलोंडे, झडपोली, केव, यशवंतनगर, गडदे, दादडे, उपराळे अशा विविध भागामध्ये गवत पाओलीची खरेदी करणाºया वखारी सुरु झाल्या आहेत. या खरेदी विक्र ीला जोर आला असला तरी गवताला ४००० रु टन भाव दण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. विक्र मगड ही गवत खरेदी विक्रीची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे वाडा, जव्हार, पालघर, डहाणू तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी इकडे येतात.या वर्षी मात्र पाऊस लांबल्याने व अवकाळी पावसामुळे वखारींची संख्या कमी होऊन अंदाजे १५ ते २० वखारी सुरु आहेत. या वखारीत आलेल्या गवत व पाओलीला प्रेस द्वारे तारेने ६ ते ७ ताणाच्या गाठ्या बनवून वखार मालक मुबई, वसई, नालासोपारा, ठाणे, गोरेगाव भागातील दुध डेअरींना विक्र ीसाठी पाठविल्या जातात. मात्र, या गठ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने वखारी मालक मागणी नुसार वखारीत साठवणूक करून ठेवत असतात. पावसाळ्यात गठ्याना मोठी मागणी व योग्य भाव असल्याने वखार मालक दुध डेअरींना विक्र ी करतात.या वर्षी गाठ्यांनाच योग्य भाव न मिळाल्याने आम्हाला तोट्यात जावे लागेल असे वखारी मालकांचे म्हणणे आहे. या पूर्वी आदिवासी विकास महामंडळाने गवत-पाओलीला एका-धिकारी खरेदी केली होती. परंतु त्यांना त्यामध्ये योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ही खरेदी केंद्रे बंद करण्यात आली.वखारीमध्ये व गवत रचण्यासाठी प्रेसमध्ये गठ्या रचण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूरांची आवश्यकता लागते असते त्यामुळे ऐका वखारीत ४० ते ५० मजुरांना रोजगार मिळतो. तालूक्यात १५ ते २० वखारी सुरु असून अंदाजे १२०० मजुरांना या वखारी द्वारे रोजगार मिळतो आहे. त्याच प्रमाणे गवत-पाओली ने - आन करण्यासाठी बैलगाडीचा उपयोग केला जात असून बैलगाडीमध्ये पाओली आणणाºया एका फेरीला १५० ते २०० रु पये भाडे वखारी मालक देत असतात. त्यामुळे बैलगाडीवाले भाडयाच्या रूपात दिवसकाठी ४ ते ५ फेरीत ८०० ते १००० रु पये मिळवतात. तालुक्यातील या गवत -पाओली वखारी मुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे.इतर तालुक्याच्या तुलनेत कमी भावतालुक्यात व्यापारी शेतकºयांना एक टन पाओलीला २४०० ते २६०० रु पये भाव देत आहेत. गेल्या वर्षी हाच भाव तीन हजार ते बत्तीसशे रुपये होता. या वर्षी पाऊस लांबल्याने तसेच अवकाळी पावसामुळे पाओली कुजल्याने भाव घसरला असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले. दरम्यान, वाडा तालुक्यातील काही भागात पाओलीला २८०० ते ३००० रु पये टन भाव दिला जात आहे. पालघर जिल्हातील काही वखारीनवर पाओलीला ३००० रु पये भाव आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी