शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

विकासाची गंगोत्री सरपंचाच्या हाती

By admin | Updated: April 16, 2016 01:15 IST

केंद्रीय व राज्याच्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ग्रामीण विकासाच्या संदर्भात महत्त्वाची अन् लक्षात ठेवण्याजोगी बाब आहे, ती म्हणजे ग्रामपंचायती व नगरपालिकांना एक वर्षात २.८७ कोटी रुपयांचे

- दत्ता म्हात्रे,  पेण

केंद्रीय व राज्याच्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ग्रामीण विकासाच्या संदर्भात महत्त्वाची अन् लक्षात ठेवण्याजोगी बाब आहे, ती म्हणजे ग्रामपंचायती व नगरपालिकांना एक वर्षात २.८७ कोटी रुपयांचे वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार हस्तांतरणाप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीस वार्षिक ८७ लाख रुपयांचे थेट अनुदान मिळणार आहे. याची प्रत्यक्षरीत्या सुरुवात १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०२० या कालखंडात केंद्र शासनाकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला बेसिक व परफार्मन्स ग्रँडच्या स्वरूपात अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा निधी थेट ग्रामपंचायत स्तरावर वितरीत करण्यात आला असून रायगड जिल्ह्यातील ८२३ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकासासाठी राजिपमार्फत तब्बल ४१ कोटी रुपयांचे थेट वितरण झाले आहे. राज्यात गावांच्या विकासाची गंगोत्री आता थेट सरपंचाच्या हातात आल्याने आगामी कालखंडात ग्रामपंचायतीच्या निवडणुकात जबरदस्त चुरस पहावयास मिळेल.केंद्रातील मोदी सरकारच्या नव्या धोरणांच्या नीतीनुसार, ग्रामपंचायती अर्थात पंचायत राज बळकटीकरणाचा नवा फंडा सरपंच महोदयांना चांगलाच फायद्याचा ठरणार आहे. भविष्यातील मिनी मंत्रालये म्हणून ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण व थेट निधीची पूर्तता याद्वारे पाच वर्षाच्या सरपंचपदाच्या कालावधीत तब्बल ४ कोटी ३५ लाखांचा एकूण निधी उपलब्ध होणार आहे. शहराप्रमाणे खेड्यांना आधुनिक लूक मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढे सरसावत नमनालाच घडाभर पाणी या नात्याने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत स्तरावरच्या लोकप्रतिनिधींना गावाचा विकास आराखडा तयार करण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. त्यानुसार पैशाअभावी विकासकामांची ओरड थांबावी म्हणूनच बेसिक व परफार्मन्स ग्रँडमधून माझं गाव माझी ग्रामपंचायत ही भावना प्रामाणिक हेतूने साध्य व्हावी यासाठी १४ व्या वित्त आयोगाचा थेट निधी वितरीत करून ग्रामविकासाची गुरुकिल्ली सरपंचाच्या हाती दिली आहे. यातून गतिमान प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे टेबलावरून न हलणाऱ्या फाईलींचे रडगाणे कायम बंद होणार आहे. केंद्र व राज्याच्या विकास निधीचे पाठबळ मिळणार असल्याने खेडी स्वयंपूर्ण होण्याचा मार्गही या निमित्ताने खुला होणार आहे.ग्रामपंचायतींना थेट वितरीत झालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या उपलब्ध निधीनुसार ग्रामपंचायतीच्या कक्षेत येणाऱ्या गावांमध्ये कोणकोणती विकासकामे करण्याची रुपरेषायाची साधकबाधकचर्चा करून सरपंच आणि ग्रामसेवकांना मासिक मिटिंग व ग्रामसभेत संमत करून घ्यावयाची आहेत. वर्षाकाठी मिळणारा ८७ लाखांचा विकास निधी गावचा प्रथम नागरिक म्हणून सरपंचाचा अधिकार मोठा असणार आहे. समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजनाग्रामीण भागातील गावगाड्यात भेडसावणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करता येणार आहेत. त्यानुसार प्राधान्याने पाणीपुरवठा स्रोतांची कामे, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, रेन हार्वेस्टिंग इ. कामांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. पाणीटंचाई समस्या कायमस्वरूपी निराकरणकरण्यासाठी या विकास निधीचा पुरपूर उपयोग व्हावा असे शासनाचे मत आहे. गावाच्या गरजेनुसार कामाची यादी तालुकास्तरीय समिती छाननी करेल. या समितीमध्ये पंचायत समिती गटविकास अधिकारी, बांधकाम इंजिनिअर, पाणीपुरवठा इंजिनिअर, बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती तांत्रिक मुद्यांची छाननी करून शिफारशींसह अंतिम मंजुरीसाठी ग्रामसभेत पाठवेल. ग्रामसभेने गावाच्या विकासकामांना मंजुरी दिल्यानंतर त्यामध्ये काही बदल करावयाचा असेल तर तो अंतिम अधिकार मुख्याधिकारी यांना देण्यात आला आहे. रोडे गाव हे दुर्गम डोंगराळ भागात मोडत असून कें द्र व राज्य शासनाचा थेट निधी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मिळाला. यामुळे गावाच्या विकासकामांसाठी निधीची हमी मिळाली आहे, याचा आनंद आहे. यामुळे विकासकामे लवकर होणार आहेत.- स्वप्निल म्हात्रे, सरपंच, रोडेशासनाने पंचायत राज व्यवस्थेला बळकटी मिळावी या हेतूने ग्रामपंचायत स्थरावर निधी उपलब्ध करु न दिला. ग्रामसभेत ग्रामस्थांना विकासकामांच्या आखणीवर किती खर्च होणार याची माहिती मिळणार असून ग्रामपंचायतीची गणसंख्याही वाढेल अशी अपेक्षा आहे.- डी.के . पाटील, ग्रामसेवक, जोहे