शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

रायगडावर पर्यटकांची गैरसोय

By admin | Updated: August 27, 2015 22:59 IST

छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे. यामुळे याबाबत पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

महाड : छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे. यामुळे याबाबत पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पावसाळ्यामुळे रायगडावर सर्वत्र बहरलेली हिरवाई, वाहणारे धबधबे, मनमोहन टाकणारे धुकं हे सृष्टी सौंदर्य गडावर येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालत आहे. या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने रायगडावर येत आहेत. मात्र गडावर त्यांची राहण्याची कुठलीही सोय नसल्याने या पर्यटकांची मोठी निराशा होत आहे.रायगडावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह असून या विश्रामगृहाची दुर्दशा झाली आहे. या ठिकाणी असलेल्या १२ खोल्यांपैकी ५ खोल्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून उर्वरित ७ खोल्या पर्यटकांना सध्या भाड्याने दिल्या जातात. या पाच खोल्यांवरील छपरे गेल्या पाच वर्षापूर्वी चक्रीवादळात उडून गेली आहेत. तर दरवाजे, खिडक्या पूर्ण मोडक्या अवस्थेत आहेत. या खोल्यांची अंतर्गत देखभाल दुरुस्ती पर्यटन महामंडळ विभागाच्या अखत्यारीत असल्याने पुरातत्व विभाग या देखभाल दुरुस्तीला विरोध करीत आहे.खोल्यांवरील उडालेले छप्पर टाकण्यास देखील या विभागांच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यामुळे या पाच खोल्यांची दुरुस्ती गेल्या चार-पाच वर्षापासून रखडलेली आहे. परिणामी गडावर येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी खोल्या उपलब्ध करुन देणे अशक्य होत असल्याचे दिसून येत आहे. याच ठिकाणी पर्यटकांसाठी राहण्यासाठी असलेले दोन हॉल देखील दुरुस्तीविना तसेच पडून आहेत. उपाहारगृहाअंतर्गतची देखभालीची तीच बिकट अवस्था आहे. गडावर दरवर्षी लाखो शिवभक्त येत असतात मात्र त्यांची होणारी गैरसोय पाहून हे शिवभक्त शासनाच्या नावाने अक्षरश: शिव्यांची लाखोळी वाहत असताना दिसतात.शिवभक्त व पर्यटकांच्या सोयीसाठी पुरातत्व विभागामार्फत रायगडावर कायमस्वरुपी व्यवस्था केली जावी, अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हे विभाग स्वत:ही काहीही करत नाही आणि अन्य यंत्रणांनाही कुठल्याही बाबतीत सहकार्य करीत नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवपर्यटकांकडून केला जात आहे.