शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
3
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
4
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
5
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
6
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
7
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
8
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
9
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
10
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
11
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
12
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
13
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
14
Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना
15
आजपासून IPO गुंतवणुकीसाठी खुला, लॅपटॉप रिपेअरिंगमधून कोट्यवधी कमावते कंपनी; GMP ₹१०० पेक्षाही जास्त
16
पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम?
17
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
18
"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
19
कष्टाचं फळ! हात मोडला, दीड वर्ष शाळा सोडली, स्टेशनवर राहण्याची आली वेळ; होणार डॉक्टर
20
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!

निगडे फणसेकोंड येथे डेंग्यूचे थैमान

By admin | Updated: May 13, 2016 02:19 IST

तालुक्यातील निगडे फणसेकोंड या दुर्गम ठिकाणच्या वाडीवर गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेले डेंग्यूचे थैमान थांबलेले नाही. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने

महाड : तालुक्यातील निगडे फणसेकोंड या दुर्गम ठिकाणच्या वाडीवर गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेले डेंग्यूचे थैमान थांबलेले नाही. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यूची लागण होण्याच्या भीतीने स्थानिक ग्रामस्थांनी तालुक्यातील नातेवाइकांकडे स्थलांतर केल्याने फणसेकोंड येथे सध्या स्मशान शांतता पसरल्याचे दिसून येत आहे. साठवण टाक्यांमध्ये साठवलेल्या पिंपामधील पाण्यामुळे तसेच कोंडावरील विहिरीतील पाण्यामुळे या ठिकाणी डेंग्यूची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून बळीराम मोरे, ज्ञानेश्वर चौधरी या ग्रामस्थांनीही त्याला दुजोरा दिला आहे.निगड गावच्या १३ वाड्यांना एकाच जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ३० ते ३५ उंबरठा असलेल्या फणसेकोंड येथील बहुतांशी ग्रामस्थ मुंबईत नोकरी व्यवसायानिमित्त राहतात. आठ दहा दिवसांपूर्वी या वाडीत सुरुवातीला डेंग्यूची लागण झालेले सात रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली होती. त्यावेळी त्या ठिकाणी धुरीकरण, जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तर प्रत्येक घराबाहेर पाणी साठवणासाठी ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिंपापैकी बहुतांशी पिंपातील पाण्यात डेंग्यूच्या अळ्या असल्याचे निष्पन्न झाले होते. बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इ. सी. बिरादार यांनी डेंग्यूची लागण नियंत्रणात असल्याचे सांगितले असले तरीही प्रत्यक्षात दिवसेंदिवस हा फैलाव वाढतच असल्याने आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बुधवारी रात्री फणसेकोंड येथील डेंग्यूची लागण झालेल्या आणखी नऊ जणांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल के ले आहे. आणखी काही ग्रामस्थांना ही लागण झाली आहे. मात्र स्थानिक पातळीवर व्यवस्थित उपचार केले जात नसल्याने यापैकी काही जण उपचारासाठी मुंबईला गेल्याची माहिती नारायण फणसे यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप हे दीर्घकालीन रजेवर गेल्याने बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपुऱ्या सुविधांमुळे डेंग्यूच्या रुग्णांना मुंबईत उपचारासाठी जावे लागत आहे. तसेच पाणीटंचाई असल्याने टँकर तरी पाठवण्यात यावा अशी मागणी प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे केली आहे.