शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

निगडे फणसेकोंड येथे डेंग्यूचे थैमान

By admin | Updated: May 13, 2016 02:19 IST

तालुक्यातील निगडे फणसेकोंड या दुर्गम ठिकाणच्या वाडीवर गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेले डेंग्यूचे थैमान थांबलेले नाही. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने

महाड : तालुक्यातील निगडे फणसेकोंड या दुर्गम ठिकाणच्या वाडीवर गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेले डेंग्यूचे थैमान थांबलेले नाही. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यूची लागण होण्याच्या भीतीने स्थानिक ग्रामस्थांनी तालुक्यातील नातेवाइकांकडे स्थलांतर केल्याने फणसेकोंड येथे सध्या स्मशान शांतता पसरल्याचे दिसून येत आहे. साठवण टाक्यांमध्ये साठवलेल्या पिंपामधील पाण्यामुळे तसेच कोंडावरील विहिरीतील पाण्यामुळे या ठिकाणी डेंग्यूची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून बळीराम मोरे, ज्ञानेश्वर चौधरी या ग्रामस्थांनीही त्याला दुजोरा दिला आहे.निगड गावच्या १३ वाड्यांना एकाच जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ३० ते ३५ उंबरठा असलेल्या फणसेकोंड येथील बहुतांशी ग्रामस्थ मुंबईत नोकरी व्यवसायानिमित्त राहतात. आठ दहा दिवसांपूर्वी या वाडीत सुरुवातीला डेंग्यूची लागण झालेले सात रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली होती. त्यावेळी त्या ठिकाणी धुरीकरण, जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तर प्रत्येक घराबाहेर पाणी साठवणासाठी ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिंपापैकी बहुतांशी पिंपातील पाण्यात डेंग्यूच्या अळ्या असल्याचे निष्पन्न झाले होते. बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इ. सी. बिरादार यांनी डेंग्यूची लागण नियंत्रणात असल्याचे सांगितले असले तरीही प्रत्यक्षात दिवसेंदिवस हा फैलाव वाढतच असल्याने आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बुधवारी रात्री फणसेकोंड येथील डेंग्यूची लागण झालेल्या आणखी नऊ जणांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल के ले आहे. आणखी काही ग्रामस्थांना ही लागण झाली आहे. मात्र स्थानिक पातळीवर व्यवस्थित उपचार केले जात नसल्याने यापैकी काही जण उपचारासाठी मुंबईला गेल्याची माहिती नारायण फणसे यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप हे दीर्घकालीन रजेवर गेल्याने बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपुऱ्या सुविधांमुळे डेंग्यूच्या रुग्णांना मुंबईत उपचारासाठी जावे लागत आहे. तसेच पाणीटंचाई असल्याने टँकर तरी पाठवण्यात यावा अशी मागणी प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे केली आहे.