शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतराच्या नोटिसीमुळे दासगाव ग्रामस्थ आक्रमक

By admin | Updated: June 6, 2016 01:32 IST

महाड तालुक्यात २००५ मध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी होवून ठिकठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्याचप्रमाणे दासगावमध्ये दरड कोसळून अनेक

सिकंदर अनवारे,  दासगांवमहाड तालुक्यात २००५ मध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी होवून ठिकठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्याचप्रमाणे दासगावमध्ये दरड कोसळून अनेक घरे जमीनदोस्त होवून ४८ जणांचा मृत्यू झाला होता. दरडग्रस्त विभाग दासगाव बंदर रोड व भोईवाडा परिसरात या ठिकाणी आजही अनेक कुटुंबांचे वास्तव्य आहे. यंदासाठी हवामान खात्याने दर्शविलेला जास्त होणाऱ्या पावसाचा अंदाज व भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणाप्रमाणे पुन्हा २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीप्रमाणे यंदाही अशाच पद्धतीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा याच ठिकाणी पुराच्या पाण्याची शक्यता व दरडीचा धोका पाहता दासगांव भोईवाडा परिसरातील सर्व नागरिकांना या ठिकाणाहून स्थलांतरित होण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत, मात्र त्यांनी स्वत:हून राहण्याचा बंदोबस्त करावा, यापुढे स्थलांतर झाले नाही तर प्रशासन जबाबदार राहणार नाही असे नोटिसीत नमूद असल्याने दासगांवमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली असून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.२००५ साली महाड तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसला होता. ठिकठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती. मात्र त्यावेळेपासून आजतागायत गेली १० वर्षे त्याच ठिकाणी पुन्हा दरडी कोसळण्याची संभावना कायम आहे. २००५ नंतर १० वर्षे महसूल विभाग त्या त्या ठिकाणच्या नागरिकांना पावसाळा जवळ आल्यानंतर स्थलांतर होण्याच्या नोटिसा देवून आपली जबाबदारी पूर्ण करत आली आहे. आठवडाभरापूर्वी महाडमध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे महाराष्ट्र राज्य युनिटचे डॉ. मकरंद बोडस यांच्या वतीने एक बैठक आयोजित के ली होती. या बैठकीत प्रांताधिकारी यांच्या वतीने मार्गदर्शन करत धोका असणाऱ्या ग्रामस्थांना पावसाळापूर्वी स्थलांतर करण्याचे आदेश खालच्या सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले. स्थलांतर होत नसतील तर शासन जबरदस्तीने खाली करेल असेही सांगण्यात आले. मात्र अद्यापही त्याचा परिणाम दरडीच्या छायेत असणाऱ्या एकाही ग्रामस्थावर झाला नाही.दोन दिवसांपूर्वी तलाठ्याची सही असलेले संभाव्य दरड व पुराचा धोका असलेल्या दासगांवमधील घरांना नोटिसी देण्यात आल्यानंतर दासगांवमधील घरांना नोटिसी देण्यात आल्यानंतर दासगांवमध्ये महसूल विभागाविरोधात संतापाची लाट उसळली. कारण प्रशासनाने या नोटिसीमध्ये २००५ प्रमाणे नैसर्गिक आपत्ती २०१६ मध्ये अतिवृष्टी झाल्यास दरड कोसळणे, पूर येणे यासारखे अनेक धोके संभावू शकतात, असे नमूद केले आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह निवाऱ्याचे साहित्य घेवून गुरेढोरे असल्यास त्याची सुरक्षितता व्यवस्था करून आपण स्वत:हून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. स्थलांतरित न झाल्यास, काही दुर्घटना घडल्यास सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील, अशी नोटीस देण्यात येवून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकून हात वर केल्याने दासगांवमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. दासगांव भोईवाडा परिसरात जवळपास २०० हून अधिक घरे आहेत. दरडीचा व पुराचा मोठा धोका आहे. मात्र गेली १० वर्षे शासन आमच्याकडे दुर्लक्ष करून कोणत्याच समस्यांवर लक्ष देत नाही. गेली १० वर्षे दरड कोसळल्यानंतर दर पावसाळ्यापूर्वी नोटिसी देवून आपली जबाबदारी टाळत आली आहे. - पांडुरंग निवाते, ग्रामस्थ, दासगांव