शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतराच्या नोटिसीमुळे दासगाव ग्रामस्थ आक्रमक

By admin | Updated: June 6, 2016 01:32 IST

महाड तालुक्यात २००५ मध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी होवून ठिकठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्याचप्रमाणे दासगावमध्ये दरड कोसळून अनेक

सिकंदर अनवारे,  दासगांवमहाड तालुक्यात २००५ मध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी होवून ठिकठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्याचप्रमाणे दासगावमध्ये दरड कोसळून अनेक घरे जमीनदोस्त होवून ४८ जणांचा मृत्यू झाला होता. दरडग्रस्त विभाग दासगाव बंदर रोड व भोईवाडा परिसरात या ठिकाणी आजही अनेक कुटुंबांचे वास्तव्य आहे. यंदासाठी हवामान खात्याने दर्शविलेला जास्त होणाऱ्या पावसाचा अंदाज व भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणाप्रमाणे पुन्हा २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीप्रमाणे यंदाही अशाच पद्धतीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा याच ठिकाणी पुराच्या पाण्याची शक्यता व दरडीचा धोका पाहता दासगांव भोईवाडा परिसरातील सर्व नागरिकांना या ठिकाणाहून स्थलांतरित होण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत, मात्र त्यांनी स्वत:हून राहण्याचा बंदोबस्त करावा, यापुढे स्थलांतर झाले नाही तर प्रशासन जबाबदार राहणार नाही असे नोटिसीत नमूद असल्याने दासगांवमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली असून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.२००५ साली महाड तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसला होता. ठिकठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती. मात्र त्यावेळेपासून आजतागायत गेली १० वर्षे त्याच ठिकाणी पुन्हा दरडी कोसळण्याची संभावना कायम आहे. २००५ नंतर १० वर्षे महसूल विभाग त्या त्या ठिकाणच्या नागरिकांना पावसाळा जवळ आल्यानंतर स्थलांतर होण्याच्या नोटिसा देवून आपली जबाबदारी पूर्ण करत आली आहे. आठवडाभरापूर्वी महाडमध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे महाराष्ट्र राज्य युनिटचे डॉ. मकरंद बोडस यांच्या वतीने एक बैठक आयोजित के ली होती. या बैठकीत प्रांताधिकारी यांच्या वतीने मार्गदर्शन करत धोका असणाऱ्या ग्रामस्थांना पावसाळापूर्वी स्थलांतर करण्याचे आदेश खालच्या सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले. स्थलांतर होत नसतील तर शासन जबरदस्तीने खाली करेल असेही सांगण्यात आले. मात्र अद्यापही त्याचा परिणाम दरडीच्या छायेत असणाऱ्या एकाही ग्रामस्थावर झाला नाही.दोन दिवसांपूर्वी तलाठ्याची सही असलेले संभाव्य दरड व पुराचा धोका असलेल्या दासगांवमधील घरांना नोटिसी देण्यात आल्यानंतर दासगांवमधील घरांना नोटिसी देण्यात आल्यानंतर दासगांवमध्ये महसूल विभागाविरोधात संतापाची लाट उसळली. कारण प्रशासनाने या नोटिसीमध्ये २००५ प्रमाणे नैसर्गिक आपत्ती २०१६ मध्ये अतिवृष्टी झाल्यास दरड कोसळणे, पूर येणे यासारखे अनेक धोके संभावू शकतात, असे नमूद केले आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह निवाऱ्याचे साहित्य घेवून गुरेढोरे असल्यास त्याची सुरक्षितता व्यवस्था करून आपण स्वत:हून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. स्थलांतरित न झाल्यास, काही दुर्घटना घडल्यास सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील, अशी नोटीस देण्यात येवून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकून हात वर केल्याने दासगांवमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. दासगांव भोईवाडा परिसरात जवळपास २०० हून अधिक घरे आहेत. दरडीचा व पुराचा मोठा धोका आहे. मात्र गेली १० वर्षे शासन आमच्याकडे दुर्लक्ष करून कोणत्याच समस्यांवर लक्ष देत नाही. गेली १० वर्षे दरड कोसळल्यानंतर दर पावसाळ्यापूर्वी नोटिसी देवून आपली जबाबदारी टाळत आली आहे. - पांडुरंग निवाते, ग्रामस्थ, दासगांव