शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

बंदीमुळे २५० कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: November 30, 2015 02:23 IST

चार महिन्यांपासून नाखवा आणि खलाशी यांच्यातील यांत्रिक बुमच्या (पावर ब्लॉक) वादात ससून डॉक बंदरातील जवळपास सत्तर टक्के पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे.

मधुकर ठाकूर ,  उरणचार महिन्यांपासून नाखवा आणि खलाशी यांच्यातील यांत्रिक बुमच्या (पावर ब्लॉक) वादात ससून डॉक बंदरातील जवळपास सत्तर टक्के पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिक आणि या व्यवसायावर आधारित असलेल्या लाखो कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. नाखवा आणि खलाशीवर्गातील वादामुळे चार महिन्यांत सुमारे अडीचशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. दोघांतील वादावर वेळीच तोडगा न निघाल्यास मच्छीमार व्यवसाय आर्थिक संकटात सापडण्याची भीती मच्छीमार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.मागील २५ वर्षांपासून पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय सुरू आहे. पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या हजारो मच्छीमारांवर सध्या मासेमारी व्यवसायच बंद ठेवण्याची पाळी आली आहे. याचे कारण नाखवा आणि खलाशी यांच्यातील वाद होय. या आधी पर्ससीन नेट मासेमारी करण्यासाठी मच्छीमार बोटींवर १८ खलाशी काम करीत असत. या पध्दतीमध्ये समुद्राच्या भूभागावर मासळी दिसली की वर्तुळात जाळी टाकून बांगडा, सुरमई, हलवा, टुना, शिंगाला आदी जातीची मासळी पकडली जाते. पर्ससीन नेट मासेमारीसाठी एकदा टाकलेली जाळी खेचण्यासाठी १८ खलाशांना तीन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे दिवसातून दोन ते तीन वेळाच मासेमारी करणे शक्य होते. यावर उपाय म्हणून गेल्या वर्षी काही मच्छीमार नाखवा मंडळीने मच्छीमार बोटींवर बुम बसवून मासेमारी व्यवसायाला सुरुवात केली होती. यांत्रिक बुममुळे मच्छीमारांचा आर्थिक फायदाच होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. कारण दिवसातून दोन ते तीन वेळाच मासेमारी करणे शक्य होत असताना बुममुळे दिवसातून ८ ते १० वेळा मासेमारी करणे शक्य होऊ लागले. मासेही विपुल मिळू लागले.यांत्रिक बुममुळे खलाशांचीही मेहनत कमी झाली. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिकांनी यांत्रिक बुमलाच अधिक पसंती दिली आहे.यांत्रिक बुमच्या अतिवापरामुळे मासळी उत्पत्तीवरही मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होऊ लागला. तसेच मासळी आवक वाढताच मासळीचे भावही घसरण्यास सुरुवात झाली. शिवाय जाळींचेही अधिक नुकसान होऊ लागले. बुमच्या अतिवापरामुळे आर्थिक नुकसानीच्याही बाजू समोर आल्या. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिकांनी मच्छीमार बोटींवर बुम न बसविताच मासेमारी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे खलाशीवर्ग दुखावला गेला आणि त्यांनी असहकाराची भूमिका घेतली.