शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बंदीमुळे २५० कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: November 30, 2015 02:23 IST

चार महिन्यांपासून नाखवा आणि खलाशी यांच्यातील यांत्रिक बुमच्या (पावर ब्लॉक) वादात ससून डॉक बंदरातील जवळपास सत्तर टक्के पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे.

मधुकर ठाकूर ,  उरणचार महिन्यांपासून नाखवा आणि खलाशी यांच्यातील यांत्रिक बुमच्या (पावर ब्लॉक) वादात ससून डॉक बंदरातील जवळपास सत्तर टक्के पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिक आणि या व्यवसायावर आधारित असलेल्या लाखो कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. नाखवा आणि खलाशीवर्गातील वादामुळे चार महिन्यांत सुमारे अडीचशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. दोघांतील वादावर वेळीच तोडगा न निघाल्यास मच्छीमार व्यवसाय आर्थिक संकटात सापडण्याची भीती मच्छीमार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.मागील २५ वर्षांपासून पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय सुरू आहे. पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या हजारो मच्छीमारांवर सध्या मासेमारी व्यवसायच बंद ठेवण्याची पाळी आली आहे. याचे कारण नाखवा आणि खलाशी यांच्यातील वाद होय. या आधी पर्ससीन नेट मासेमारी करण्यासाठी मच्छीमार बोटींवर १८ खलाशी काम करीत असत. या पध्दतीमध्ये समुद्राच्या भूभागावर मासळी दिसली की वर्तुळात जाळी टाकून बांगडा, सुरमई, हलवा, टुना, शिंगाला आदी जातीची मासळी पकडली जाते. पर्ससीन नेट मासेमारीसाठी एकदा टाकलेली जाळी खेचण्यासाठी १८ खलाशांना तीन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे दिवसातून दोन ते तीन वेळाच मासेमारी करणे शक्य होते. यावर उपाय म्हणून गेल्या वर्षी काही मच्छीमार नाखवा मंडळीने मच्छीमार बोटींवर बुम बसवून मासेमारी व्यवसायाला सुरुवात केली होती. यांत्रिक बुममुळे मच्छीमारांचा आर्थिक फायदाच होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. कारण दिवसातून दोन ते तीन वेळाच मासेमारी करणे शक्य होत असताना बुममुळे दिवसातून ८ ते १० वेळा मासेमारी करणे शक्य होऊ लागले. मासेही विपुल मिळू लागले.यांत्रिक बुममुळे खलाशांचीही मेहनत कमी झाली. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिकांनी यांत्रिक बुमलाच अधिक पसंती दिली आहे.यांत्रिक बुमच्या अतिवापरामुळे मासळी उत्पत्तीवरही मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होऊ लागला. तसेच मासळी आवक वाढताच मासळीचे भावही घसरण्यास सुरुवात झाली. शिवाय जाळींचेही अधिक नुकसान होऊ लागले. बुमच्या अतिवापरामुळे आर्थिक नुकसानीच्याही बाजू समोर आल्या. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिकांनी मच्छीमार बोटींवर बुम न बसविताच मासेमारी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे खलाशीवर्ग दुखावला गेला आणि त्यांनी असहकाराची भूमिका घेतली.