शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये आदिवासींची शेतीमाल व्यवसायात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 05:24 IST

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलेला होता. मात्र अलीकडे काबाडकष्ट करून मजुरी मिळवत आपल्या कुटुंबाचा ...

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलेला होता. मात्र अलीकडे काबाडकष्ट करून मजुरी मिळवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे हे चित्र आता बदलत आहे. त्यांनी शेतीमालाच्या व्यवसायात उडी घेऊन समाजातील आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.तरुण पिढीचा शिक्षणाकडील कल आणि इतर समाजाबरोबर आणण्याचा शासनाचा कल या सर्व गोष्टींमुळे अतिगरीब म्हणून ओळखला जाणारा आदिवासी आता बदलताना दिसतो. तालुक्यातील वाघोली आदिवासी वाडीवरील अनिल पवार या तरुणाने आतापर्यंत पोट भरण्यासाठी अनेक कष्ट केले. परंतु आता बाजारात उतरून शेतमालाला योग्य मोबदला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शेतात भाजी, फळांचे पीक घेऊनरस्त्याच्या कडेला किंवा बाजारात कपडा टाकून विकणे आणि त्याचा भाव ठरविण्याचा अधिकार ग्राहकास असणे हे कुठेतरी पवार यांना पटत नव्हते. म्हणून त्यांनी ठरविले की, शेतीमधील माल शेतकऱ्यांकडून खरेदी करून तो माल बाजारात विक्री करणे. परंतु यासाठी आर्थिक निधी पाहिजे, असल्याने त्यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या शासकीय योजनेशी संपर्क साधला. त्यानुसार हाशिवरे, वाघोली, नारंगी, चिंचवली या आदिवासीवाडीवरील बांधवांशी भेटून त्याचे महत्त्व पटवून त्यांना एकत्र आणले. जमलेल्या ५०० सदस्यांकडून प्रत्येकी रु. एक हजार मात्र शेअर्स जमा केले. त्याचबरोबर शासकीय अनुदान मिळाले. अशाने डॉ. हार्मन आदिवासी फार्म्स प्रोड्युसर कंपनी, पळी येथे स्थापन केली. या कंपनीचे आदिवासी बंधू-भगिनी संचालक निवडले.सुरुवातीला कांदा, बटाटा, लसूण, फळे इत्यादी माल शेतकºयांकडून खरेदी करून तो माल बाजारभावापेक्षा कमी दराने विकणे असा उद्देश ठेवून ही संस्था कामाला लागली.

व्यवहारामध्ये दलाली नसल्याने शेतकºयांचा माल थेट ग्राहकाला विकून फायदा होत आहे.च्मॉल, बाजार समिती, उच्चभ्रू शीतगृह दुकाने यामधून विक्री केलेला माल कमी दरात खरेदी करून अवाढव्य किमती आकारून तोच माल ग्राहकाला विकणे ही शेतकºयांची होणारी पिळवणूक थांबेल. शासकीय मदतीने शेतकरी कंपन्या स्थापन करून आपल्यातच मालाची देवाणघेवाण करून शेतीमाल विकणे यामुळे स्थानिक शेतकºयांना फायदा होणार आहे. या कंपनीमुळे येथील शेतकºयांना आपल्या शेतमालासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे आणि सेंद्रिय व उच्च प्रतीचा ताजा स्वच्छ भाजीपाला व फळे या कंपनीतून ग्राहकांना मिळणार आहेत.कारली, पडवळ विदेशातच्तालुक्यातील दुधी, कारली व पडवळ अशा प्रकारची भाजी कुवेत देशात कंपनीमार्फत निर्यात केली आहे. तिथून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक अडचण भासत असल्यामुळे व्यवसाय वाढविण्यावर अडचण येत आहे. परंतु व्यवसायवृद्धी कशी होईल, या दृष्टीने प्रयत्नात आहोत, असे अध्यक्ष पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबई