शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये आदिवासींची शेतीमाल व्यवसायात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 05:24 IST

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलेला होता. मात्र अलीकडे काबाडकष्ट करून मजुरी मिळवत आपल्या कुटुंबाचा ...

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलेला होता. मात्र अलीकडे काबाडकष्ट करून मजुरी मिळवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे हे चित्र आता बदलत आहे. त्यांनी शेतीमालाच्या व्यवसायात उडी घेऊन समाजातील आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.तरुण पिढीचा शिक्षणाकडील कल आणि इतर समाजाबरोबर आणण्याचा शासनाचा कल या सर्व गोष्टींमुळे अतिगरीब म्हणून ओळखला जाणारा आदिवासी आता बदलताना दिसतो. तालुक्यातील वाघोली आदिवासी वाडीवरील अनिल पवार या तरुणाने आतापर्यंत पोट भरण्यासाठी अनेक कष्ट केले. परंतु आता बाजारात उतरून शेतमालाला योग्य मोबदला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शेतात भाजी, फळांचे पीक घेऊनरस्त्याच्या कडेला किंवा बाजारात कपडा टाकून विकणे आणि त्याचा भाव ठरविण्याचा अधिकार ग्राहकास असणे हे कुठेतरी पवार यांना पटत नव्हते. म्हणून त्यांनी ठरविले की, शेतीमधील माल शेतकऱ्यांकडून खरेदी करून तो माल बाजारात विक्री करणे. परंतु यासाठी आर्थिक निधी पाहिजे, असल्याने त्यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या शासकीय योजनेशी संपर्क साधला. त्यानुसार हाशिवरे, वाघोली, नारंगी, चिंचवली या आदिवासीवाडीवरील बांधवांशी भेटून त्याचे महत्त्व पटवून त्यांना एकत्र आणले. जमलेल्या ५०० सदस्यांकडून प्रत्येकी रु. एक हजार मात्र शेअर्स जमा केले. त्याचबरोबर शासकीय अनुदान मिळाले. अशाने डॉ. हार्मन आदिवासी फार्म्स प्रोड्युसर कंपनी, पळी येथे स्थापन केली. या कंपनीचे आदिवासी बंधू-भगिनी संचालक निवडले.सुरुवातीला कांदा, बटाटा, लसूण, फळे इत्यादी माल शेतकºयांकडून खरेदी करून तो माल बाजारभावापेक्षा कमी दराने विकणे असा उद्देश ठेवून ही संस्था कामाला लागली.

व्यवहारामध्ये दलाली नसल्याने शेतकºयांचा माल थेट ग्राहकाला विकून फायदा होत आहे.च्मॉल, बाजार समिती, उच्चभ्रू शीतगृह दुकाने यामधून विक्री केलेला माल कमी दरात खरेदी करून अवाढव्य किमती आकारून तोच माल ग्राहकाला विकणे ही शेतकºयांची होणारी पिळवणूक थांबेल. शासकीय मदतीने शेतकरी कंपन्या स्थापन करून आपल्यातच मालाची देवाणघेवाण करून शेतीमाल विकणे यामुळे स्थानिक शेतकºयांना फायदा होणार आहे. या कंपनीमुळे येथील शेतकºयांना आपल्या शेतमालासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे आणि सेंद्रिय व उच्च प्रतीचा ताजा स्वच्छ भाजीपाला व फळे या कंपनीतून ग्राहकांना मिळणार आहेत.कारली, पडवळ विदेशातच्तालुक्यातील दुधी, कारली व पडवळ अशा प्रकारची भाजी कुवेत देशात कंपनीमार्फत निर्यात केली आहे. तिथून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक अडचण भासत असल्यामुळे व्यवसाय वाढविण्यावर अडचण येत आहे. परंतु व्यवसायवृद्धी कशी होईल, या दृष्टीने प्रयत्नात आहोत, असे अध्यक्ष पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबई