शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

अलिबागमध्ये आदिवासींची शेतीमाल व्यवसायात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 05:24 IST

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलेला होता. मात्र अलीकडे काबाडकष्ट करून मजुरी मिळवत आपल्या कुटुंबाचा ...

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलेला होता. मात्र अलीकडे काबाडकष्ट करून मजुरी मिळवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे हे चित्र आता बदलत आहे. त्यांनी शेतीमालाच्या व्यवसायात उडी घेऊन समाजातील आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.तरुण पिढीचा शिक्षणाकडील कल आणि इतर समाजाबरोबर आणण्याचा शासनाचा कल या सर्व गोष्टींमुळे अतिगरीब म्हणून ओळखला जाणारा आदिवासी आता बदलताना दिसतो. तालुक्यातील वाघोली आदिवासी वाडीवरील अनिल पवार या तरुणाने आतापर्यंत पोट भरण्यासाठी अनेक कष्ट केले. परंतु आता बाजारात उतरून शेतमालाला योग्य मोबदला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शेतात भाजी, फळांचे पीक घेऊनरस्त्याच्या कडेला किंवा बाजारात कपडा टाकून विकणे आणि त्याचा भाव ठरविण्याचा अधिकार ग्राहकास असणे हे कुठेतरी पवार यांना पटत नव्हते. म्हणून त्यांनी ठरविले की, शेतीमधील माल शेतकऱ्यांकडून खरेदी करून तो माल बाजारात विक्री करणे. परंतु यासाठी आर्थिक निधी पाहिजे, असल्याने त्यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या शासकीय योजनेशी संपर्क साधला. त्यानुसार हाशिवरे, वाघोली, नारंगी, चिंचवली या आदिवासीवाडीवरील बांधवांशी भेटून त्याचे महत्त्व पटवून त्यांना एकत्र आणले. जमलेल्या ५०० सदस्यांकडून प्रत्येकी रु. एक हजार मात्र शेअर्स जमा केले. त्याचबरोबर शासकीय अनुदान मिळाले. अशाने डॉ. हार्मन आदिवासी फार्म्स प्रोड्युसर कंपनी, पळी येथे स्थापन केली. या कंपनीचे आदिवासी बंधू-भगिनी संचालक निवडले.सुरुवातीला कांदा, बटाटा, लसूण, फळे इत्यादी माल शेतकºयांकडून खरेदी करून तो माल बाजारभावापेक्षा कमी दराने विकणे असा उद्देश ठेवून ही संस्था कामाला लागली.

व्यवहारामध्ये दलाली नसल्याने शेतकºयांचा माल थेट ग्राहकाला विकून फायदा होत आहे.च्मॉल, बाजार समिती, उच्चभ्रू शीतगृह दुकाने यामधून विक्री केलेला माल कमी दरात खरेदी करून अवाढव्य किमती आकारून तोच माल ग्राहकाला विकणे ही शेतकºयांची होणारी पिळवणूक थांबेल. शासकीय मदतीने शेतकरी कंपन्या स्थापन करून आपल्यातच मालाची देवाणघेवाण करून शेतीमाल विकणे यामुळे स्थानिक शेतकºयांना फायदा होणार आहे. या कंपनीमुळे येथील शेतकºयांना आपल्या शेतमालासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे आणि सेंद्रिय व उच्च प्रतीचा ताजा स्वच्छ भाजीपाला व फळे या कंपनीतून ग्राहकांना मिळणार आहेत.कारली, पडवळ विदेशातच्तालुक्यातील दुधी, कारली व पडवळ अशा प्रकारची भाजी कुवेत देशात कंपनीमार्फत निर्यात केली आहे. तिथून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक अडचण भासत असल्यामुळे व्यवसाय वाढविण्यावर अडचण येत आहे. परंतु व्यवसायवृद्धी कशी होईल, या दृष्टीने प्रयत्नात आहोत, असे अध्यक्ष पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबई