शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आगरदांडा टर्मिनसचे काम ठप्प

By admin | Updated: April 12, 2016 00:59 IST

बालाजी इन्फ्राप्रोजेक्ट लि. शी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने २००२ मध्ये बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर मुरुड तालुक्यातील राजपुरी खाडीजवळ राज्यातील कोळशासह

- मेघराज जाधव, मुरुडबालाजी इन्फ्राप्रोजेक्ट लि. शी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने २००२ मध्ये बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर मुरुड तालुक्यातील राजपुरी खाडीजवळ राज्यातील कोळशासह विविध वस्तूंची वाहतूक करण्यासाठी पहिलेच दिघी बंदर आगरदांडा येथे उभारले. संपूर्ण तालुक्याची अर्थव्यवस्था बदलून सर्वांगीण विकासाचे स्वप्न दाखवले गेले. परंतु दिघी पोर्टच्या अकार्यक्षमतेमुळे सुमारे दोन वर्षांपासून आगरदांडा टर्मिनसचे काम पूर्णपणे ठप्प झाले. यामुळे हजारो कामगारांसह ठेकेदार, व्यावसायिक बेकारीच्या गर्तेत अडकले आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर अपुऱ्या पोर्ट संबंधित सुविधांचा विचार करून १९९६ मध्ये महाराष्ट्र शासनाने समुद्र किनाऱ्यावर नव्याने बंदरे विकसित करण्याचे धोरण आखले. या धोरणानुसारच सरकारी व खासगी भागीदारीमध्ये सात बंदरे विकसित करण्याचे ठरविले. दिघी बंदर हा त्यापैकी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प. भारत व जपान सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या दिल्ली ते मुंबई यांना जोडणारा औद्योगिक मार्गाच्या प्रकल्पात दिघी बंदर हे विशेष आर्थिक केंद्र (एसईझेड) म्हणून ओळखले जाणार होते. या प्रकल्पात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे केंद्र सरकारला हा प्रकल्प रद्द करावा लागला. अन्यथा ४ मिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित होती. दिघी बंदर पूर्णत: विकसित होईल त्यावेळी महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांना दरवर्षी सुमारे १ कोटी तर केंद्र सरकारला दरवर्षी पाच कोटी रेव्हेन्यू मिळणे प्रस्तावित आहे. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार तसेच या प्रभावित क्षेत्रात असणाऱ्या गावांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सी.एस.आर.) मुळे गावकऱ्यांना पायाभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे, मात्र या मूलभूत सुविधाही मिळाल्या नाहीत. सुरुवातीला आगरदांडा ग्रामस्थांमध्ये प्रकल्प येऊ घातला त्यावेळी स्थलांतरित व्हावे लागेल, विस्थापित व्हावे लागले अशी भीती होती, त्यामुळे त्यांनी विरोध केला, मात्र स्थलांतरित व्हावे लागणार नाही हा विश्वास दिघी पोर्ट प्रशासनाने दिल्यावर विरोध निवळला. त्यानंतर दिघी पोर्ट लि. ने ग्रामपंचायतींबरोबर ७ नोव्हेंबर २००९ मध्ये करार केला. हमीपत्रावर तब्बल २३ अटी मान्य केल्या. समुद्रात भराव टाकण्याचे काम पूँज लॉईड कंपनीने ३ ते ४ वर्षे युध्दपातळीवर केले. त्यानंतर डीबीएम कंपनी आली, तीही काम सोडून गेली. भराव टाकण्यासाठी जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे ठेकेदार पुढे आले. मात्र दिघी पोर्ट कंपनीने स्थानिक लहान मोठ्या व्यावसायिकांसह ठेकेदारांचे १५ कोटी रुपये थकविल्याने काम बंद केले आहेउपोषणाचा इशाराबालाजी इन्फ्रा कं. कडे ठेकेदार म्हणून केलेल्या कामाचे बिल मागायला गेलो असता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उलट दमदाटी केली आणि माझ्या विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असल्याचे आगरदांड्याचे उपसरपंच युसूफ अर्ज बेगी यांनी सांगितले. स्थानिक ७० ते ८० जणांचे पेमेंट दिले नाही तर मी स्वत: आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा अर्ज बेगी यांनी दिला. दिघी पोर्ट लि. चे व्यवस्थापकीय संचालक विजय कलंत्री म्हणाले की, आगरदांडा प्रोजेक्ट एक महिन्यानंतर सुरू करू. काही बाबींची पूर्तता बाकी होती. ठेकेदारांचे कुठलेही पेमेंट कंपनीकडे बाकी नाही.२००९-२०१० पासून शासनाने बजेटमध्ये दिघी प्रकल्पासाठी आजपर्यंत कुठलीही तरतूद न केल्याने रस्ते तयार होऊ शकले नाही. तरतूद केली असती तर प्रकल्पाचे काम जोरदार सुरू झाले असते तर आज हजारो हातांना काम मिळाले असते, विकास झाला असता असे ते म्हणाले.दिघी पोर्टच्या विकासकांची भूूमिका प्रामाणिक नाही. प्रकल्प सुरू होण्यापूर्वीचे रस्ते, पाणी मूलभूत सुविधा करायला हव्या होत्या. मात्र सर्व नियम पायदळी तुडविले आहेत. - पंडित पाटील, आमदारमोठा प्रकल्प येणार म्हणून हॉटेल, लॉजिंग, कँटिंग, ट्रक्स आदि व्यवसायासाठी बँकेचे कर्ज काढले. कंपनी बंद पडल्याने आगरदांडा, नांदले, चिंचघर ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली. - अश्विनी जाधव, सरपंच