शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

७० टक्के युवक पब्जीच्या आहारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 06:51 IST

लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष दाखविले जात आहे. त्यामधून ही पिढी मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम होत चालली असून, ७० टक्के युवावर्ग पब्जी या खेळाच्या आहारी गेला आहे.

निखिल म्हात्रेअलिबाग : सध्या पब्जी या खेळाने यंगीस्थानात रान माजविलेले आहे. त्यामुळे पब्जी या खेळाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत प्रयत्न सुरू असताना, या खेळाच्या आॅनलाइन स्पर्धांना उधाण आले आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष दाखविले जात आहे. त्यामधून ही पिढी मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम होत चालली असून, ७० टक्के युवावर्ग पब्जी या खेळाच्या आहारी गेला आहे.सध्याच्या युवावर्गाचा आवडता गेम म्हणजे प्लेयर्स अननोन बॅटलग्राउंड अर्थात पब्जी हा आॅनलाइन खेळ, पालक आणि शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. या खेळामुळे तरुणांमध्ये नैराश्य आणि मानसिक ताण वाढत असल्याचे त्यातून दिसून येत आहे. रोज रात्री १० ते २ या वेळेत अनेक यूट्युब वाहिन्यांवर हिंदी आणि मराठीत पब्जीच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येते. दररोज साधारण ४० ते ५० हजार तरुण थेट प्रक्षेपण पाहतात. वाहिन्यांवर समालोचन करणारे तरुण हे नवे पब्जी स्टार म्हणून उदयास येत आहेत. त्यांना संकेतस्थळांच्या माध्यमातून २० रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम टीप देतात.पब्जी खेळाचा अतिवापर केल्यास तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन नैराश्य येऊ शकते. पालकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. अत्यावश्यक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी सांगितले. अभ्यास आणि सर्व दैनंदिन कामे संपवून नंतरच पब्जी गेम खेळावा. मैदानी खेळ हे मोबाइल खेळांपेक्षा महत्त्वाचे आहेत. जसा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो, तसेच पब्जीबाबतही होते, असे मी सातत्याने माझ्या फेसबुक पेजवर सांगत असतो. मात्र, ते आपण कितपत मनावर घ्यायचे, हे स्वत: ठरविले पाहिजे.>वेळीच मुलांना बाहेर काढणे गरजेचे - मानसोपचार तज्ज्ञस्पर्धेसाठी आॅनलाइन वॉररूम तयार करण्यात येते. स्पर्धा तीन ते चार तास चालते. शेवटी आॅनलाइन जिवंत राहणाऱ्या स्पर्धकाला पाच हजारांपासून ते एक कोटी रु पयांपर्यंत बक्षीस मिळते, असे सोशल मीडियावर सांगण्यात येते. तर मोठ्या पब्जी स्पर्धा जागतिक पातळीवर खेळल्या जातात. सर्वाधिक गुण मिळविणाºयाला थेट पब्जी फोरमतर्फे जागतिक पातळीवरच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते. समूहानेही सहभाग घेता येतो. त्यामुळे आॅनलाइन साखळीत आताची मुले अडकून पडली आहेत. त्यांना योग्य वेळीच यातून बाहेर काढणे अत्यावश्यक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ अमोल भुसारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.