शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
4
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
5
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
6
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
7
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
8
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
9
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
10
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
11
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
12
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
13
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
14
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
15
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
16
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
17
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
18
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
19
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
20
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना

७० टक्के युवक पब्जीच्या आहारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 06:51 IST

लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष दाखविले जात आहे. त्यामधून ही पिढी मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम होत चालली असून, ७० टक्के युवावर्ग पब्जी या खेळाच्या आहारी गेला आहे.

निखिल म्हात्रेअलिबाग : सध्या पब्जी या खेळाने यंगीस्थानात रान माजविलेले आहे. त्यामुळे पब्जी या खेळाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत प्रयत्न सुरू असताना, या खेळाच्या आॅनलाइन स्पर्धांना उधाण आले आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष दाखविले जात आहे. त्यामधून ही पिढी मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम होत चालली असून, ७० टक्के युवावर्ग पब्जी या खेळाच्या आहारी गेला आहे.सध्याच्या युवावर्गाचा आवडता गेम म्हणजे प्लेयर्स अननोन बॅटलग्राउंड अर्थात पब्जी हा आॅनलाइन खेळ, पालक आणि शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. या खेळामुळे तरुणांमध्ये नैराश्य आणि मानसिक ताण वाढत असल्याचे त्यातून दिसून येत आहे. रोज रात्री १० ते २ या वेळेत अनेक यूट्युब वाहिन्यांवर हिंदी आणि मराठीत पब्जीच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येते. दररोज साधारण ४० ते ५० हजार तरुण थेट प्रक्षेपण पाहतात. वाहिन्यांवर समालोचन करणारे तरुण हे नवे पब्जी स्टार म्हणून उदयास येत आहेत. त्यांना संकेतस्थळांच्या माध्यमातून २० रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम टीप देतात.पब्जी खेळाचा अतिवापर केल्यास तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन नैराश्य येऊ शकते. पालकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. अत्यावश्यक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी सांगितले. अभ्यास आणि सर्व दैनंदिन कामे संपवून नंतरच पब्जी गेम खेळावा. मैदानी खेळ हे मोबाइल खेळांपेक्षा महत्त्वाचे आहेत. जसा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो, तसेच पब्जीबाबतही होते, असे मी सातत्याने माझ्या फेसबुक पेजवर सांगत असतो. मात्र, ते आपण कितपत मनावर घ्यायचे, हे स्वत: ठरविले पाहिजे.>वेळीच मुलांना बाहेर काढणे गरजेचे - मानसोपचार तज्ज्ञस्पर्धेसाठी आॅनलाइन वॉररूम तयार करण्यात येते. स्पर्धा तीन ते चार तास चालते. शेवटी आॅनलाइन जिवंत राहणाऱ्या स्पर्धकाला पाच हजारांपासून ते एक कोटी रु पयांपर्यंत बक्षीस मिळते, असे सोशल मीडियावर सांगण्यात येते. तर मोठ्या पब्जी स्पर्धा जागतिक पातळीवर खेळल्या जातात. सर्वाधिक गुण मिळविणाºयाला थेट पब्जी फोरमतर्फे जागतिक पातळीवरच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते. समूहानेही सहभाग घेता येतो. त्यामुळे आॅनलाइन साखळीत आताची मुले अडकून पडली आहेत. त्यांना योग्य वेळीच यातून बाहेर काढणे अत्यावश्यक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ अमोल भुसारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.