शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

२७ टक्के पाणीच नागरिकांच्या वाट्याला

By admin | Updated: May 29, 2016 03:06 IST

कर्जत नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना १० वर्षांपूर्वी १४ कोटी १३ लाख रु पये खर्च करून पूर्ण करण्यात आली. २२ वर्षे रखडलेली ही पाणी योजना ‘लोकमत’च्या पाठपुराव्याने व लोकांच्या

- विजय मांडे, कर्जत

कर्जत नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना १० वर्षांपूर्वी १४ कोटी १३ लाख रु पये खर्च करून पूर्ण करण्यात आली. २२ वर्षे रखडलेली ही पाणी योजना ‘लोकमत’च्या पाठपुराव्याने व लोकांच्या रेट्याने कार्यान्वित झाली. परंतु दररोज पेज नदीपात्रातून सात एमएलडी म्हणजे सुमारे ७० लाख लीटर पाणी उचलले जाते, मात्र प्रत्यक्षात केवळ २७ ते २८ लाख लीटर पाणीच नागरिकांपर्यंत पोहोचते. उर्वरित ४२ लाख लीटर म्हणजे ६० टक्के पाणी कुठे मुरते, त्याची गळती किती होते, चोरी किती होते, हे शोधणे गरजेचे आहे. या प्रकारामुळे पाणीपट्टीची दरवाढ होऊन नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडतो. यापुढील महायुद्धे पाण्यासाठी होतील, अशी भाकिते काही वर्षांपूर्वी केली गेली. त्यावेळी ती भाकिते करणाऱ्यांना वेड्यात काढण्यात आले होते, परंतु आता त्या दृष्टीने परिस्थिती होऊ लागली आहे. या नदीचे पाणी पळव, त्या धरणातील पाणी अन्य ठिकाणी ने असे प्रकार सुरू झाल्याने ‘तो’ दिवस दूर नाही असे वाटू लागले आहे. संपूर्ण योजनेचा अभ्यास करून मनसेने तशा प्रकारचा अहवाल तयार करून नगर परिषदेला निवेदन दिले, तरीही त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदने देण्यात आली, परंतु अद्याप काहीही झाले नाही. पाणी योजनेची सद्य:स्थिती सादर करताना मनसेने आपल्या निवेदनात ४२ लाख लीटर पाणी वाया किंवा चोरीस जात असताना त्याचा भुर्दंड अन्य नागरिकांना का? असा प्रश्न उपस्थित के ला आहे. शिवाय ७० लाख लीटर पाणी आणण्यासाठी १८ ते २० तास पंप चालवावे लागतात. त्यांच्या देखभालीकडेही दुर्लक्ष होते. नाहक जास्त तास पंप चालल्याने विजेचे बिलही वाढते. वसुली सुद्धा १०० टक्के होत नाही. ६० टक्क्यांवर वसुली गेली नाही. त्यामुळे पाणीपट्टी वाढवूनही ही योजना दरवर्षी सुमारे एक कोटी रु पये तोट्यात आहे. २००६ मध्ये कर्जतची वाढीव पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली. त्यावेळी विरोध असताना सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ही योजना त्रुटी असतानाही नगरपालिकेने ताब्यात घेतली आणि तेथपासून ती तोट्यात आहे. आता तर तिचा तोटा कोटी रु पयांच्या घरात गेला आहे. तो भरून काढण्यासाठी शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेऊन पाणीपट्टी वाढ करण्यात येते. हा त्यावरील उपाय नाही. पाणीपट्टीवाढीला नागरिकांचा विरोध नाही, परंतु अनधिकृत नळजोडण्या, गळती व कथित चोरी याला आळा घालण्याची आवश्यकता आहे. पाणी मुरते कु ठे ?दररोज पेज नदीपात्रातून सात एमएलडी म्हणजे सुमारे ७० लाख लीटर पाणी उचलले जाते, मात्र प्रत्यक्षात केवळ २७ ते २८ लाख लीटर पाणीच नागरिकांपर्यंत पोहोचते. उर्वरित ४२ लाख लीटर म्हणजे ६० टक्के पाणी कुठे मुरतेपाणी योजना पूर्ण करताना अनेकांनी प्रयत्न केले, परंतु कर्जत नगर परिषदेकडून गळती व होणाऱ्या पाणीचोरीवर अद्याप उपाय होत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीपट्टीवाढीला तोंड द्यावे लागते. आम्ही पाणी योजनेबाबतची माहिती उपलब्ध करून घेतली आहे व तसे जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिली आहे, परंतु काहीही होत नाही. आमची माहिती सिद्ध करण्याची जबाबदारी संपूर्णपणे आमची राहील.- प्रवीण गांगल, सचिव, रायगड जिल्हा मनसे नगर परिषदेच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून गळती काढण्यासाठी प्राधान्य दिले जाईल तसेच पाण्याची चोरी होत असल्यास त्याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.- दादाराव अटकोरे, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद