शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

२७ टक्के पाणीच नागरिकांच्या वाट्याला

By admin | Updated: May 29, 2016 03:06 IST

कर्जत नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना १० वर्षांपूर्वी १४ कोटी १३ लाख रु पये खर्च करून पूर्ण करण्यात आली. २२ वर्षे रखडलेली ही पाणी योजना ‘लोकमत’च्या पाठपुराव्याने व लोकांच्या

- विजय मांडे, कर्जत

कर्जत नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना १० वर्षांपूर्वी १४ कोटी १३ लाख रु पये खर्च करून पूर्ण करण्यात आली. २२ वर्षे रखडलेली ही पाणी योजना ‘लोकमत’च्या पाठपुराव्याने व लोकांच्या रेट्याने कार्यान्वित झाली. परंतु दररोज पेज नदीपात्रातून सात एमएलडी म्हणजे सुमारे ७० लाख लीटर पाणी उचलले जाते, मात्र प्रत्यक्षात केवळ २७ ते २८ लाख लीटर पाणीच नागरिकांपर्यंत पोहोचते. उर्वरित ४२ लाख लीटर म्हणजे ६० टक्के पाणी कुठे मुरते, त्याची गळती किती होते, चोरी किती होते, हे शोधणे गरजेचे आहे. या प्रकारामुळे पाणीपट्टीची दरवाढ होऊन नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडतो. यापुढील महायुद्धे पाण्यासाठी होतील, अशी भाकिते काही वर्षांपूर्वी केली गेली. त्यावेळी ती भाकिते करणाऱ्यांना वेड्यात काढण्यात आले होते, परंतु आता त्या दृष्टीने परिस्थिती होऊ लागली आहे. या नदीचे पाणी पळव, त्या धरणातील पाणी अन्य ठिकाणी ने असे प्रकार सुरू झाल्याने ‘तो’ दिवस दूर नाही असे वाटू लागले आहे. संपूर्ण योजनेचा अभ्यास करून मनसेने तशा प्रकारचा अहवाल तयार करून नगर परिषदेला निवेदन दिले, तरीही त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदने देण्यात आली, परंतु अद्याप काहीही झाले नाही. पाणी योजनेची सद्य:स्थिती सादर करताना मनसेने आपल्या निवेदनात ४२ लाख लीटर पाणी वाया किंवा चोरीस जात असताना त्याचा भुर्दंड अन्य नागरिकांना का? असा प्रश्न उपस्थित के ला आहे. शिवाय ७० लाख लीटर पाणी आणण्यासाठी १८ ते २० तास पंप चालवावे लागतात. त्यांच्या देखभालीकडेही दुर्लक्ष होते. नाहक जास्त तास पंप चालल्याने विजेचे बिलही वाढते. वसुली सुद्धा १०० टक्के होत नाही. ६० टक्क्यांवर वसुली गेली नाही. त्यामुळे पाणीपट्टी वाढवूनही ही योजना दरवर्षी सुमारे एक कोटी रु पये तोट्यात आहे. २००६ मध्ये कर्जतची वाढीव पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली. त्यावेळी विरोध असताना सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ही योजना त्रुटी असतानाही नगरपालिकेने ताब्यात घेतली आणि तेथपासून ती तोट्यात आहे. आता तर तिचा तोटा कोटी रु पयांच्या घरात गेला आहे. तो भरून काढण्यासाठी शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेऊन पाणीपट्टी वाढ करण्यात येते. हा त्यावरील उपाय नाही. पाणीपट्टीवाढीला नागरिकांचा विरोध नाही, परंतु अनधिकृत नळजोडण्या, गळती व कथित चोरी याला आळा घालण्याची आवश्यकता आहे. पाणी मुरते कु ठे ?दररोज पेज नदीपात्रातून सात एमएलडी म्हणजे सुमारे ७० लाख लीटर पाणी उचलले जाते, मात्र प्रत्यक्षात केवळ २७ ते २८ लाख लीटर पाणीच नागरिकांपर्यंत पोहोचते. उर्वरित ४२ लाख लीटर म्हणजे ६० टक्के पाणी कुठे मुरतेपाणी योजना पूर्ण करताना अनेकांनी प्रयत्न केले, परंतु कर्जत नगर परिषदेकडून गळती व होणाऱ्या पाणीचोरीवर अद्याप उपाय होत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीपट्टीवाढीला तोंड द्यावे लागते. आम्ही पाणी योजनेबाबतची माहिती उपलब्ध करून घेतली आहे व तसे जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिली आहे, परंतु काहीही होत नाही. आमची माहिती सिद्ध करण्याची जबाबदारी संपूर्णपणे आमची राहील.- प्रवीण गांगल, सचिव, रायगड जिल्हा मनसे नगर परिषदेच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून गळती काढण्यासाठी प्राधान्य दिले जाईल तसेच पाण्याची चोरी होत असल्यास त्याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.- दादाराव अटकोरे, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद