शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

आरक्षणाच्या १३३ जागा रिक्त

By admin | Updated: August 9, 2015 23:24 IST

नुकत्याच २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ८८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका पार पडल्या. यामध्ये विविध राजकीय पक्षांनी त्या-त्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले मात्र आरक्षणातील ११३ जागा

आविष्कार देसाई ,अलिबागनुकत्याच २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ८८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका पार पडल्या. यामध्ये विविध राजकीय पक्षांनी त्या-त्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले मात्र आरक्षणातील ११३ जागा अद्यापही रिकाम्याच राहिल्या आहेत. या जागांसाठी आवश्यक असणारे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने त्या-त्या आरक्षणातील उमेदवारांना आपल्या जातीचे प्रतिनिधित्व पुन्हा एकदा करता येणार नसल्याचे समोर आले आहे.आरक्षणातील उमेदवारांनी आतापासूनच जातीचे प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असले, तरी महादेव कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र प्रशासनाकडून प्राप्तच होत नाही. तर काहीजण जातीचे प्रमाणपत्रच काढून घेत नाहीत. त्यामुळे बहुतांश जागांवर हा घोळ सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. भारतीय घटनेने प्रत्येकाला मतदानाचा मूलभूत हक्क दिला आहे. त्याचप्रमाणे निवडणूक लढविण्याचाही हक्क दिला आहे. ग्रामपंचायतपासून ते लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सत्ता संघर्ष सुरु असतो. सर्वांना न्याय मिळावा, सर्वच समाजाचा सर्वसमावेशक विकास व्हावा, यासाठीच लोकशाही पध्दतीने होणाऱ्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, भटक्या जमाती, यासह खुल्या वर्गासाठीही आरक्षण ठेवले जाते. एखाद्या विशिष्ट जाती अथवा जमातीवर अन्याय होऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो. या आरक्षणाच्या माध्यमातून निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडे जात वैधता प्रमाण असणे आवश्यक असते. ते नसल्यास त्या उमेदवाराला निवडणूक लढविता येत नाही. रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, माणगाव आणि महाड या तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींमधील ८० प्रभागामध्ये २१३ सदस्य निवडून द्यावयाचे होते. जातीचे प्रमाणपत्र नसल्याने महाड तालुक्यात आरक्षणातील दोन जागा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे पेण, पनवेल, उरण, माणगाव, सुधागड, महाड, म्हसळा आणि श्रीवर्धन या तालुक्यातील एकूण ८८ ग्रामपंचायतींमध्ये १३० जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. विविध आरक्षणातील ११३ जागा रिक्त आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने महाड तालुक्यातील सर्वाधिक ५८ जागांचा समावेश आहे. त्याखालोखाल श्रीवर्धन -२३, माणगाव - ११, म्हसळा-७, पेण- ६, पनवेल- ५, उरण- २ आणि सुधागड तालुक्यातील एक जागा रिक्त राहिली आहे.दरम्यान, जातीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आरक्षणातील जागा अशाच वर्षानुवर्षे रिक्तच राहणार आहेत. याबाबत प्रशासन, सरकार आणि निवडणूक आयोगाने यातून मार्ग काढण्याची गरज आहे.