शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

महिला स्वच्छतागृहांची वानवा

By admin | Updated: January 7, 2015 22:52 IST

एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या बारामती शहरात महिलांसाठी मात्र केवळ ५ सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत.

प्रज्ञा कांबळे - बारामतीशहरातील वाढती लोकसंख्या, तसेच महिलांचा सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील वाढता वावर आणि त्यासाठी करावा लागणारा प्रवास लक्षात घेता शहरामध्ये महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह वापरायोग्य नसल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’च्या पाहणीत उघड झाली आहे. एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या बारामती शहरात महिलांसाठी मात्र केवळ ५ सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत.राज्य शासनाच्या २०१४ च्या महिला धोरणानुसार सार्वजनिक ठिकाणे, शासकीय-निमशासकिय कार्यालये, गृहनिर्माण संस्था आदी ठिकाणी महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृह उपलब्ध करावीत. तेथे पाण्याची व्यवस्था करावी, असे आदेश दिले आहेत. तशी व्यवस्था नसल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. बारामती शहरातील सद्य:स्थिती लक्षात घेता तहसील कचेरी, रेल्वे स्टेशन, नगरपालिका, गणेश भाजी मंडई, अशा प्रकारच्या शासकीय, निमशासकीय व सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय बिकट आहे. तसेच, या ठिकाणी पाण्याची पुरेशी सुविधाही नाही. घाणीच्या विळख्यात अडकलेल्या या स्वच्छतागृहांचा महिलांकडून वापरही होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांची कुचंबणा होते.बारामती बसस्थानकांत असलेल्या स्वच्छतागृहाची अवस्था अतिशय बिकट आहे. बारामती शहरात तालुक्यासह आसपासच्या परिसरातील ४० ते ४५ किमी अंतरावरून विद्यार्थिनी, महिला, शिक्षण, तसेच व्यवसायानिमित्त ये-जा करीत असतात. या दरम्यान जर या महिलांना स्वच्छतागृहाचा वापर करायचा असेल, तर त्या टाळतात. याचा त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असतो. मात्र, याचा वापर त्यांच्या दुरवस्थेमुळे या महिलांकडून टाळला जातो. पाण्याची गैरसोय, स्वच्छतेचा अभाव यामुळे या स्वच्छतागृहांचा वापर या महिला करीतच नाही. या सार्वजनिक ठिकाणांबरोबरच शहरातील सार्वजनिक उद्यानांतही वेगळे चित्र दिसत नाही. तिथेही स्वच्छतागृहांचा अभाव दिसून येतो. या उद्यानांमध्ये पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह यांची वानवाच दिसून येत आहे. शासनाच्या महिला धोरणानुसार महिलांचा प्रवास लक्षात घेता दर एक किमी अंतरावर स्वच्छतागृहे उभारण्याचे आदेश आहेत.या सर्वांचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. याबाबत ‘लोकमत’ने बारामतीतील महिलांशी संवाद साधला असता, अनेक बाबी उघडकीस आल्या आहेत. मुळातच हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यातच ग्रामीण भागातील महिला असो वा शहरातील तरुणी या विषयांवर बोलणे टाळतात. जर स्वच्छतागृहांचा वापर करायचा असेल, तर आम्ही घरी आल्यावरच वापर करतो. सारखे स्वच्छतागृहाचा वापर नको म्हणून तर आम्ही भरपूर पाणी पित नाही, कधी कधी तर आम्ही फक्त स्वच्छतागृहांचा वापर करायचा असेल, तर आम्ही चक्क ‘उपाहारगृहांत’जातो, त्यासाठी कधी कधी आम्हाला भरपूर पैसे खर्च करावे लागतात, पण त्यापेक्षा आम्ही स्वच्छता नसल्याने सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर कारणे टाळतो, अशा धक्कादायक प्रतिक्रिया या वेळी महिलांनी दिल्या. ...तर आरोग्यावर परिणामस्त्रीरोगतज्ज्ञांची याबाबत मते जाणून घेतली असता, बारामतीच्या महिला रुग्णालयातील डॉ. रेश्मा पाटील यांनी जर वेळेवर लघवीला गेले नाही किंवा जर ती साठून राहिली, तर त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. हे वारंवार होत असेल, तर यामुळे ‘किडनीस्टोन’ होण्याची भीती निर्माण होऊ शकते. तर, बारामतीतील प्रसूतितज्ज्ञ डॉ. माधुरी मोकाशी यांच्या मते लघवी हे ‘वेस्टज’ असल्याने लघवी साठवून ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. योग्य दखल घेणार...मात्र, अनेक बाबतीत मागास राहिलेल्या महिला बऱ्याचदा आपल्या आरोग्यबाबतीत उदासीन असतात. मात्र, नगरपालिकाही याबाबत उदासीन असल्याचे जाणवते. मुख्याधिकारी दीपक झिंझाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत चौकशी करून योग्य ती दखल घेतली जाईल, असे सांगितले.टाकीला गळतीशहरात शारदा प्रांगणात दोन, तर गणेश भाजी मंडईत तीन ‘युरेनिल्स’आहेत. या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे; तर काही स्वच्छतागृहांची दारे उघडी आहेत. त्यामुळे वापर टाळला जातो. ४बारामती शहरामध्ये महिलांसाठी असणाऱ्या ‘युरेनिल्स’ची संख्या फक्त पाच आहे, तर सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या २२२ आहेत.४बारामतीची लोकसंख्या १ लाख ९ हजार २८२ आहे. यात पुरुष ५५ हजार ९५३ आहेत, तर स्त्रियांची संख्या ५३ हजार २२६ आहे. ४या तुलनेत या ‘युरेनिल्स’चे प्रमाण नगण्य आहे. त्यातच या संख्येत बाहेरगावावरून येणाऱ्या विद्यार्थिनी तसेच महिलांची भर पडते.