शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

परदेशात गेल्यावर आपल्या माणसांची किंमत कळते; ‘शोध मराठी मनाचा’ परिसंवादात भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 17:23 IST

कोणत्याही प्रसंगात आपल्या हाकेवर धावून येणारे नातलग-मित्रमंडळी आपल्या आजूबाजूला असतात. पण परदेशात गेल्यावर आपल्या माणसांची किंमत अधिक कळते, अशा शब्दांत परदेशात स्थिरावलेल्या मराठी बांधवांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

ठळक मुद्दे‘शोध मराठी मनाचा’ या १५व्या जागतिक संमेलनात ‘समुद्रापलीकडे’ परिसंवादमान्यवरांनी परदेशातील स्थानिक भाषा आत्मसात करण्यावर दिला भर

पुणे : कोणत्याही प्रसंगात आपल्या हाकेवर धावून येणारे नातलग-मित्रमंडळी आपल्या आजूबाजूला असतात. पण परदेशात गेल्यावर आपल्या माणसांची किंमत अधिक कळते. परदेशात सुरुवातीच्या काळात आपल्या लोकांची उणीव खूप भासते. त्यामुळे आपले विचार, आपली आवड, आपले छंद याच्याशी मिळते जुळते असणाऱ्या लोकांबरोबर आपण मैत्री करून  निश्चितपणे ही उणीव भरून काढू शकतो. एकदा चांगल्या प्रकारे मैत्री झाली, की भाषा, धर्म, व्यवसाय,लिंग यापैकी कोणताच अडसर राहत नाही आणि आपणही मग त्यांच्यातलेच होऊन जातो, अशा शब्दांत परदेशात स्थिरावलेल्या मराठी बांधवांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.निमित्त होते, जागतिक मराठी अकादमीतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या १५व्या जागतिक संमेलनात आयोजित ‘समुद्रापलीकडे’या परिसंवादाचे. अमित केवल (फ्रान्स), बॉबी जाधव (अमेरिका), मंदार जोगळेकर (अमेरिका), योगेश दशरथ (नेदरलँड), सिद्धार्थ मुकणे (लंडन), आर्या तावरे (लंडन), डॉ. मकरंद जावडेकर (अमेरिका), डॉ. महेश लच्चनकर (अमेरिका), बाळ महाले (अमेरिका), पुष्कर मोरे (फ्रान्स), शरद मराठे, एलिझाबेथ डेव्हिड (इस्त्राईल), अविवा मिलर (इस्त्राईल) हे मान्यवर सहभागी झाले होते.केतन गाडगीळ आणि स्नेहल दामले यांनी त्यांच्याशी संवाद साधला. उद्योग-व्यवसायाची आपली म्हणून काही तत्वे असतात आणि या तत्वांना मुरड घालून काम करणे म्हणजे आपल्या उद्योग-व्यवसायाशी आणि पयार्याने स्वत: शी प्रतारणा करण्यासारखे आहे, असे परदेशी लोक मानतात. आपल्याकडे काही प्रमाणात पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, आपल्या उद्योग-व्यवसायाच्या तत्वांबद्दल आपण आग्रही राहिलो, तर परदेशी लोक त्याला निश्चितच दाद देतात,जागतिक व्यासपीठावर काम करणे हा आपल्यासाठी देखील संपन्न करणारा अनुभव असतो, याकडेही मान्यवरांनी लक्ष वेधले. परदेशातील काही गमती जमती सांगताना मान्यवरांनी परदेशातील स्थानिक भाषा आत्मसात करण्यावर भर दिला. इंग्रजीबरोबरच त्या ठिकाणची स्थानिक भाषा आपल्याला अवगत असेल, तर आपले काम अधिक सोपे होते. त्यासाठी सुरुवातीच्या काळात निदान रोजच्या व्यवहारातील शब्द माहिती करुन घेणे, त्यांचे उच्चार-अर्थ याविषयी जागरुकता बाळगणे आवश्यक असते. इंग्रजी ही जगाची भाषा असली तरी त्या ठिकाणची स्थानिक भाषा आपल्याला थोडी  येत असली तरी स्थानिक लोकांशी आपण पटकन जोडले जातो. अन्यथा खाणाखुणा करून बोलताना आपली चांगलीच तारांबळ उडते अशी काहीशी मिश्किल टिपण्णीही करण्यात आली. 

टॅग्स :Puneपुणे