शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या वाट्याला आलंय पशूंच जिणं

By admin | Updated: May 23, 2016 01:49 IST

घराला चारही बाजूंनी पत्रे, हवा येण्यास जागा नाही. बाहेर तळपते ऊन, पत्र्याच्या घरात असह्य होणारा उकाडा अशा स्थितीत घराबाहेर थांबून दिवस काढता येतो.

पिंपरी : घराला चारही बाजूंनी पत्रे, हवा येण्यास जागा नाही. बाहेर तळपते ऊन, पत्र्याच्या घरात असह्य होणारा उकाडा अशा स्थितीत घराबाहेर थांबून दिवस काढता येतो. परंतु, तापलेल्या पत्र्याखाली रात्री घरात थांबणे कठीण होते. नदीकाठचा परिसर असल्याने डासांचा उपद्रव सहन करावा लागतो. वीज नसल्याने डासांच्या त्रासापासून मुक्ततेसाठी केले जाणारे उपाय तोकडे पडतात. ‘आम्हीसुद्धा माणसं आहोत’ हे टाहो फोडून सांगण्याची वेळ आता पिंपरी, मिलिंदनगर येथील पत्राशेडच्या रहिवाशांवर आली आहे. परिसरात एक बालक फाटक्या साडीने तयार केलेल्या झोक्यात झोके घेत होते. झोके कसले, घरात गुदमरते म्हणून ते मोकळ्या हवेत आले होते. सिंधू काळे ही वृद्ध महिला घराच्या दारात बसली होती. अगोदरच आजारी, त्यात खुराड्यात राहिल्यासारखे पत्र्याच्या घरात कोंडून आजारपण वाढू शकते. यामुळे घराच्या दारात बसल्याचे कारण त्या महिलने सांगितले. त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या कविता साबळे यांनीही अशीच व्यथा मांडली. चांगल्या इमारतीत राहणाऱ्यांना कुलर, पंखा वापरून उन्हाळ्याचा त्रास कमी करता येतो. परंतु, येथे वीजच नसल्याने उपकरणांचा वापर करता येत नाही. पत्राशेडमधील अन्य रहिवाशांना महापालिकेच्या पुनर्वसन प्रकल्पातील घरांमध्ये स्थलांतरित केले. आता केवळ ५० कुटुंबे उरली आहेत. त्यांच्या वाट्याला अत्यंत वाईट जीवन आले आहे. नदीकाठचा हा परिसर एकीकडे उकाड्याचा त्रास, तर दुसरीकडे डासांचा उपद्रव एकेक दिवस शिक्षा भोगल्याचा अनुभव येथील रहिवाशांना येत आहे, असे शकुंतला चव्हाण या महिलेने नमूद केले. (प्रतिनिधी)दिशाभूल, गैरसमजमिलिंदनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना काही पुढाऱ्यांनी दोन घरे देण्याचे आश्वासन दिले होते. वास्तविक पाहता महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जे पात्र ठरले, त्यांनाच पुनर्वसन प्रकल्पातील घरांचे वितरण करण्यात आले आहे. परंतु, येथील रहिवाशांमध्ये पुढाऱ्यांच्या आश्वासनांमुळे गैरसमज पसरला आहे. आपणास दोन घरे मिळू शकतील ही आशा बाळगून रहिवाशी मिलिंदनगरची जागा सोडत नाहीत. ज्यांनी आश्वासन दिले, त्यांनी रहिवाशांची दिशाभूल केली आहे. त्यांच्यात गैरसमज पसरवला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशी आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल, आता थोड्याच संख्येने कुटुंब पत्राशेडमध्ये राहत आहेत. त्यामुळे या कमी संख्येने राहणाऱ्या कुटुंबांना दोन घरे देण्यास महापालिकेला अडचण येणार नाही, अशी त्यांनी मनाची समजूत करून घेतली आहे. त्यामुळे हाल अपेष्टा सहन करून ते जीवन कंठीत आहेत.पत्राशेडमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना गतवर्षी आॅगस्टमध्येच पुनर्वसन प्रकल्पातील घरांचा ताबा देण्याची तयारी महापालिकेने केली. लाभार्थींचा स्वहिस्सा भरून त्यांनी ताबा घ्यावा, अशा सूचना दिल्या. ज्यांना ५० हजारांपर्यंतच्या रकमेचा स्वहिस्सा रक्कम भरण्यास अडचणी आहेत, त्यांना कर्ज स्वरूपात ही रक्कम उपलब्ध करून देण्यास महापालिका तयार आहे. खुल्या वर्गातील रहिवाशांसाठी ५१ हजार, तर मागासवर्गीयांसाठी ४२ हजार रुपये स्वहिस्सा रक्कम निश्चित केली आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. जागा सोडण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे हालअपेष्टा सहन करत ते त्या ठिकाणी राहत आहेत.- मिनीनाथ दंडवतेसहायक आयुक्त, झोपडपट्टी पुनर्वसन विभाग