शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पत्रावळी नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 11, 2015 06:17 IST

लग्न असो, नामकरण असो वा कोणताही कार्यक्रम असो; त्यासाठी पंगतीला पत्रावळ असणे आवश्यक आहेत. पूर्वी पानाच्या पत्रावळी, द्रोणाशिवाय पंगती होत नसत.

शिवप्रसाद डांगे, रहाटणीलग्न असो, नामकरण असो वा कोणताही कार्यक्रम असो; त्यासाठी पंगतीला पत्रावळ असणे आवश्यक आहेत. पूर्वी पानाच्या पत्रावळी, द्रोणाशिवाय पंगती होत नसत. मात्र, आता सर्वत्र प्लॅस्टिकच्या पत्रावळी व द्रोण कमी भावात उपलब्ध होत असल्याने आणि त्याची फॅशन असल्याने पानांपासून बनविलेल्या पत्रावळी-द्रोण कालबाह्य होत असल्याचे चित्र ग्रामीण भागासह शहरातही दिसून येत आहे. मोहाच्या व पळसाच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण बनवल्या जात. या पत्रावळीत केलेले जेवण लोकांना स्वादिष्ट व चवदार वाटायचे. सकाळी जंगलात जाऊन पाने तोडून आणायची आणि मग दुपारी त्यापासून कुटुंबातील लहान-मोठ्यांना पत्रावळी बनविण्याचे काम मिळायचे. एक व्यक्ती १०० ते २०० पत्रावळी दिवसभर बनवीत असे. त्यापासून पैसा कमवायचे, मात्र यासाठी मेहनत खूप घ्यावी लागत असे. त्यासाठी वेळसुद्धा भरपूर लागायचा. पत्रावळी बनवून अनेक कुटुंबे यावर उदरनिर्वाह चालवीत असत. पत्रावळी बनवून थेट शहरातील बाजारात विकल्या जात असत. त्यामुळे अनेक कुटुंबांना रोजगार मिळत असे. आता यंत्राद्वारे प्लॅस्टिकच्या पत्रावळी व द्रोण अत्यंत कमी वेळात, कमी किमतीत, तसेच विविध रंगांत उपलब्ध होतात. कागद व प्लॅस्टिकच्या पर्यायात उपलब्ध होत असल्याने यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पत्रावळी बनवून आपला प्रपंच चालविणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर काहींना इतर व्यवसायांकडे वळावे लागले आहे. तरीही आज शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातसुद्धा पानाच्या पत्रावळी दिसून येत नाही. त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शालू, पैठणीलाच महिलांची पसंती१‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा’ पदरावरच्या जरतारीच्या नक्षीदार मोराने मोहित झालेल्या कन्येने आपल्या आईकडे पैठणी नेसण्याचा हट्ट धरल्याचे लडिवाळ चित्र उभे करणाऱ्या या गीताने अनेक वर्षे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. या अवीट गोडीच्या गीताप्रमाणे पारंपरिक शालू व पैठणीचा रुबाब अद्यापही लग्नसोहळ्यात कायम आहे. बदलत्या युगात कितीही नवनवीन व्हरायटी बाजारात येत असल्या, तरी दागिने, कपडे यात पारंपरिकतेलाच महिलांची पसंती आहे. ‘जुनं ते सोनं’ची प्रचिती अनेक समारंभांत दिसून येत आहे. २वधूसाठी पैठणीच हवी, असा हट्ट आजही अनेकजणी धरतात. पैठणी महाराष्ट्रातील भरजरी वस्त्रकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. पैठणी गर्भरेशमी असून, तिचा पदर संपूर्ण जरीचा असतो. काठ रुंद व ठसठसीत, वेलबुट्टीचे असतात. पैठणीच्या संपूर्ण काठावर दोन्ही बाजूंनी सारखीच वेलबुट्टी दिसणे, हे तिचे खास वैशिष्ट्य मानले जाते. विवाहप्रसंगी नववधूचा शृंगार गृहलक्ष्मीचा साज हीच पैठणीची पारंपरिक ओळख आहे. पैठणीच्या वीणेत व वाराणसीच्या शालूत बरेच साम्य आहे.विणकर रेशमी पोताखाली हव्या असलेल्या नक्षीकामाचे कागद ठेवून त्यानुसार काम करीत.