शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पत्रावळी नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 11, 2015 06:17 IST

लग्न असो, नामकरण असो वा कोणताही कार्यक्रम असो; त्यासाठी पंगतीला पत्रावळ असणे आवश्यक आहेत. पूर्वी पानाच्या पत्रावळी, द्रोणाशिवाय पंगती होत नसत.

शिवप्रसाद डांगे, रहाटणीलग्न असो, नामकरण असो वा कोणताही कार्यक्रम असो; त्यासाठी पंगतीला पत्रावळ असणे आवश्यक आहेत. पूर्वी पानाच्या पत्रावळी, द्रोणाशिवाय पंगती होत नसत. मात्र, आता सर्वत्र प्लॅस्टिकच्या पत्रावळी व द्रोण कमी भावात उपलब्ध होत असल्याने आणि त्याची फॅशन असल्याने पानांपासून बनविलेल्या पत्रावळी-द्रोण कालबाह्य होत असल्याचे चित्र ग्रामीण भागासह शहरातही दिसून येत आहे. मोहाच्या व पळसाच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण बनवल्या जात. या पत्रावळीत केलेले जेवण लोकांना स्वादिष्ट व चवदार वाटायचे. सकाळी जंगलात जाऊन पाने तोडून आणायची आणि मग दुपारी त्यापासून कुटुंबातील लहान-मोठ्यांना पत्रावळी बनविण्याचे काम मिळायचे. एक व्यक्ती १०० ते २०० पत्रावळी दिवसभर बनवीत असे. त्यापासून पैसा कमवायचे, मात्र यासाठी मेहनत खूप घ्यावी लागत असे. त्यासाठी वेळसुद्धा भरपूर लागायचा. पत्रावळी बनवून अनेक कुटुंबे यावर उदरनिर्वाह चालवीत असत. पत्रावळी बनवून थेट शहरातील बाजारात विकल्या जात असत. त्यामुळे अनेक कुटुंबांना रोजगार मिळत असे. आता यंत्राद्वारे प्लॅस्टिकच्या पत्रावळी व द्रोण अत्यंत कमी वेळात, कमी किमतीत, तसेच विविध रंगांत उपलब्ध होतात. कागद व प्लॅस्टिकच्या पर्यायात उपलब्ध होत असल्याने यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पत्रावळी बनवून आपला प्रपंच चालविणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर काहींना इतर व्यवसायांकडे वळावे लागले आहे. तरीही आज शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातसुद्धा पानाच्या पत्रावळी दिसून येत नाही. त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शालू, पैठणीलाच महिलांची पसंती१‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा’ पदरावरच्या जरतारीच्या नक्षीदार मोराने मोहित झालेल्या कन्येने आपल्या आईकडे पैठणी नेसण्याचा हट्ट धरल्याचे लडिवाळ चित्र उभे करणाऱ्या या गीताने अनेक वर्षे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. या अवीट गोडीच्या गीताप्रमाणे पारंपरिक शालू व पैठणीचा रुबाब अद्यापही लग्नसोहळ्यात कायम आहे. बदलत्या युगात कितीही नवनवीन व्हरायटी बाजारात येत असल्या, तरी दागिने, कपडे यात पारंपरिकतेलाच महिलांची पसंती आहे. ‘जुनं ते सोनं’ची प्रचिती अनेक समारंभांत दिसून येत आहे. २वधूसाठी पैठणीच हवी, असा हट्ट आजही अनेकजणी धरतात. पैठणी महाराष्ट्रातील भरजरी वस्त्रकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. पैठणी गर्भरेशमी असून, तिचा पदर संपूर्ण जरीचा असतो. काठ रुंद व ठसठसीत, वेलबुट्टीचे असतात. पैठणीच्या संपूर्ण काठावर दोन्ही बाजूंनी सारखीच वेलबुट्टी दिसणे, हे तिचे खास वैशिष्ट्य मानले जाते. विवाहप्रसंगी नववधूचा शृंगार गृहलक्ष्मीचा साज हीच पैठणीची पारंपरिक ओळख आहे. पैठणीच्या वीणेत व वाराणसीच्या शालूत बरेच साम्य आहे.विणकर रेशमी पोताखाली हव्या असलेल्या नक्षीकामाचे कागद ठेवून त्यानुसार काम करीत.