शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘उजनी’च्या पाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:21 IST

नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची भीती नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची भीती पळसदेव : उजनी जलाशयातील पाण्यावरती गडद हिरव्या ...

नागरिकांच्या आरोग्याला

धोका होण्याची भीती

नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची भीती

पळसदेव : उजनी जलाशयातील पाण्यावरती गडद हिरव्या रंगाचा तवंग निर्माण झाला आहे. हे पाणी पिण्यास तर सोडा, परंतु वापरण्यासही अशक्यप्राय बनले आहे. उजनीतील पाण्याला दुर्गंधी निर्माण झाली आहे. हे पाणी विषासमान बनल्याची भावना नागरिकांमध्ये पसरली आहे.

पुणे, सोलापूर आणि नगर या तीन जिल्ह्यांसह लातूर उस्मानाबाद जिल्ह्यांनादेखील उजनीचे पाणी पुरवले जाते. या भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान असलेले उजनी धरण सध्या शाप बनले आहे. धरणातील पाण्याच्या आधारावर गेले काही दशकांपासून राजकारण करणाऱ्या अनेकांनी विकासाच्या नावाखाली अनेक कंपन्या उभ्या केल्या. मात्र, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, कुरकुंभ एमआयडीसी भागातील अनेक केमिकल व रासायनिक कंपन्या यातून निघणारे रसायन व केमिकलयुक्त पाणी प्रक्रिया न करताच उजनीच्या पाण्यात सोडून देत आहेत. परिणामी उजनीतील धरणाचे पाणी प्रदूषित झाले आहे. जलचर प्राण्याचे जीवनदेखील धोक्यात आले आहे.

पाणी शुद्ध करण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने, तो वाचण्यासाठी त्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याऐवजी ते पाणी साठवून ठेवतात. तसेच, पावसाच्या दिवसांत नजीकच्या ओढ्या, नाल्यात सोडून दिले गेले. परिणामी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हेच प्रदूषित पाणी गेली पंधरा ते वीस वर्षांपासून उजनी धरणात येऊ लागल्याने या पाण्याचे दुष्परिणाम हळूहळू दिसू लागले. अनेक तालुक्यांची जीवनदायिनी असणाऱ्या उजनीतील पाणी प्रदूषित झाले आहे. याबाबत अनेक अहवाल शासनाला सादर केले आहे. मात्र परिस्थिती कायमच आहे. प्रदूषण मंडळाचे अधिकारी उजनीच्या प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या कंपन्यांकडे दुर्लक्ष का करतात, हा सवाल सध्या तरी निरुत्तरीतच आहे.

आता उजनीचे पाणी गडद हिरव्या रंगाच्या आॅइल पेंटप्रमाणे दिसत आहे. किनाऱ्यापासून मध्य भागापर्यंत हा हिरवट रंगाचा सायटा पसरलेले दिसत आहे. या विषारी प्रदूषित पाण्यामुळे उजनी धरणातील अनेक मासळीच्या जाती तर नष्ट झाल्याच आहेत. शिवाय धरणात येणाऱ्या अनेक पाणवनस्पतीही नष्ट झाल्या आहेत. तसेच या प्रदूषित पाण्यामुळे शेतीचा कस बिघडत चालला आहे.

उजनी धरणावर अनेक पाणी योजना कार्यान्वित आहेत, तर अनेक प्रास्ताविक आहेत. उजनीचे हे दूषित पाणी पिऊन नागरिकांच्या आतड्यांना सूज येणे, किडनी खराब होणे, मुतखडा होणे, शरीरावर डाग येणे, अंगाला खाज सुटणे यांसारखे आजार मोठ्या प्रमाणात असलेले रुग्ण उजनी काठावरील गावात आढळत असल्याचे पळसदेव येथील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अशोक होरणे यांनी सांगितले.

चौकट

दूषित मळीमिश्रित व केमिकलयुक्त पाणी धरण परिसरात सोडत असलेल्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करून उजनीतील पाणी प्रदूषण रोखण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रशासन केवळ बोटचेपे धोरण राबवण्यापलीकडे काहीच करत नसल्याचे वास्तव आहे. आज उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

फोटो : उजनी धारांच्या पाण्यावर आलेला हिरवट तवंग

३१०८२०२१-बारामती-११