शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

भ्रामक कल्पनांमुळे अशांतता

By admin | Updated: September 1, 2016 01:58 IST

जागतिकीकरणापूर्वी समाजमन शांत आणि स्वस्थ होते; त्यामुळे माणसे संगीत, साहित्य, कलेत रमत होती. नंतर पत, पैसा आणि प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांमुळे मन:शांती हरवत गेली

पुणे : जागतिकीकरणापूर्वी समाजमन शांत आणि स्वस्थ होते; त्यामुळे माणसे संगीत, साहित्य, कलेत रमत होती. नंतर पत, पैसा आणि प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांमुळे मन:शांती हरवत गेली आणि शाश्वत मूल्यांकडे नेणाऱ्या साहित्याची समाजाला ओढ वाटू लागल्यामुळेच ऐतिहासिक आणि पौराणिक साहित्यावर आधारित साहित्यकृतींचा खप वाढत असल्याचे निरीक्षण प्रसिद्ध कादंबरीकार राजेंद्र खेर यांनी नोंदविले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शिवाजी सावंत मित्र मंडळ यांच्या वतीने प्रसिद्ध कादंबरीकार राजेंद्र खेर यांना डॉ. सरोजा भाटे यांच्या हस्ते युगंधर सन्मान बुधवारी प्रदान करण्यात आला. या वेळी ‘आधुनिक युगातही ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवर आधारित साहित्यकृतीकडे वाचकांचा ओढा जास्त का आहे?’ या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जयराम देसाई उपस्थित होते. राजेंद्र खेर म्हणाले, ‘‘जागतिकीकरणाच्या वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी माणूस पत, पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे धावत राहिला. त्यामुळे शाश्वत मूल्यांकडे नेणाऱ्या साहित्याची समाजाला गरज वाटू लागली आहे. अध्यात्म्य, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांकडे समाज ओढला गेला आहे. आज प्राचीन विषय इंग्रजी साहित्यातही खपाचे ठरत आहेत. उत्क्रांतीइतकेच अपक्रांतीचे आकर्षण वाढत आहे. त्या भूमिकेतूनही या साहित्याचा वाचकवर्ग वाढतो आहे. शाश्वत मूल्यांकडे जाण्यासाठी बुद्धिनिष्ठा आणि भावही निर्माण झाला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रा. जोशी म्हणाले, ‘‘ सावंतांचा उल्लेख ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबरीकार म्हणून केला जातो; पण त्यांची लेखणी पुराण, इतिहास आणि वर्तमान अशा तिन्ही काळांना स्पर्श करणारी होती.’’ वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले.