शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

भ्रामक कल्पनांमुळे अशांतता

By admin | Updated: September 1, 2016 01:58 IST

जागतिकीकरणापूर्वी समाजमन शांत आणि स्वस्थ होते; त्यामुळे माणसे संगीत, साहित्य, कलेत रमत होती. नंतर पत, पैसा आणि प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांमुळे मन:शांती हरवत गेली

पुणे : जागतिकीकरणापूर्वी समाजमन शांत आणि स्वस्थ होते; त्यामुळे माणसे संगीत, साहित्य, कलेत रमत होती. नंतर पत, पैसा आणि प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांमुळे मन:शांती हरवत गेली आणि शाश्वत मूल्यांकडे नेणाऱ्या साहित्याची समाजाला ओढ वाटू लागल्यामुळेच ऐतिहासिक आणि पौराणिक साहित्यावर आधारित साहित्यकृतींचा खप वाढत असल्याचे निरीक्षण प्रसिद्ध कादंबरीकार राजेंद्र खेर यांनी नोंदविले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शिवाजी सावंत मित्र मंडळ यांच्या वतीने प्रसिद्ध कादंबरीकार राजेंद्र खेर यांना डॉ. सरोजा भाटे यांच्या हस्ते युगंधर सन्मान बुधवारी प्रदान करण्यात आला. या वेळी ‘आधुनिक युगातही ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवर आधारित साहित्यकृतीकडे वाचकांचा ओढा जास्त का आहे?’ या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जयराम देसाई उपस्थित होते. राजेंद्र खेर म्हणाले, ‘‘जागतिकीकरणाच्या वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी माणूस पत, पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे धावत राहिला. त्यामुळे शाश्वत मूल्यांकडे नेणाऱ्या साहित्याची समाजाला गरज वाटू लागली आहे. अध्यात्म्य, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांकडे समाज ओढला गेला आहे. आज प्राचीन विषय इंग्रजी साहित्यातही खपाचे ठरत आहेत. उत्क्रांतीइतकेच अपक्रांतीचे आकर्षण वाढत आहे. त्या भूमिकेतूनही या साहित्याचा वाचकवर्ग वाढतो आहे. शाश्वत मूल्यांकडे जाण्यासाठी बुद्धिनिष्ठा आणि भावही निर्माण झाला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रा. जोशी म्हणाले, ‘‘ सावंतांचा उल्लेख ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबरीकार म्हणून केला जातो; पण त्यांची लेखणी पुराण, इतिहास आणि वर्तमान अशा तिन्ही काळांना स्पर्श करणारी होती.’’ वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले.