शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या पाण्याने बागा जगविण्याची वेळ

By admin | Updated: April 9, 2016 01:49 IST

परिसरामध्ये झालेल्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे पाण्याची पातळी खोल गेली आहे. दुष्काळामध्ये डाळिंबबागा जोपासणे शेतकऱ्यांपुढे एक आव्हान बनले आहे.

निमगाव केतकी : परिसरामध्ये झालेल्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे पाण्याची पातळी खोल गेली आहे. दुष्काळामध्ये डाळिंबबागा जोपासणे शेतकऱ्यांपुढे एक आव्हान बनले आहे. या परिस्थितीमध्ये बागा टिकवण्यासाठी येथील शेतकरी सध्या टँकरने पाणी घालून डाळिंबबागा सांभाळताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, पाण्याच्या शोधासाठी बोअरवेल, विहिरी खोदणे यासाठी कर्ज काढून लाखो रुपये मातीत घालत आहेत. मात्र, पाणीपातळी खोल गेल्याने पाणीच लागत नसल्याने या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. उन्हाळ्यात तोडणीला येणाऱ्या बागांना चांगला बाजार सापडतो. त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकरी एप्रिल, मेमध्ये बागातोडणीसाठी येण्याच्या हिशेबाने बागांची मशागत करतात. या बागा छाटणीपासून खते कीटकनाशके तसेच व इतर खर्च मोठ्या प्रमाणात होतो. डाळिंबबागा जोपासताना थोडाही हलगर्जीपणा शेतकरी करीत नाहीत. अशाच प्रकारे याही वर्षी शेतकऱ्यांनी या परिसरामध्ये आपल्या बागा जोपासल्या आहेत. परंतु, अचानक पाणीटंचाई निर्माण झाल्याने बागा जळून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बागांमध्ये दोनशे-अडीचशे ग्रॅम वजनाचा माल तयार झाला आहे; परंतू पाणीटंचाईच्या भयानक संकटामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जी पाणीटंचाई मे महिन्यामध्ये असते ती चालू वर्षी एक महिना आगोदर जाणवत आहे. यामुळे अनेक बागा पाण्याअभावी जळण्याची भीती निर्माण झाली आहे. बागा जोपासण्यासाठी आजपार्यंत झालेला खर्च मातीत जाणार असल्याचे चित्र सध्या या ठिकाणी आहे. (वार्ताहर)मात्र, अशा परिस्थितीही आपल्या बागा टिकवण्यासाठी मिळेल तेथून पाणी मिळवून टँकरने ते बागांना देण्याचा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहेत. याबाबत आधिक माहिती देताना निमगाव केतकी येथील डाळिंब उत्पादक शेतकरी दादासाहेब निवृती शेंडे यांनी सांगितले, की इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या चार-पाच वर्षांमध्ये डाळिंबाचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. हे क्षेत्र जवळपास २५ हजार एकरांवर झाले आहे. या वाढत्या क्षेत्राला पाण्याची अवश्यकता वाढली आहे. परंतु, सध्या उन्हाच्या दाहकतेमुळे पाणीपातळी खोल गेल्याने पाणीटंचाई निर्माण झाले आहे. याची झळ या भागातील डाळिंबबागांना बसत असल्याचे दिसत आहे. या पाणीटंचाईतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक मार्ग शोधले आहेत. यामध्ये शेततळ्याचा वापर ठिबक सिंचनासारखे प्रयोग करूनही शेतकऱ्यांच्या पाठीमागची साडेसाती संपत नाही, असे दिसत आहे. सध्या तर पाण्याची आधिकच गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा पाण्याअभावी जळताना दिसत आहे. काही शेतकरी मात्र टँकरने पाणी आणून बागा जगवण्यासाठी धडपड करीत आहेत. एक टँकर विकत घेण्यासाठी एक हजार दोनशे ते दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत. यामध्ये वाहतुकीचा खर्च होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याला कर्जबाजारी होण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे शेंडे यांनी सांगितले. डाळिंबबागांबरोबरच इतरही थोडीफार पिके शेतकऱ्यांकडे आहेत. परंतु, पाण्यासाठी सर्वच पिके जळताना दिसत आहेत. हे शेतकऱ्यांच्या डोळ्यांना बघवत नसल्याने काही शेतकरी बोरवेल घेत आहेत. तर, काही आपल्या जुन्या विहिरीतील गाळ काढणे व खोली वाढवणे आशी कामे करीत आहेत. शेतकऱ्यांना एक विंधन विहीर घेण्यासाठी व त्यामध्ये विद्युतपंप बसवण्यासाठी जवळपास ७० ते ८० हजारांपर्यंत खर्च करावा लागत आहे. हा खर्च कर्ज काढून शेतकरी करीत आहेत. मात्र, एवढा खर्च करूनही अनेक विधंन विहिरी तात्पुरत्या चालून बंद पडतात. यामुळे शेतकरी आणखी संकटात सापडतो.(वार्ताहर)