शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

कचरा डेपोचा विषय अधांतरीच

By admin | Updated: October 4, 2015 03:52 IST

फुरसुंगी व उरुळी कांचन येथे कचरा टाकण्यासाठी ग्रामस्थांनी महापालिकेला दिलेली मुदत संपत आल्यानंतर नव्या कचरा डेपोसंबंधी चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत या विषयावर

पुणे : फुरसुंगी व उरुळी कांचन येथे कचरा टाकण्यासाठी ग्रामस्थांनी महापालिकेला दिलेली मुदत संपत आल्यानंतर नव्या कचरा डेपोसंबंधी चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत या विषयावर काहीच निर्णय होऊ शकला नाही. त्या दोन्ही गावांमध्ये राज्य सरकारने सुचवलेली सर्व कामे महापालिकेने पूर्ण करीत आणल्यामुळे त्याची माहिती सरकारला देण्याचे बैठकीत ठरले.पुणे शहरातील काही कचरा खतासाठी दिल्यानंतर उरलेल्या सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेचे फुरसुंगी व उरळी कांचन येथे कचरा डेपो आहेत. या गावांमधील नागरिकांनी तिथे कचरा टाकण्यास महापालिकेला मनाई केली होती. महापालिकेने पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे साधारण ९ महिन्यांपूर्वी शहरात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली होती. ग्रामस्थांनी कचरा भरून आलेली महापालिकेची वाहने अडवून परत पाठवून देण्याचे आंदोलन सुरू केले होते. अखेरीस राज्य सरकारने यात हस्तक्षेप केला व दोन्ही गावांमध्ये महापालिकेने विकासकामे करावीत, त्यांना पाणीपुरवठा करावा व पुढील वर्षभरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आधुनिक मार्ग शोधावेत, अशी सूचना केली. त्यानुसार महापालिकेने या गावांमध्ये गेल्या ९ महिन्यांमध्ये साधारण ५४ कोटी रुपयांची विविध स्वरूपांची कामे केली असल्याचे प्रशासनाने आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यात कचरा डेपोपर्यंत जाण्यासाठी चांगल्या रस्त्यांबरोबर गावातील अंतर्गत रस्तेही करून दिले, समाजमंदिर बांधून दिले, असे सांगण्यात आले. त्याचबरोबर तिथे नियमितपणे पाण्याचे टँकरही पुरवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. नव्या कचरा डेपोसाठी महापालिकेने तळेगाव येथे जागा घेतली आहे. त्या जागेत आवश्यक त्या सोयी करण्याचे काम सुरू आहे. तसेच जास्तीतजास्त कचऱ्यावर प्रक्रिया व्हावी, तो उपयोगात यावा, यासाठी महापालिका खासगी संस्थांना तयार करीत आहे. काही उद्योगही यात स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहेत. महापालिकेने त्यासाठी एक समिती स्थापन केली असून, त्यांच्या समन्वयातून कचरा जिरवण्यासाठी महापालिका पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत आहे, असे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख किशोरी गद्रे यांनी सांगितले. प्रशासनाने दिलेल्या या माहितीनंतर पदाधिकाऱ्यांनी महापालिका तिथे सरकारच्या सूचनेप्रमाणे इतका खर्च करीत असेल, तर आता सरकारनेच यात हस्तक्षेप करावा, असा निर्णय घेतला. कचरा निर्मूलनासाठी म्हणूनच महापालिकेने तिथे जागा घेतली आहे. या कचऱ्याचा ग्रामस्थांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सरकारने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे पालन महापालिका करीत आहेत. तरीही ग्रामस्थांकडून कचरा टाकण्यास विरोध होत असेल, तर आता राज्य सरकारनेच हस्तक्षेप करण्याची गरज आहे. त्याप्रमाणे राज्य सरकारला महापालिका करीत असलेल्या सर्व प्रयत्नांची सविस्तर माहिती द्यावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.