शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:19 IST

अभिजित कोळपे करिअरच्या दृष्टीने उत्तम राजमार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा. स्पर्धा परीक्षा ही केवळ चांगल्या गुणांनी ...

अभिजित कोळपे

करिअरच्या दृष्टीने उत्तम राजमार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा.

स्पर्धा परीक्षा ही केवळ चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने गुणवत्तेचा कस लावणारी आहे. त्यात ग्रामीण आणि शहरी असा भेद मुळी होतच नाही. येथे फक्त गुणवत्ता तसेच अधिकारी पदासाठीची पात्रता पाहिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची भीती अथवा न्यूनगंड बाळगू नये, असा मोलाचा सल्ला केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातील (जीएसटी) पुण्याच्या सहआयुक्त वैशाली पतंगे विद्यार्थ्यांना देतात.

महाविद्यालयीन जीवनापासून माहिती घेत योग्य नियोजन करत अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत यश नक्की मिळू शकते. प्रत्येक विद्यार्थ्याने सर्वप्रथम ध्येय निश्चित करावे. यूपीएससीच्या अभ्यासक्रमाची मूळ पुस्तके आणि प्रश्नपत्रिकांचा सातत्याने सराव करावा. यासाठी इंटरनेट, शासकीय मासिके, विविध शासकीय संकेतस्थळांचा वापर आवश्यक आहे. ते जास्त विश्वासार्ह आणि सतत अपडेटेड असते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्य आणि परिश्रम हाच यशाचा राजमार्ग आहे, असा मोलाचा सल्लादेखील वैशाली पतंगे देतात.

विवाहानंतर यूपीएससीच्या परीक्षेत तब्बल पाच वेळा उत्तीर्ण होण्याची किमया वैशाली पतंगे यांनी केली आहे. तर त्याआधी एमपीएससी परीक्षेतही त्यांची निवड झाली होती. सातारा येथे त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून काही काळ काम केले आहे. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील दुर्गम अशा पाटण तालुक्यातील डोंगरांनी वेढलेले कुंभारगाव हे आहे. वडील शासकीय नोकरीत असल्यामुळे त्यांच्या बदलीच्या निमित्ताने पतंगे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले होते. त्यामुळे त्यांचे सर्व शिक्षण पुण्यात झाले. त्यांच्या वडिलांना वाचनाची मोठी आवड होती. लहानपणापासून त्यांनाही त्यामुळे साहित्याची आवड निर्माण झाली. त्यांच्या घरात सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक पुस्तकांचे ग्रंथालय आहे. शालेय वयापासूनच कथा, कादंबऱ्यापासून तत्त्वज्ञानापर्यंत अनेक प्रकारची पुस्तके त्यांनी शालेय जीवनात वाचून काढली होती.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम प्रचंड मोठा आहे. अनेकांना प्रश्न पडतो की, काय वाचावे आणि काय वाचू नये. स्पर्धा परीक्षेसाठी अनेक प्रकाशनांची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, ती सर्व पुस्तके वाचण्याआधी मूळ पुस्तके वाचणे आवश्यक आहे. बाजारातील इतर खासगी प्रकाशनांच्या पुस्तकांचा केवळ तज्ज्ञांच्या आणि यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सल्ल्याने वापर करावा. मुख्यत: एनसीईआरटीची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके तसेच शासकीय प्रकाशनांची पुस्तके वाचणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे यासाठी नियोजन फारच गरजेचे आहे. दिवसातील सलग १० ते १५ तास अभ्यास आवश्यक आहे. स्वयंअध्ययन, गटचर्चा करणे, इंटरनेटचा वापर करणे, शासकीय विविध संकेतस्थळांचा वापर करणे, बातम्या पाहणे, माहितीपट पाहणे आदी माध्यमातून अभ्यास करता येतो. मात्र, कोणते माध्यम आपल्याला सोयीचे आहे. हे प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवावे. पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी सातत्याने वैकल्पिक प्रश्न सोडवण्याचा सराव करणे आवश्यक आहे.

आपण ग्रामीण भागातून आहोत किंवा आपल्याला फाडफाड इंग्रजी बोलता येत नाही. मुलाखतीला जाताना भाषेचा कोणत्याही प्रकारे न्यूनगंड बाळगू नका. आपण कोणत्याही माध्यमातून (भाषा) मुलाखत देऊ शकतो. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर आपण जे ज्ञान मिळवले, त्याचा वापर कसा करू शकतो याची चाचणी म्हणजेच मुलाखत आहे. अंतिम मुलाखतीला जाण्यापूर्वी त्याचा वारंवार सराव मात्र गरजेचा आहे.

फोटो : वैशाली पतंगे