शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

शिवरायांनी मोरया गोसावींना दिली होती ९२ एकर इनामी जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:17 IST

-शिवरायांची दोन दुर्मीळ पत्रे उजेडात : अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिलेले पत्र पुणे : छत्रपती शिवाजी महाराज साधू-संतांचा योग्य सन्मान ...

-शिवरायांची दोन दुर्मीळ पत्रे उजेडात : अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिलेले पत्र

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज साधू-संतांचा योग्य सन्मान करीत असल्याचा पुरावा समेार आला आहे. शिवरायांनी चिंचवडचे महासाधू श्री मोरया गोसावी यांना बारामती तालुक्यातील लोणी भापकर या गावात १ चावर जमीन इनाम दिली होती. त्या इनामासंदर्भात माळेगाव बु. (ता. बारामती) येथील मोडी अभ्यासक व इतिहास संशोधक ॲड. ओंकार उदय चावरे यांना पुणे पुराभिलेखागार येथील दफ्तरात मोडी लिपीतील दोन अप्रकाशित व दुर्मीळ पत्रे सापडली. ही दोन्ही पत्रे शिवाजी महाराजांनी लोणी भापकर या गावच्या अधिकाऱ्यांना लिहिली होती.

लोणी भापकर हे गाव इ. स. १६४५-४६ मध्ये शहाजी महाराजांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना वैयक्तिक खर्चासाठी पोटमुकासा मिळाले होते. त्याच काळात शिवाजी महाराजांनी महासाधू मोरया गोसावींना या गावातील १ चावर म्हणजे आजच्या काळातील सुमारे ९२ एकर जमीन इनाम दिली होती. जमिनीची मोजणी होऊन हद्द निश्चित झाल्यानंतर, छत्रपती शिवरायांनी लोणीच्या हुद्देदार व मोकादमांना २० सप्टेंबर १६४६ रोजी हे पहिले पत्र लिहिले असल्याचे ॲड. चावरे यांनी सांगितले.

दुसरे पत्र देखील सन १६४६ सालातले आहे. या लोणी गावातील पिकांवर लावलेल्या करांपैकी काही विशिष्ट भाग हा ‘गला राजहिसा’म्हणजे धान्य स्वरूपातील राजाचा हिस्सा म्हणून कर रूपाने वसूल होत असे. मात्र, मोरया गोसावींच्या इनाम जमिनीवरील तो कर देखील शिवाजी महाराजांनी माफ करून तसे लोणी भापकर गावच्या हुद्देदार व मोकादमांना हे पत्र लिहिले होते. साधू संतांना, सत्पुरुषांना आपल्या घासातला घास देण्याचा शिवरायांचा हा पैलू या पत्रातून नव्याने समेार येतो. तसेच, या पत्रात महाराज तेथील अधिकाऱ्यांना आज्ञा देतात की, यापुढे ‘एक जरायासी तसवीस न देणे’म्हणजे यापुढे मोरया गोसावींना कणभरही त्रास होऊ देऊ नका, अशी आपल्या अधिकाऱ्यांना ताकीद देतात, अशी माहिती चावरे यांनी दिली.

---------------------------

पत्रातील वैशिष्ट्य :

* शिवरायांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी दिले होते पत्र.

* पत्राचा मायना ‘अजरख्तखाने’ या फारसी स्वरूपाचा.

* इनामापैकी एक चतुर्थांश भाग ‘खासा मिरासीपैकी’म्हणजे खुद्द महाराजांच्या वैयक्तिक बाबीतून दिला होता.

* राजाच्या खासगी उत्पन्नात जमा होणारा धान्य स्वरूपाचा करही महाराजांनी मोरया गोसावींना माफ केला हाेता.