शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

सात महिने अवकाळी; आता पावसाची दडी!

By admin | Updated: July 7, 2015 03:15 IST

नको तेव्हा पाऊस व हवा तेव्हा दडी... यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २0१४ व जानेवारी ते मे २0१५ असा गेल्या सात महिन्यांत दर महिन्याला अवकाळीचा फेरा सुरू होता

बापू बैलकर  पुणेनको तेव्हा पाऊस व हवा तेव्हा दडी... यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २0१४ व जानेवारी ते मे २0१५ असा गेल्या सात महिन्यांत दर महिन्याला अवकाळीचा फेरा सुरू होता. नको नको रे पावसा, असे तेव्हा बळीराजा म्हणत होता; मात्र तो थांबत नव्हता. आता ‘ये रे येर पावसा’ असे म्हणत असताना तो पडत नाही. काही वर्षांपासून वातावरणातील बदलामुळे हीच स्थिती जिल्ह्यात आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २०१४मध्ये जिल्ह्यात अवकाळी गारपिटीमुळे शेती व फळपिकांचे मोठे नुकसान झाले. यात ४ हजार ६८६ हेक्टरवली भात व द्राक्ष पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. सर्वाधिक फटका भातपिकाला बसला. सुमारे ४ हजार २३४ हेक्टरवरील भातपीक पाण्यात गेले. त्यानंतर २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी पुन्हा अवकाळी व गारपीट झाली. यात ५८ गावांतील १५ हजार ८९२ शेतकऱ्यांचे ६ हजार ३०५ हेक्टरवरील पिके व फळपिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा १० एप्रिल रोजी अवकाळी पाउस झाला. याचा कांदा, डाळिंबासह आंब्याला मोठा फटका बसला. हे चक्र गेले सात महिने सुरू होते. या वेळी बळीराजा ‘नको नको रे पावसा...’ अशी विनवणी करीत होता; मात्र तो नुकसान करीत राहिला. याचा खरीप व रब्बी हंगामांतील पिकांना मोठा फटका बसला होता. हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या आंदाजामुळे या वर्षीच्या शेतकऱ्यांच्या खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. कृषी विभागानेही जय्यत तयारी केली होती. ५ जूनला मॉन्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. तो काही ठिकाणी चांगला पडला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांची लगबग सुरू झाली. भाताचे ६२ हजार ३०० हेक्टर क्षेत्र असून, १०० टक्के क्षेत्रावर रोपवाटिका शेतकऱ्यांनी टाकल्या आहेत. त्याची रोपेही वर आली असून, पावसाची गरज आहे. बाजरीचे ७४ हजार १०० हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत २० हजार हेक्टरवर म्हणजे साधारण ३५ टक्के पेरणी झाली आहे. भुईमुगाचे ३८ हजार ३०० हेक्टर क्षेत्र असून, १२ हजार २०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे ७ हजार ४०० हेक्टर क्षेत्र असून, ७ हजार ३०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे २ हजार ७०० तसेच नाचणीचे १० हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. नाचणीच्याही रोपवाटिका शेतकऱ्यांनी टाकल्या आहेत. साधारण जिल्ह्यात ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३० ते ३५ टक्के पेरणी झाली आहे. मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. दोन दिवस दमदार पाऊस झाल्यानंतर त्याने विश्राती घेतली. मॉन्सून दाखल झाला; मात्र तो म्हणावा तसा बरसला नाही. पण, २५ जूननंतर तीन दिवस चांगला पाऊस पडला. त्याने जूनची सरासरी ओलांडली. मात्र, गेल्या १०- १२ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आहे.