शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

नीरा कालव्यातून 1 डिसेंबरपासून आवर्तन

By admin | Updated: November 24, 2014 23:29 IST

नीरा कालव्यातून रब्बी हंगामासाठी 1 डिसेंबरपासून 45 दिवसांची 2 आवर्तने सोडण्याचा निर्णय नीरा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला.

पुणो : नीरा कालव्यातून रब्बी हंगामासाठी 1 डिसेंबरपासून 45 दिवसांची 2 आवर्तने सोडण्याचा निर्णय नीरा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. येथील जलसंपदा भवनात कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या कालव्याच्या लाभक्षेत्रतील आमदार म्हणून अजित पवार या बैठकीस उपस्थित होते.
पुरंदर, भोर, बारामती या तालुक्यांतून नीरा कालव्याचे लाभक्षेत्र आहे. पवार यांच्यासह इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणो, भोरचे आमदार संग्राम थोपटे, तसेच अशासकीय सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पवार यांनी उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करावा, अशा सूचना केल्या. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे उपस्थित राहू शकले नाहीत. नीरा कालव्यातून निव्वळ सिंचनासाठी पाण्याचा उपसा होत असल्याने या बैठकीसाठी पालकमंत्र्यांची आवश्यकता नसते, असे सूत्रंनी सांगितले.
28 फेब्रुवारीर्पयत प्रत्येकी 3 अब्ज घनफूट (टि.एम.सी)ची 2 आवर्तने सोडावीत असा निर्णय यावेळी घेण्यात आला. कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस पवार उपस्थित झाल्याने जलसंपदा विभागातील अधिका:यांची काहीशी धांदल झाली.  दरम्यान, मुठा कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झालेली नाही.पालकमंत्र्यांची नियुक्ती झाल्यानंतर ही बैठक होऊ शकेल.या कालव्यातील पाण्याचे नियोजन उद्योग, सिंचन आणि पिण्याचे पाणी यासाठी केले जात असल्याने शहरातील सर्व आमदारांसह लाभक्षेत्रतील आमदारांना निमंत्रित केले जाते.
 
भामा आसखेडच्या पाण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे
 भामा आसखेड धरणातून पुणो महानगरपालिकेस पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. सिंचन पुनस्र्थापना खर्चापोटी महापालिकेने जलसंपदा विभागास 1क्क् कोटी रूपयांची मागणी केली आहे.मात्र महापालिकेने उत्पन्न नसल्याचे कारण दाखवित हा निधी देण्यास नकार दिल्याने हा विषय आता मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित गेला आहे.उद्या मुंबईत या विषयावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
 
महापालिका हद्दीत नव्याने 34 गावांचा समावेश होत असल्याने तसेचपालिका हद्दीजवळील 5 किलोमीटर र्पयतच्या गावांना पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्यामुळे शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी दरवर्षी पालिकेस सुमार े22.5क् टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे  महापालिकेस मुळशी धरणातूनही अतिरिक्त 5 टीएमसी पाणी देण्यात यावे, अशी मागणी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली आहे.  याबाबतचे पत्र मंगळवारी, दि. 25 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असल्याचे धनकवडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.