शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानाचा ग्रामीण भागातील प्रसार कौतुकास्पद

By admin | Updated: February 29, 2016 01:00 IST

आज आपण विज्ञानयुगात वावरत असलो, तरी विज्ञानाचा खरा प्रसार व प्रचार जुन्नर तालुक्यातील खोडद गावासारख्या ग्रामीण भागात उत्साहात केला जातो,

खोडद : ‘‘आज आपण विज्ञानयुगात वावरत असलो, तरी विज्ञानाचा खरा प्रसार व प्रचार जुन्नर तालुक्यातील खोडद गावासारख्या ग्रामीण भागात उत्साहात केला जातो, ही बाब अभिमानास्पद तर आहेच, शिवाय अविश्वसनीय आहे. जीएमआरटी प्रकल्पाच्या परिसरात राहणारे ग्रामस्थ व या प्रकल्पाशी असणारे त्यांचे नाते आणि सुसंवाद हा कौतुकास्पद वाटतो. जीएमआरटी प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यात औद्योगिकदृष्ट्या क्रांती झाली नसली, तरी या प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यातील पर्यावरण व शेती ही सुरक्षित असून, शुद्ध हवेचा श्वास येथे घेता येतो,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी येथे केले.जागतिक विज्ञानदिनानिमित्त खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पात आयोजित केलेल्या विज्ञानप्रदर्शनाचे उद्घाटन करताना राव बोलत होते. या वेळी जीएमआरटीचे अधिष्ठाता प्रो. यशवंत गुप्ता, जीएमआरटीचे मुख्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जे. के. सोळंकी, जीएमआरटीचे प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे, खोडदचे सरपंच विजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सौरभ राव म्हणाले, की जीएमआरटी प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्याचा वैज्ञानिकदृष्ट्या विकास झाला आहे. या प्रकल्पामुळेच तालुक्यातील शेतजमिनी सुरक्षित राहिल्या. या जमिनी प्रदूषणमुक्तदेखील आहेत.या विज्ञान प्रदर्शनात लहान-लहान मुलांनी आणलेले प्रकल्प व त्यांची विज्ञानाविषयीची आवड पाहून खूप आनंद वाटला. दर वर्षी विज्ञान प्रदर्शनात प्रकल्प आणणारे व विविध प्रयोग करणारे विद्यार्थी आपल्यासाठी अनमोल असून, भविष्यात ग्रामीण भागातून शास्त्रज्ञ निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. हा एवढा मोठा असूनही ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात नसणारा वाद ही समाधानकारक बाब आहे. जीएमआरटी प्रकल्पाकडे येणारे सर्व रस्ते ३.५० मीटर रुंदीचे असून, या रस्त्यांचे ५.७५ मीटरचे रुंदीकरण करण्यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले होते. रविवारी या प्रदर्शनाला ७ हजार विज्ञानप्रेमींनी भेट दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचा उच्च अभ्यासक्रम व करिअरबद्दल उपयुक्त माहिती मिळाली. या भागातील विद्यालय, महाविद्यालय व शाळांना गणित, भौतिक, रसायन व जीवशास्त्रातील प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रदर्शनातील प्रकल्पाची प्राथमिक (५ वी ते ७ वी), माध्यमिक (८ वी ते १० वी), उच्च माध्यमिक (डिप्लोमा/ डिग्री, बीएससी, एमएससी) आणि अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) अशा ४ गटामध्ये विभागणी केली होती. यातील प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट प्रकल्पासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी प्रशस्तिपत्रे देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटातून एक उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या (नोंदणीकृत) विद्यर्ऱ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचे जे. के. सोळंकी यांनी सांगितले. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आणलेल्या प्रत्येक प्रकल्पाची व प्रयोगाची जिल्हाधिकारी राव यांनी सखोल माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांकडून माहिती घेत असताना राव यांची जिज्ञासू वृत्ती, विज्ञान समजून घेण्याविषयीची आंतरिक ओढ, वयाने अगदी लहान असलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना असणारा आदर व आपुलकी, विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न किंवा शंका विचारण्याचे कौशल्य आदी बाबींचे या वेळी प्रकट दर्शन होत होते. बिबट्यांचा वावर, बिबट्यांकडून होणारे मानवी हल्ले, बिबट्यांपासून आपण आपले संरक्षण कसे करावे, शेतीमधील क्रांती, पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असलेला ऱ्हास, वातावरणात वेळोवेळी होत असलेले बदल, जीएमआरटीचे कार्य, पल्सार म्हणजे काय आदी बाबी या वेळी राव यांनी समजून घेतल्या.