शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

विज्ञानाचा ग्रामीण भागातील प्रसार कौतुकास्पद

By admin | Updated: February 29, 2016 01:00 IST

आज आपण विज्ञानयुगात वावरत असलो, तरी विज्ञानाचा खरा प्रसार व प्रचार जुन्नर तालुक्यातील खोडद गावासारख्या ग्रामीण भागात उत्साहात केला जातो,

खोडद : ‘‘आज आपण विज्ञानयुगात वावरत असलो, तरी विज्ञानाचा खरा प्रसार व प्रचार जुन्नर तालुक्यातील खोडद गावासारख्या ग्रामीण भागात उत्साहात केला जातो, ही बाब अभिमानास्पद तर आहेच, शिवाय अविश्वसनीय आहे. जीएमआरटी प्रकल्पाच्या परिसरात राहणारे ग्रामस्थ व या प्रकल्पाशी असणारे त्यांचे नाते आणि सुसंवाद हा कौतुकास्पद वाटतो. जीएमआरटी प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यात औद्योगिकदृष्ट्या क्रांती झाली नसली, तरी या प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यातील पर्यावरण व शेती ही सुरक्षित असून, शुद्ध हवेचा श्वास येथे घेता येतो,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी येथे केले.जागतिक विज्ञानदिनानिमित्त खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पात आयोजित केलेल्या विज्ञानप्रदर्शनाचे उद्घाटन करताना राव बोलत होते. या वेळी जीएमआरटीचे अधिष्ठाता प्रो. यशवंत गुप्ता, जीएमआरटीचे मुख्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जे. के. सोळंकी, जीएमआरटीचे प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे, खोडदचे सरपंच विजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सौरभ राव म्हणाले, की जीएमआरटी प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्याचा वैज्ञानिकदृष्ट्या विकास झाला आहे. या प्रकल्पामुळेच तालुक्यातील शेतजमिनी सुरक्षित राहिल्या. या जमिनी प्रदूषणमुक्तदेखील आहेत.या विज्ञान प्रदर्शनात लहान-लहान मुलांनी आणलेले प्रकल्प व त्यांची विज्ञानाविषयीची आवड पाहून खूप आनंद वाटला. दर वर्षी विज्ञान प्रदर्शनात प्रकल्प आणणारे व विविध प्रयोग करणारे विद्यार्थी आपल्यासाठी अनमोल असून, भविष्यात ग्रामीण भागातून शास्त्रज्ञ निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. हा एवढा मोठा असूनही ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात नसणारा वाद ही समाधानकारक बाब आहे. जीएमआरटी प्रकल्पाकडे येणारे सर्व रस्ते ३.५० मीटर रुंदीचे असून, या रस्त्यांचे ५.७५ मीटरचे रुंदीकरण करण्यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले होते. रविवारी या प्रदर्शनाला ७ हजार विज्ञानप्रेमींनी भेट दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचा उच्च अभ्यासक्रम व करिअरबद्दल उपयुक्त माहिती मिळाली. या भागातील विद्यालय, महाविद्यालय व शाळांना गणित, भौतिक, रसायन व जीवशास्त्रातील प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रदर्शनातील प्रकल्पाची प्राथमिक (५ वी ते ७ वी), माध्यमिक (८ वी ते १० वी), उच्च माध्यमिक (डिप्लोमा/ डिग्री, बीएससी, एमएससी) आणि अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) अशा ४ गटामध्ये विभागणी केली होती. यातील प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट प्रकल्पासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी प्रशस्तिपत्रे देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटातून एक उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या (नोंदणीकृत) विद्यर्ऱ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचे जे. के. सोळंकी यांनी सांगितले. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आणलेल्या प्रत्येक प्रकल्पाची व प्रयोगाची जिल्हाधिकारी राव यांनी सखोल माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांकडून माहिती घेत असताना राव यांची जिज्ञासू वृत्ती, विज्ञान समजून घेण्याविषयीची आंतरिक ओढ, वयाने अगदी लहान असलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना असणारा आदर व आपुलकी, विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न किंवा शंका विचारण्याचे कौशल्य आदी बाबींचे या वेळी प्रकट दर्शन होत होते. बिबट्यांचा वावर, बिबट्यांकडून होणारे मानवी हल्ले, बिबट्यांपासून आपण आपले संरक्षण कसे करावे, शेतीमधील क्रांती, पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असलेला ऱ्हास, वातावरणात वेळोवेळी होत असलेले बदल, जीएमआरटीचे कार्य, पल्सार म्हणजे काय आदी बाबी या वेळी राव यांनी समजून घेतल्या.