शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

विज्ञानाचा ग्रामीण भागातील प्रसार कौतुकास्पद

By admin | Updated: February 29, 2016 01:00 IST

आज आपण विज्ञानयुगात वावरत असलो, तरी विज्ञानाचा खरा प्रसार व प्रचार जुन्नर तालुक्यातील खोडद गावासारख्या ग्रामीण भागात उत्साहात केला जातो,

खोडद : ‘‘आज आपण विज्ञानयुगात वावरत असलो, तरी विज्ञानाचा खरा प्रसार व प्रचार जुन्नर तालुक्यातील खोडद गावासारख्या ग्रामीण भागात उत्साहात केला जातो, ही बाब अभिमानास्पद तर आहेच, शिवाय अविश्वसनीय आहे. जीएमआरटी प्रकल्पाच्या परिसरात राहणारे ग्रामस्थ व या प्रकल्पाशी असणारे त्यांचे नाते आणि सुसंवाद हा कौतुकास्पद वाटतो. जीएमआरटी प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यात औद्योगिकदृष्ट्या क्रांती झाली नसली, तरी या प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यातील पर्यावरण व शेती ही सुरक्षित असून, शुद्ध हवेचा श्वास येथे घेता येतो,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी येथे केले.जागतिक विज्ञानदिनानिमित्त खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पात आयोजित केलेल्या विज्ञानप्रदर्शनाचे उद्घाटन करताना राव बोलत होते. या वेळी जीएमआरटीचे अधिष्ठाता प्रो. यशवंत गुप्ता, जीएमआरटीचे मुख्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जे. के. सोळंकी, जीएमआरटीचे प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे, खोडदचे सरपंच विजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सौरभ राव म्हणाले, की जीएमआरटी प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्याचा वैज्ञानिकदृष्ट्या विकास झाला आहे. या प्रकल्पामुळेच तालुक्यातील शेतजमिनी सुरक्षित राहिल्या. या जमिनी प्रदूषणमुक्तदेखील आहेत.या विज्ञान प्रदर्शनात लहान-लहान मुलांनी आणलेले प्रकल्प व त्यांची विज्ञानाविषयीची आवड पाहून खूप आनंद वाटला. दर वर्षी विज्ञान प्रदर्शनात प्रकल्प आणणारे व विविध प्रयोग करणारे विद्यार्थी आपल्यासाठी अनमोल असून, भविष्यात ग्रामीण भागातून शास्त्रज्ञ निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. हा एवढा मोठा असूनही ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात नसणारा वाद ही समाधानकारक बाब आहे. जीएमआरटी प्रकल्पाकडे येणारे सर्व रस्ते ३.५० मीटर रुंदीचे असून, या रस्त्यांचे ५.७५ मीटरचे रुंदीकरण करण्यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले होते. रविवारी या प्रदर्शनाला ७ हजार विज्ञानप्रेमींनी भेट दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचा उच्च अभ्यासक्रम व करिअरबद्दल उपयुक्त माहिती मिळाली. या भागातील विद्यालय, महाविद्यालय व शाळांना गणित, भौतिक, रसायन व जीवशास्त्रातील प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रदर्शनातील प्रकल्पाची प्राथमिक (५ वी ते ७ वी), माध्यमिक (८ वी ते १० वी), उच्च माध्यमिक (डिप्लोमा/ डिग्री, बीएससी, एमएससी) आणि अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) अशा ४ गटामध्ये विभागणी केली होती. यातील प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट प्रकल्पासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी प्रशस्तिपत्रे देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटातून एक उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या (नोंदणीकृत) विद्यर्ऱ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचे जे. के. सोळंकी यांनी सांगितले. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आणलेल्या प्रत्येक प्रकल्पाची व प्रयोगाची जिल्हाधिकारी राव यांनी सखोल माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांकडून माहिती घेत असताना राव यांची जिज्ञासू वृत्ती, विज्ञान समजून घेण्याविषयीची आंतरिक ओढ, वयाने अगदी लहान असलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना असणारा आदर व आपुलकी, विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न किंवा शंका विचारण्याचे कौशल्य आदी बाबींचे या वेळी प्रकट दर्शन होत होते. बिबट्यांचा वावर, बिबट्यांकडून होणारे मानवी हल्ले, बिबट्यांपासून आपण आपले संरक्षण कसे करावे, शेतीमधील क्रांती, पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असलेला ऱ्हास, वातावरणात वेळोवेळी होत असलेले बदल, जीएमआरटीचे कार्य, पल्सार म्हणजे काय आदी बाबी या वेळी राव यांनी समजून घेतल्या.