शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

पुरोगामी विचारांचा भारतभर प्रसार पुण्यातूनच

By admin | Updated: March 16, 2017 01:47 IST

पुणे शहर समाजकारण आणि राजकारणाबाबत देशात आघाडीवर आहे. पेशवाई असलेल्या सनातनी पुण्यात निर्माण झालेल्या क्रांतिबीजाचा, समाजकारणाचा विचार करावा लागेल

पुणे शहर समाजकारण आणि राजकारणाबाबत देशात आघाडीवर आहे. पेशवाई असलेल्या सनातनी पुण्यात निर्माण झालेल्या क्रांतिबीजाचा, समाजकारणाचा विचार करावा लागेल, असे सांगून वैद्य म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांचा विचार त्यादृष्टीने मोलाचा आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांच्या ‘शतपत्रे’मधून अंधश्रद्धा, विकृत रूढी-रिवाज यांच्यावर कठोर हल्ले केले. महात्मा फुले यांनी केवळ विचार न मांडता कृतीतून सामाजिक सुधारणा केल्या. या सुधारणांना तेव्हा प्रचंड चालना मिळाली.१८४८मध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा याच पुण्यात सुरू केली. ती भारतीयांनी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा. सावित्रीबाई फुले यांना शिकवून मुलींना शिकविण्यासाठी तयार केले. त्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. फातिमाबी शेख यांनाही शैक्षणिक चळवळीत त्यांनी ओढून घेतले.’’भाई वैद्य म्हणाले, ‘‘आज देशात करोडो स्त्रिया शिकल्या. फार महत्त्वाच्या पदांवर काम करू लागल्या. बँका, वायुदल, लष्कर, राजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्या चमक दाखवीत आहेत. सुधारणेची इतकी मोलाची बीजे जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी रोवली. ते एवढेच करून थांबले नाहीत, तर १८५१मध्ये पददलितांसाठी शाळा सुरू करून त्यांनी सनातन्यांचा रोष ओढवून घेतला. चातुर्वर्ण्य निर्माण करून ब्राह्मणांनी विकृत रूढी-रिवाज निर्माण केले, याबद्दल बहुजन समाज जाब विचारू लागला. कालांतराने फुले यांचा विचार देशभर पोहोचला. अनेक राज्यांमध्ये त्यांचे वाङ्मय गेले. त्यांचे पुतळे उभारले गेले. त्यांच्या प्रभावामुळे बहुजन समाजातून अनेक नेते निर्माण झाले. शाहूमहाराज यांच्यावरही त्यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीला जोर चढला. या चळवळीचे पुणे हे केंद्र होते. जेधे बंधू यांच्या जेधे मॅन्शनमध्ये हे केंद्र कार्यान्वित होते.शाहूमहाराज यांच्या प्रभावामुळे सामाजिक सुधारणांना अधिक चालना मिळाली.’’ भाई वैद्य म्हणाले, ‘‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यताविरोधी चळवळ गतिमान केली. १९०६मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशन सुरू करून शिंदे स्वत: दलित वस्तीमध्ये राहिले. १९१७मध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावरून त्यांनी अस्पृश्यताविरोधी जाहीरनामा प्रकट केला. काँग्रेसच्या नेत्यांच्या त्यावर सह्या होत्या. त्यांचे कार्य पुणे शहरात असले, तरी देशभर त्याचा प्रभाव निर्माण झाला. या विविध प्रयत्नांमुळे पुणे शहर सामाजिक सुधारणांबाबत आघाडीवर राहिले. पेशवाईच्या पार्श्वभूमीवरच्या शैक्षणिक, समतेच्या चळवळी अत्यंत परिणामकारक ठरल्या. स्त्रिया, दलित आणि एकूणच बहुजन सक्रिय पद्धतीने या चळवळींमध्ये सहभागी झाला. पर्वतीवरच्या मंदिरातील दलितांच्या प्रवेशाची चळवळ एस. एम. जोशी, शिवराम जानकू कांबळे यांनी सुरू केली. ‘भाला’कार भोपटकर यांनी त्यांना विरोध केला; मात्र सुधारकांनी त्यांना जुमानले नाही.’’स्त्रियांच्या पुनर्विवाहाची चळवळ पुण्यातच सुरू झाली. मुस्लिम समाजात सुधारणा करण्यासाठी हमीद दलवाई यांनी याच पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून चळवळ सुरू केली. समान नागरी कायदा, तलाकविरोधी कायदा यांचा अंतर्भाव असलेल्या या चळवळीला आज जोर आला आहे. दलित समाजातील शिवराम जानकू कांबळे, न्यायमूर्ती भोळे, पां. ना. राजभोज असे नेते पुण्यात उदयास आले.’’