शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

आमच्या पाण्याचे नियोजन करा

By admin | Updated: August 21, 2015 02:34 IST

गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. मात्र, पाटबंधारे विभागाकडून पाण्याच्या नियोजनासाठी महापालिकेस

पुणे : गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. मात्र, पाटबंधारे विभागाकडून पाण्याच्या नियोजनासाठी महापालिकेस साधी पाणी नियोजनाची मागणीही करण्यात आलेली नाही. तर पालकमंत्र्यांनाही या स्थितीचे गांभीर्य नाही. त्यामुळे आता जलसंपदा खाते झोपले असले, तरी महापालिकेनेच पाण्याचे नियोजन सुरू करावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्य सभेत केली. मुख्य सभा सुरू होताच विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी शहराच्या पाण्याची स्थिती गंभीर असून, धरणांमध्ये अवघे ५० टक्के पाणी आहे. त्यामुळे महापालिकेचे नियोजन काय आहे, पाटबंधारे विभागाकडून पालिकेस किती पाणी दिले जाणार, पुणेकरांना कपातीची कल्पना देण्यासाठी काय नियोजन केले, याचा खुलासा करण्याची मागणी केली. या वेळी मनसेने पाण्यावर चर्चा करू नये अशी मागणी केली. पाण्यावर चर्चेसाठी खास सभा बोलविण्याची मागणी मनसेने केली असून, या सभेत ही चर्चा केली जावी अशी मागणी मनसेचे गटनेते बाबू वागसकर यांनी केली. तसेच ही चर्चा थांबविण्यासाठी सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीने या तहकुबीच्या विरोधात मतदान करून सूचना फेटाळून लावली. त्यानंतर पुन्हा पाण्यावरील चर्चेस सुरुवात करण्यात आली. या वेळी नगरसेवकांनी महापालिकेनेच नियोजन करावे अशी मागणी केली. ही पाण्याची स्थिती म्हणजे भविष्यातील पाणीटंचाईचे सावट असून महापालिकेने इतर पर्यायी स्रोतांची माहिती घेऊन त्याचा वापर सुरू करावा अशी मागणी उपमहापौर आबा बागूल यांनी केली. समान पाणीवाटप आणि गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक किशोर शिंदे, सचिन भगत, बाबूराव चांदेरे, सभागृह नेते बंडू केमसे यांनी केली. महापालिका तसेच जलसंपदा विभागाकडून दरवर्षी पाण्याचे एका वर्षासाठी नियोजन केले जाते. मात्र, पावसाची अनिश्चितता पाहता, यापुढे दोन वर्षांचे नियोजन केले जावे, अशी मागणी रिपाइंचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली. तसेच या पुढे महापालिकेने पाण्याची श्वेतपत्रिका काढावी असेही ते म्हणाले. शहरातील पाणीपुरवठा असमान असून, मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होते. तसेच पाणी बांधकामासाठी वापरले जाते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, जलतरण तलाव बंद करावेत, टँकरची पाणीचोरी थांबवावी, अशी मागणीही धेंडे यांनी या वेळी केली.(प्रतिनिधी)