शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

पालकांचा खिसा होतोय खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2016 01:06 IST

शासनाने संस्थाचालकांना उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फीचे निकष ठरवून दिले आहेत. मात्र, विनाअनुदानित तुकड्यांच्या नावाखाली पालकांची लूट केली जात आहे.

भोर : शासनाने संस्थाचालकांना उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फीचे निकष ठरवून दिले आहेत. मात्र, विनाअनुदानित तुकड्यांच्या नावाखाली पालकांची लूट केली जात आहे. यामुळे सर्वसामांन्य पालकांचा खिसा रिकामा होत असून, त्याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.राज्यातील मुलामुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून शासनाच्या शिक्षण विभागाकडून अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रामुख्याने यात मुलींना प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण मोफत देणारी एक योजना आहे; मात्र मुलींना या योजनेतून खरेच मोफत शिक्षण मिळते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने शिक्षण संस्थाचालकांना विनाअनुदानित तुकड्यांना (वर्गांना) मान्यता देऊन त्यांना एक प्रकारची वरकमाई करण्याचे साधन निर्माण करून दिले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.भोर तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे पाच ते साडेपाच हजार विद्यार्थी उच्च माध्यमिक शिक्षण घेत असून शासनाच्या या धोरणाचा फटका मुलामुलींना बसत आहे. अनेक संस्थाचालक दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली पालकांच्या पैशाची लूट करतात, तर काही संस्थांकडून फी घेतली जाते; मात्र तिची पावती दिली जात नाही. मग हे पैसे संस्थेला जातात की कुणाच्या खिशात, असाही प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत.या विषयाच्या तक्रारी अनेक पालक खासगीत करीत आहेत; मात्र आपल्या पाल्याचे नुकसान होऊ नये म्हणून उघड बोलत नाहीत. पण, काही जणांनी शिक्षण आयुक्त व शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करून संस्थांच्या चौकशीची मागणी केली आहे. यात भोर शहरातील काही संस्थांचा समावेश आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवरच शिक्षण संस्था चालत असून, शासन अनुदानित तुकड्यांची संख्या वाढविण्याऐवजी विनाअनुदानित तुकड्यांना मान्यता देत आहे. म्हणजे शासन खासगीकरणाचे धोरण आवलंबत आहे. संस्थाचालक विनाअनुदानित तुकड्यांच्या मान्यतेवर तुटपुंज्या पगारावर शिक्षक प्राध्यापकांची नेमणूक केली जाते. त्यासाठी लागणारा पैसा शासनाच्या फीच्या निकषाला बगल देऊन विविध मार्गांनी पालकांकडून वसूल केला जात आहे. यातूनच पालक व विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे चित्र भोर तालुक्यातील दुर्गम डोगरी भागातही पाहावयास मिळत आहे.तालुक्यात १३ उच्च माध्यमिक विद्यालये असून, ५ ते ६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर उच्च माध्यमिकमध्ये प्रवेश घेताना या विनाअनुदानित तत्त्वावरील तुकड्यांच्या नावाखाली खरे तर पालकांची लूट केली जात आहे. ११वी कला शाखेसाठी ३५० रुपये, वाणिज्यसाठी ६ हजार रुपये, विज्ञान शाखेसाठी ६,५०० रुपये अशी फी आकारण्याची परवानगी आहे. मात्र, संस्थाचालक सर्रास १२ ते १८ हजार रुपये फीची मागणी करून विद्यार्थ्यांची व पालकांची एकप्रकारे आर्थिक पिळवणूक करीत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता असतानाही त्याला आर्थिक परिस्थितीमुळे विज्ञान शाखेऐवजी कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यावा लागतो.