शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

पालखीरथाची होतेय आधुनिकतेकडे वाटचाल

By admin | Updated: July 6, 2015 04:12 IST

तुकोबारायांचा पालखी सोहळा आधुनिकतेशी जोडू लागला आहे. अशाच प्रकारे पालखी आणि पालखीरथ यामध्येही ठराविक कालावधीनंतर बदल होत आहेत.

मंगेश पांडे, पिंपरी तुकोबारायांचा पालखी सोहळा आधुनिकतेशी जोडू लागला आहे. अशाच प्रकारे पालखी आणि पालखीरथ यामध्येही ठराविक कालावधीनंतर बदल होत आहेत. बैलगाडी, लाकडी रथ अन् आता चांदीचा भव्य व नेत्रदीपक अशा रथातून पालखी पंढरीला जात आहे. तुकोबारायांचे चिरंजीव तपोनिधी नारायणमहाराज यांनी ३३० वर्षांपूर्वी पालखी सोहळा सुरू केला. नारायणमहाराज सुरुवातीला तुकोबारायांच्या पादुका डोक्यावर घेऊन पंढरीला जात. त्यांच्यानंतर देहूकर आणि भाविक बैलगाडीतून तुकोबारायांची पालखी पंढरीला नेत. नंतर लोखंडी रथ तयार करण्यात आला. त्यामध्ये काही वर्षे पालखी जात होती. १९६४ च्या सुमारास सागवानी लाकडाचा रथ तयार करण्यात आला. यामध्ये पालखी पंढरीला जाऊ लागली. दरम्यान, १९८५ मध्ये संस्थानने जर्मन सिल्व्हर आणि चांदी यांचा रथ तयार करण्याचा निर्णय घेतला. हा रथ तयार करण्यासाठी पावणेदोन वर्षांचा कालावधी लागला. यासाठी कर्नाटकातून १०४ घनफूट दांडेली टिकूड हे सागवान लाकूड आणले होते. त्यात ब्रह्मा, मलेशिया आणि दांडेली टिकूड असे प्रकार असून, दांडेली टिकूड हे उत्तम दर्जाचे लाकूड समजले जाते. या लाकडावर जर्मन सिल्व्हर आणि चांदी बसवून त्यावर सुबक नक्षीकाम करण्यात आले. यासाठी २२ किलो चांदी लागली. या रथाची बांधणी मूळचे गुजरातमधील महिसाणा येथील रमेश मिस्त्री यांच्या आजोबांनी केली. रथाची उंची ११ फूट ३ इंच होती. १९८७ ला रथाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर याच रथातून पालखी पंढरीला जात असल्याचे संस्थानाचे माजी विश्वस्त मुरलीधर पंढरीनाथ मोरे यांनी सांगितले. उत्तम दर्जाचे टायर, ब्रेक सिस्टीम रथाला बसविण्यात आल्याने घाटमार्ग असो अथवा खडतर मार्ग, रथ व्यवस्थित चालत होता. वीस वर्षे या रथातून पालखी पंढरीला नेली जात होती. दरम्यान, २००७ ला तुकोबारायांच्या चतु:शताब्दी जन्मसोहळ्याचे औचित्य साधून संस्थानने संपूर्ण रथ चांदीचा बनविण्याचा निर्णय घेतला. सुंदर व सुबक नक्षीकाम असावे, भव्यता असावी आदींचा विचार करून संस्थानने रथ तयार करण्याचे नियोजन केले. विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. तसेच पूर्वीच्या रथापेक्षा नवीन रथाचे वजन काही प्रमाणात कमी करण्यात आले. हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम बसविण्यात आली. २५१ किलो चांदी वापरण्यात आली. तसेच यंदाच्या वर्षीपासून रथावर ‘जीपीआरएस’ सिस्टीम बसविण्यात येणार आहे. यामुळे पालखी सोहळा कुठे आहे, मुक्काम कुठे असेल, याबाबत भाविकांना घरबसल्या माहिती मिळू शकणार आहे. ४पादुका ठेवण्यात येणारी पालखीदेखील पूर्वी पितळेची होती. अनेक वर्षे या पालखीत पादुका ठेवून भाविक पंढरीला जायचे. १९८५ च्या सुमारास चांदीची पालखी तयार करण्यात आली. ३५ घनफूट सागवानी लाकडापासून बनविलेली पालखी प्रशस्त असून वजनालाही जड आहे. ४यासाठी ३० किलो चांदीचा वापर करण्यात आला. आषाढीवारीच्या सोहळ्यानंतर ही पालखी दर्शनासाठी मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपात ठेवलेली असते.