शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादकांचे अनुदान कागदोपत्री

By admin | Updated: March 28, 2017 02:13 IST

शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले अनुदान कित्येक महिने लोटले तरीदेखील कागदोपत्रीच आहे.

कोरेगाव मूळ : शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले अनुदान कित्येक महिने लोटले तरीदेखील कागदोपत्रीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे अनुदान कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्याचबरोबर चालू हंगामातील कांद्याविषयी शासनाने ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कांद्यासंदर्भात शेतकऱ्यांनी केलेली विविध आंदोलने व मागण्यांची दखल घेऊन केंद्र व राज्य सरकारने अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र, काही अटी टाकल्या, यामध्ये शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना शेतातच विक्री केलेला कांदा त्यामधून वगळण्यात आला होता.मात्र, गतवर्षीच्या कांद्याला शासनाने जाहीर केलेले अनुदान, तसेच चालू वर्षीच्या कांद्याला पुन्हा अनुदान देण्यात यावे, अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. केंद्र व राज्य सरकार यांनी मिळून २०१५-२०१६ या वर्षी उत्पादित झालेल्या कांद्यास प्रतिकिलोस एक रुपया याप्रमाणे अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यामध्ये बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या, तसेच २०० क्विंटलपर्यंत व ठरवून दिलेल्या वेळेतच विक्री केलेल्या कांद्याला हे अनुदान जाहीर करण्यात आले होते.(वार्ताहर)नीचांकी भाव : शासनाचे चुकीचे धोरणकांद्याचे बाजारभाव तीस रुपयांपासून साठ रुपये प्रतिदहा किलोएवढे नीचांकी आहेत. त्यामुळे चाळीस ते पन्नास हजार रुपयेएवढा भरमसाट उत्पादन खर्च करूनही खर्च केलेले भांडवलदेखील वसूल होत नाही. या सर्व प्रकाराला शासनाची चुकीची निर्यात धोरणे जबाबदार असून, ती योग्य प्रकारे राबवण्याची गरज आहे. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना नीचांकी बाजारभावाला सामोरे जावे लागण्याची वेळ येत असेल, तर शेतकरी कर्जातून कधीच बाहेर पडणार नाही, अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात घर करू लागली आहे. अधिवेशन चालू असताना विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, असा मुद्दा लावून धरला होता. तोही शासनाकडून मान्य झाला नाही.बाजार समितीत कांदा पाठवण्यासाठीचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे त्यांनी कांदा शेतातच विक्री केला. हा कांदा जवळपास चाळीस ते पन्नास टक्केएवढा होता.या सर्व कांदा उत्पादकांना जाचक अटींमुळे शासनाने अनुदानापासून वंचितच ठेवले. २०१६-१७ या हंगामातील कांदा काढणी सुरू होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला. तरीही गतवर्षीच्या कांद्याचे अनुदान मिळत नसल्याने शासन शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूकच करीत आहे काय, असा सवाल शेतकऱ्यांना सतावत आहे. तसेच, चालू वर्षीदेखील कांद्याची परिस्थिती काही वेगळी नाही.