शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

दुसऱ्या वर्षीही कांदा रडवतोय!

By admin | Updated: March 10, 2017 04:49 IST

परिसरामध्ये सध्या रब्बी हंगामातील कांद्याची काढणी चालू आहे. सलग दुसऱ्या वर्षीही बाजारभाव नसल्याने कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.

निमोणे : परिसरामध्ये सध्या रब्बी हंगामातील कांद्याची काढणी चालू आहे. सलग दुसऱ्या वर्षीही बाजारभाव नसल्याने कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.सध्या रब्बी हंगामातील कांदाकाढणी चालू आहे. मात्र, गतवर्षीप्रमाणे याही वर्षी कांद्याला प्रतिकिलो ३ते ७ रुपये बाजारभाव मिळत असल्याने आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी अशीच स्थिती असल्याने गतवर्षीचेच कर्ज डोईवर असताना आणखी कर्जाचा नवा डोंगर उभा राहतो आहे. मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने, आजारपण, घरखर्चाबरोबरच बँका व सावकारांची देणी द्यावयाची तरी कशी, हा यक्षप्रश्न कायम आहे. कांद्याबरोबरच अन्य तरकारी मालासही मातीमोल भाव मिळत असल्याने पिके घ्यावीत तरी कोणती, असाही बळीराजाचा सवाल आहे. सतत दोन वर्षे कांदा शेतकऱ्यांना रडवत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांपेक्षाही बिकट झाली असून बळीराजाचे पुरते कंबरडे मोडले आहे. (वार्ताहर)कांदा उत्पादन खर्चिक व किचकट झाले आहे. एकरी खर्च नांगरट-२०००/-,पाळी - १०००/-, सारे पाडणे - ८००/-, रोपे-५०००/-, लागवड- ५०००/-, खुरपणी - २०००/-,खते-१०,०००/-, औषधे-२५००/-,काढणी-७०००/-,विजबिल -१०००/-, पाणी-३०००/-, बारदाणा-६०००/-, वाहतूक-८०००/-, हमाली-तोलाई-१५००/-.- असा साधारण कमीत कमी एकरी -५०,००० ते ५५, ००० रुपये खर्च येतो. शेतकरी रात्रंदिवस बायको मुलांसह शेतात राबतो याचा खर्च नाही. या एक एकर शेतीतून साधारण २०० (दोनशे) पिशवी म्हणजे दहा टन माल निघतो. शिवाय सर्व मालाची प्रतवारी सारखी नसते. फुट चिंगळी, गोलटी व मोठा कांदा असा माल निघतो. त्यामुळे प्रतवारीनुसार बाजारभाव मिळतो. सध्याच्या बाजारभावानुसार सरासरी ३ ते ७ रुपये प्रतिकिलोनुसार भाव मिळाल्यास उत्पादनखर्चही भागत नाही. एवढे कष्ट करूनही शेतकऱ्याच्या पदरी दमडीही पडत नाही. रस्त्यावर उतरावे लागेलकांद्यास एक रुपया प्रतिकिलो बाजारभाव ही बळीराजाची घोर थट्टा असून हे कुठेतरी थांबावे, अन्यथा शेतकऱ्यांस नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल, असाही इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.कांदा काढणीचा साधा खर्चही निघत नसल्याने या वर्षी दोन एकर कांद्यात नाईलाजाने बकऱ्या सोडल्या.- सुनील बांदल, करडे (कांदा उत्पादक)नीचांकी भावामुळे उत्पादन खर्चही भागात नसल्याने शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे.- नवनाथ गव्हाणे, निमोणे, कांदा उत्पादक ‘शासनाने या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्वरित निर्यात सुरू करावी व उत्पादनावर अनुदान द्यावे.- एकनाथ वाळुंज, शिंदोडी, कांदा उत्पादक कांद्याच्या कमी बाजारभावामुळे कांदा बियाणे व रोपे यांची विक्री पंच्याहत्तर टक्क्यांनी घटली. तयार रोपांमध्ये शेळ्यामेंढ्या सोडण्याची वेळ आली.-श्रीधर साळुंके, निमोणे, कांदा बियाणे व रोपे उत्पादक