शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

दुसऱ्या वर्षीही कांदा रडवतोय!

By admin | Updated: March 10, 2017 04:49 IST

परिसरामध्ये सध्या रब्बी हंगामातील कांद्याची काढणी चालू आहे. सलग दुसऱ्या वर्षीही बाजारभाव नसल्याने कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.

निमोणे : परिसरामध्ये सध्या रब्बी हंगामातील कांद्याची काढणी चालू आहे. सलग दुसऱ्या वर्षीही बाजारभाव नसल्याने कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.सध्या रब्बी हंगामातील कांदाकाढणी चालू आहे. मात्र, गतवर्षीप्रमाणे याही वर्षी कांद्याला प्रतिकिलो ३ते ७ रुपये बाजारभाव मिळत असल्याने आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी अशीच स्थिती असल्याने गतवर्षीचेच कर्ज डोईवर असताना आणखी कर्जाचा नवा डोंगर उभा राहतो आहे. मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने, आजारपण, घरखर्चाबरोबरच बँका व सावकारांची देणी द्यावयाची तरी कशी, हा यक्षप्रश्न कायम आहे. कांद्याबरोबरच अन्य तरकारी मालासही मातीमोल भाव मिळत असल्याने पिके घ्यावीत तरी कोणती, असाही बळीराजाचा सवाल आहे. सतत दोन वर्षे कांदा शेतकऱ्यांना रडवत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांपेक्षाही बिकट झाली असून बळीराजाचे पुरते कंबरडे मोडले आहे. (वार्ताहर)कांदा उत्पादन खर्चिक व किचकट झाले आहे. एकरी खर्च नांगरट-२०००/-,पाळी - १०००/-, सारे पाडणे - ८००/-, रोपे-५०००/-, लागवड- ५०००/-, खुरपणी - २०००/-,खते-१०,०००/-, औषधे-२५००/-,काढणी-७०००/-,विजबिल -१०००/-, पाणी-३०००/-, बारदाणा-६०००/-, वाहतूक-८०००/-, हमाली-तोलाई-१५००/-.- असा साधारण कमीत कमी एकरी -५०,००० ते ५५, ००० रुपये खर्च येतो. शेतकरी रात्रंदिवस बायको मुलांसह शेतात राबतो याचा खर्च नाही. या एक एकर शेतीतून साधारण २०० (दोनशे) पिशवी म्हणजे दहा टन माल निघतो. शिवाय सर्व मालाची प्रतवारी सारखी नसते. फुट चिंगळी, गोलटी व मोठा कांदा असा माल निघतो. त्यामुळे प्रतवारीनुसार बाजारभाव मिळतो. सध्याच्या बाजारभावानुसार सरासरी ३ ते ७ रुपये प्रतिकिलोनुसार भाव मिळाल्यास उत्पादनखर्चही भागत नाही. एवढे कष्ट करूनही शेतकऱ्याच्या पदरी दमडीही पडत नाही. रस्त्यावर उतरावे लागेलकांद्यास एक रुपया प्रतिकिलो बाजारभाव ही बळीराजाची घोर थट्टा असून हे कुठेतरी थांबावे, अन्यथा शेतकऱ्यांस नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल, असाही इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.कांदा काढणीचा साधा खर्चही निघत नसल्याने या वर्षी दोन एकर कांद्यात नाईलाजाने बकऱ्या सोडल्या.- सुनील बांदल, करडे (कांदा उत्पादक)नीचांकी भावामुळे उत्पादन खर्चही भागात नसल्याने शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे.- नवनाथ गव्हाणे, निमोणे, कांदा उत्पादक ‘शासनाने या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्वरित निर्यात सुरू करावी व उत्पादनावर अनुदान द्यावे.- एकनाथ वाळुंज, शिंदोडी, कांदा उत्पादक कांद्याच्या कमी बाजारभावामुळे कांदा बियाणे व रोपे यांची विक्री पंच्याहत्तर टक्क्यांनी घटली. तयार रोपांमध्ये शेळ्यामेंढ्या सोडण्याची वेळ आली.-श्रीधर साळुंके, निमोणे, कांदा बियाणे व रोपे उत्पादक