शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आई, नको ना सोडून जाऊस मला!

By admin | Updated: September 11, 2015 04:42 IST

बाबा, नका ना मला सोडून जाऊ..., आई लवकर ये ना परत..., मला तुझी फार आठवण येते..., निरागस बालकांचे रडणे असे काहीसे वातावरण शहरातील विविध भागांत पाहायला मिळते.

- सुवर्णा गवारे-नवले, पिंपरीबाबा, नका ना मला सोडून जाऊ..., आई लवकर ये ना परत..., मला तुझी फार आठवण येते..., निरागस बालकांचे रडणे असे काहीसे वातावरण शहरातील विविध भागांत पाहायला मिळते. बेरोजगारांसाठी पाळणाघर हा उत्पन्नाचा नवा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे पाळणाघरांची संख्या वाढली आहे. धकाधकीच्या जीवनात पाळणाघरे ही पालकांसाठी सोईस्कर आहेत, अशा प्रतिक्रिया पालकांनी दिल्या. पण बालकांच्या आरोग्यावर त्याचा दूरगामी परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी पती-पत्नी दोघेही नोकरीसाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे मुलाचे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यासाठी पाळणाघराचा पर्याय त्यांनी शोधला आहे. फ्लॅट, दोन रूमच्या खोल्यांमध्ये पाळणाघरे सुरूआहेत. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने ही बालके सुदृढ होत नाहीत. या बाबींकडे मात्र पालकांचे दुर्लक्ष होत आहे. ज्या वयात बालकाला योग्य संस्कार व आहाराची गरज असते, त्या वयातच ही बालके घरापासून दुरावली जातात. यामुळे मुलांचे मानसिक खच्चीकरण होते. मुले अबोल बनतात. हा कालावधी बौद्धिक विकासाचा असतो, असे आहारतज्ज्ञ डॉ. राम गुडगिला यांनी सांगितले.सकाळच्या वेळी मुले पाळणाघरात सोडली जात आहेत. सोबत खाण्यापिण्यासाठी मुलांना डबा दिला जातो. काही वेळा मुलांना स्वयंपाक बनवून देणे शक्य नसल्याने त्यांना पाळणाघरातील आया खाऊ तयार करून देतात. पाळणाघरात मुलांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या आहाराकडे व्यवस्थापकांना लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे मुलाची वाढ खुंटली आहे की, कुपोषणात्मक दृष्टीने काही समस्या मुलांच्या आहेत, अशा बाबींकडे कुटुंबीयाचे लक्ष असते. यामुळे अशा मुलांचा सांभाळ करणे अवघड होते. पाळणाघरात मूल तासावर ठेवण्याचेही पैसे घेतले जातात. काही ठिकाणी २००, तर काही ठिकाणी ५०० रुपये शुल्क आहे. तर काही पाळणाघरांचे मासिक शुल्क ५ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत आहेत. पाळणाघरात अगदी ६ महिन्यांपासून ते १२ वर्षांपर्यंतची मुले ठेवली जातात. पाळणाघरे ही फक्त मूल सांभाळणे व त्याची सुरक्षेची जबाबदारी घेणे एवढ्यापुरतीच मर्यादित आहेत. यापुढे जाऊन पाळणाघरात मनोरंजनाच्या दृष्टीने कोणतेही साधन नसते. शहरस्तरावर महापालिके चे एकही पाळणाघर नाही. पाळणाघरासाठी आलेल्या अर्जांपैकी एकही अर्ज पात्र ठरला नसल्यामुळे शासकीय पाळणाघरे शहरात नाहीत. नोकरी करीत असलेल्या पाच वर्षे वयाच्या आतील बालकांसाठी पाळणाघराची सुविधा आहे. बचत गट अथवा नोंदणीकृत संस्था तीन वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. किमान १५ बालके असणे आवश्यक आहे. विक्रीकर नंबर असलेले कोटेशन सादर केल्यानंतर १० हजार रुपये व इतर सुविधांसाठी १२ हजार रुपये सहा महिन्यांच्या टप्प्यावर दिले जातात.- संभाजी ऐवले, समाजविकास अधिकारी पाळणाघरे ही मुलांचा सांभाळ करण्यापुरती झाली आहेत. मुलांच्या आहाराकडे, शाळापूर्व शिक्षणाचा पाळणाघराशी काही संबंध नाही. पाळणाघर अर्थार्जनाचे साधन बनले आहे. शहरातील पाळणेघरे नोंदणीकृत नाहीत. शहरात दर्जेदार पाळणाघरे निर्माण होण्याची गरज आहे. - अच्युत बोरगावकर, अध्यक्ष, तथापि संस्था