शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

आई, नको ना सोडून जाऊस मला!

By admin | Updated: September 11, 2015 04:42 IST

बाबा, नका ना मला सोडून जाऊ..., आई लवकर ये ना परत..., मला तुझी फार आठवण येते..., निरागस बालकांचे रडणे असे काहीसे वातावरण शहरातील विविध भागांत पाहायला मिळते.

- सुवर्णा गवारे-नवले, पिंपरीबाबा, नका ना मला सोडून जाऊ..., आई लवकर ये ना परत..., मला तुझी फार आठवण येते..., निरागस बालकांचे रडणे असे काहीसे वातावरण शहरातील विविध भागांत पाहायला मिळते. बेरोजगारांसाठी पाळणाघर हा उत्पन्नाचा नवा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे पाळणाघरांची संख्या वाढली आहे. धकाधकीच्या जीवनात पाळणाघरे ही पालकांसाठी सोईस्कर आहेत, अशा प्रतिक्रिया पालकांनी दिल्या. पण बालकांच्या आरोग्यावर त्याचा दूरगामी परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी पती-पत्नी दोघेही नोकरीसाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे मुलाचे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यासाठी पाळणाघराचा पर्याय त्यांनी शोधला आहे. फ्लॅट, दोन रूमच्या खोल्यांमध्ये पाळणाघरे सुरूआहेत. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने ही बालके सुदृढ होत नाहीत. या बाबींकडे मात्र पालकांचे दुर्लक्ष होत आहे. ज्या वयात बालकाला योग्य संस्कार व आहाराची गरज असते, त्या वयातच ही बालके घरापासून दुरावली जातात. यामुळे मुलांचे मानसिक खच्चीकरण होते. मुले अबोल बनतात. हा कालावधी बौद्धिक विकासाचा असतो, असे आहारतज्ज्ञ डॉ. राम गुडगिला यांनी सांगितले.सकाळच्या वेळी मुले पाळणाघरात सोडली जात आहेत. सोबत खाण्यापिण्यासाठी मुलांना डबा दिला जातो. काही वेळा मुलांना स्वयंपाक बनवून देणे शक्य नसल्याने त्यांना पाळणाघरातील आया खाऊ तयार करून देतात. पाळणाघरात मुलांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या आहाराकडे व्यवस्थापकांना लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे मुलाची वाढ खुंटली आहे की, कुपोषणात्मक दृष्टीने काही समस्या मुलांच्या आहेत, अशा बाबींकडे कुटुंबीयाचे लक्ष असते. यामुळे अशा मुलांचा सांभाळ करणे अवघड होते. पाळणाघरात मूल तासावर ठेवण्याचेही पैसे घेतले जातात. काही ठिकाणी २००, तर काही ठिकाणी ५०० रुपये शुल्क आहे. तर काही पाळणाघरांचे मासिक शुल्क ५ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत आहेत. पाळणाघरात अगदी ६ महिन्यांपासून ते १२ वर्षांपर्यंतची मुले ठेवली जातात. पाळणाघरे ही फक्त मूल सांभाळणे व त्याची सुरक्षेची जबाबदारी घेणे एवढ्यापुरतीच मर्यादित आहेत. यापुढे जाऊन पाळणाघरात मनोरंजनाच्या दृष्टीने कोणतेही साधन नसते. शहरस्तरावर महापालिके चे एकही पाळणाघर नाही. पाळणाघरासाठी आलेल्या अर्जांपैकी एकही अर्ज पात्र ठरला नसल्यामुळे शासकीय पाळणाघरे शहरात नाहीत. नोकरी करीत असलेल्या पाच वर्षे वयाच्या आतील बालकांसाठी पाळणाघराची सुविधा आहे. बचत गट अथवा नोंदणीकृत संस्था तीन वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. किमान १५ बालके असणे आवश्यक आहे. विक्रीकर नंबर असलेले कोटेशन सादर केल्यानंतर १० हजार रुपये व इतर सुविधांसाठी १२ हजार रुपये सहा महिन्यांच्या टप्प्यावर दिले जातात.- संभाजी ऐवले, समाजविकास अधिकारी पाळणाघरे ही मुलांचा सांभाळ करण्यापुरती झाली आहेत. मुलांच्या आहाराकडे, शाळापूर्व शिक्षणाचा पाळणाघराशी काही संबंध नाही. पाळणाघर अर्थार्जनाचे साधन बनले आहे. शहरातील पाळणेघरे नोंदणीकृत नाहीत. शहरात दर्जेदार पाळणाघरे निर्माण होण्याची गरज आहे. - अच्युत बोरगावकर, अध्यक्ष, तथापि संस्था