शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘माहेर’ने राबविला जलपुनर्भरण उपक्रम

By admin | Updated: July 14, 2016 00:41 IST

मागील काही महिन्यांत शहर व तालुक्याने पाणीटंचाईची परिस्थिती अनुभवली. टंचाईच्या काळातच खरे पाण्याचे महत्त्व कळते.

शिरूर : मागील काही महिन्यांत शहर व तालुक्याने पाणीटंचाईची परिस्थिती अनुभवली. टंचाईच्या काळातच खरे पाण्याचे महत्त्व कळते. मात्र, याची कायमस्वरूपी जाणीव ठेवणे गरजेचे आहे. याची खऱ्या अर्थाने येथील अनाथ मुलांच्या ‘माहेर’ या संस्थेने जाणीव ठेवली व आपल्या इमारतीत जलपुनर्भरण उपक्रम राबविला. असा उपक्रम प्रत्येकाने राबविला, तर पाण्याची समस्या कमी होऊ शकेल.पाणी उपलब्ध असले की मुबलक पाण्याचा वापर करायचा. ही नागरिकांची सवय बनली आहे. झाडांच्या कत्तलीमुळे जंगले नष्ट होत चालली आहे. वृक्षलागवडीचे महत्त्व अद्याप नागरिकांना पटले नाही. अशामुळे पर्जन्यमानाची अनिश्चितता अनुभवयास मिळत आहे. मागील वर्षी (२०१५) कमी पाऊस झाला. परिणामी, शहर व तालुक्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. शहरात मार्च महिन्यापासून पाणीटंचाई सुरू झाली. जूनअखेर बंधारा कोरडा पडला. अशाप्रकारची टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणणे गरजेचे आहे.घराच्या छतावरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जाते. हे पाणी वाया न जाता त्याचा उपयोग व्हावा, याबाबत अनेकदा आवाहन करण्यात येते. शहरात अथवा तालुक्यात क्वचितच असा उपयोग करण्यात आला असावा. शिरूरपासून एक किलोमीटर अंतरावर रामलिंग रस्त्यावर अनाथांची ‘माहेर’ संस्था आहे. दोन मजली इमारतीत ३० मुले येथे राहतात. या संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन यांच्या संकल्पनेतून या इमारतीच्या छतावरील पाणी पाईपद्वारे खाली घेण्यात आले. विंधनविहिरीच्या पाईपच्या बाजूला खड्डा घेऊन तेथे हे पाणी सोडण्याचा उपक्रम राबविण्यात आला. पाईपाच्या बाजूला खड्ड्यात पाणी शुद्धीकरण करणासाठी खाली प्रथम वाळू, त्यावर मोठी वाळू, त्याच्यावर खडी (४ एमएम.) त्यावर विटाचे तुकडे टाकण्यात आले. छतावरील पाणी पाईपद्वारे येथे पडते. विंधनविहिरीच्या पाईपला छोटे छिद्रे पाडण्यात आले आहे. त्याबाजूला जाळी लावण्यात आली आहे. छतावरील पाणी शुद्ध होऊन या पाईपमध्ये जाते. अशा पद्धतीने जलपुनर्भरणाचा उपक्रम ‘माहेर’ने राबविला आहे. या सिझनमधील झालेल्या पावसाच्या पाण्याचे ‘माहेर’ने जलपुनर्भरण उपक्रमाद्वारे चांगले नियोजन केल्याने पाण्याची पातळी वाढली. (वार्ताहर)