शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

‘माहेर’ने राबविला जलपुनर्भरण उपक्रम

By admin | Updated: July 14, 2016 00:41 IST

मागील काही महिन्यांत शहर व तालुक्याने पाणीटंचाईची परिस्थिती अनुभवली. टंचाईच्या काळातच खरे पाण्याचे महत्त्व कळते.

शिरूर : मागील काही महिन्यांत शहर व तालुक्याने पाणीटंचाईची परिस्थिती अनुभवली. टंचाईच्या काळातच खरे पाण्याचे महत्त्व कळते. मात्र, याची कायमस्वरूपी जाणीव ठेवणे गरजेचे आहे. याची खऱ्या अर्थाने येथील अनाथ मुलांच्या ‘माहेर’ या संस्थेने जाणीव ठेवली व आपल्या इमारतीत जलपुनर्भरण उपक्रम राबविला. असा उपक्रम प्रत्येकाने राबविला, तर पाण्याची समस्या कमी होऊ शकेल.पाणी उपलब्ध असले की मुबलक पाण्याचा वापर करायचा. ही नागरिकांची सवय बनली आहे. झाडांच्या कत्तलीमुळे जंगले नष्ट होत चालली आहे. वृक्षलागवडीचे महत्त्व अद्याप नागरिकांना पटले नाही. अशामुळे पर्जन्यमानाची अनिश्चितता अनुभवयास मिळत आहे. मागील वर्षी (२०१५) कमी पाऊस झाला. परिणामी, शहर व तालुक्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. शहरात मार्च महिन्यापासून पाणीटंचाई सुरू झाली. जूनअखेर बंधारा कोरडा पडला. अशाप्रकारची टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणणे गरजेचे आहे.घराच्या छतावरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जाते. हे पाणी वाया न जाता त्याचा उपयोग व्हावा, याबाबत अनेकदा आवाहन करण्यात येते. शहरात अथवा तालुक्यात क्वचितच असा उपयोग करण्यात आला असावा. शिरूरपासून एक किलोमीटर अंतरावर रामलिंग रस्त्यावर अनाथांची ‘माहेर’ संस्था आहे. दोन मजली इमारतीत ३० मुले येथे राहतात. या संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन यांच्या संकल्पनेतून या इमारतीच्या छतावरील पाणी पाईपद्वारे खाली घेण्यात आले. विंधनविहिरीच्या पाईपच्या बाजूला खड्डा घेऊन तेथे हे पाणी सोडण्याचा उपक्रम राबविण्यात आला. पाईपाच्या बाजूला खड्ड्यात पाणी शुद्धीकरण करणासाठी खाली प्रथम वाळू, त्यावर मोठी वाळू, त्याच्यावर खडी (४ एमएम.) त्यावर विटाचे तुकडे टाकण्यात आले. छतावरील पाणी पाईपद्वारे येथे पडते. विंधनविहिरीच्या पाईपला छोटे छिद्रे पाडण्यात आले आहे. त्याबाजूला जाळी लावण्यात आली आहे. छतावरील पाणी शुद्ध होऊन या पाईपमध्ये जाते. अशा पद्धतीने जलपुनर्भरणाचा उपक्रम ‘माहेर’ने राबविला आहे. या सिझनमधील झालेल्या पावसाच्या पाण्याचे ‘माहेर’ने जलपुनर्भरण उपक्रमाद्वारे चांगले नियोजन केल्याने पाण्याची पातळी वाढली. (वार्ताहर)