शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सहा महिने कचरा टाकू द्यावा

By admin | Updated: January 5, 2015 00:56 IST

उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोत ३१ डिसेंबरनंतर कचरा टाकला जाणार नाही, असे ठरले होते; मात्र कचऱ्याला पर्यायी मार्ग शोधण्यासाठी अजून सहा महिन्यांचा वेळ लागणार आहे.

पुणे : उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोत ३१ डिसेंबरनंतर कचरा टाकला जाणार नाही, असे ठरले होते; मात्र कच-याला पर्यायी मार्ग शोधण्यासाठी अजून सहा महिन्यांचा वेळ लागणार आहे. ग्रामस्थांचा मात्र आता प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना ‘अजून ६ महिने कचरा टाकू द्या, त्यानंतर कचरा टाकणार नाही,’ असे प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊन विनंती करणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.सजग नागरिक मंचच्या वतीने शहराच्या प्रश्नांवर गिरीश बापट यांच्याशी नागरिकांचा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नागरिकांनी कचरा, वाहतूक, मेट्रो आदी महत्त्वाचे प्रश्न मांडले. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची बापट यांनी या वेळी माहिती दिली.बापट म्हणाले, ‘‘सध्या कचरा प्रश्नांची सोडवणूक करण्यास मी प्राधान्य देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी येत्या ८ जानेवारीला ग्रामस्थांची बैठक आयोजित केली आहे. संघर्ष करून प्रश्न सुटणार नाही. अजून सहा महिने कचरा टाकू द्या, अशी त्यांच्याकडे विनंती केली जाणार आहे. कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करण्यात आला आहे. रोखेम, दिशा या प्रकल्पांची कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता मोठी आहे. या प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. मोशी येथील कचरा डेपोत आणखी ४ ते ५ महिने कचरा टाकू द्यावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा जिरविण्यासाठी यापुढील काळात भर देणार आहे.’’सांडपाण्यावर प्रक्रिया करून बेबी कॅनॉलद्वारे शेतीला दोन टीएमसी पाणी मार्चपर्यंत देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यामध्ये यश मिळाल्यास पुण्याला पिण्यासाठी मोठ्याप्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकेल, असे बापट यांनी सांगितले. (प्रतिनिधी)