शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

कुदळवाडीत परप्रांतीयांचे लोंढे

By admin | Updated: February 4, 2015 00:46 IST

नागरीकरणावर नियंत्रण आणण्याच्या उपाययोजना यशस्वी झाल्या. झोपडपट्ट्यांची वाढ थांबली. त्यामुळे शहराच्या विविध भागांतील झोपडपट्ट्यांमधील आश्रयस्थाने संपुष्टात आली आहेत.

संजय माने - पिंपरी नागरीकरणावर नियंत्रण आणण्याच्या उपाययोजना यशस्वी झाल्या. झोपडपट्ट्यांची वाढ थांबली. त्यामुळे शहराच्या विविध भागांतील झोपडपट्ट्यांमधील आश्रयस्थाने संपुष्टात आली आहेत. चिखली, कुदळवाडी भागात मात्र परप्रांतीयांचे लोंढे धडकू लागले आहेत. गुन्हेगारी कारवायांमध्ये प्रामुख्याने कुदळवाडीतील आरोपींचे संबंध असल्याचे पोलीस तपासात वारंवार निष्पन्न होऊ लागल्याने आगामी काळात कुदळवाडी हे गुन्हेगारी कारवायांचे केंद्र बनेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. १९९७ मध्ये महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांपैकी चिखली, कुदळवाडी हा परिसर आहे. भंगार मालाची दुकाने, मोठी गोदामे, छोटी वर्क शॉप, मेटल प्रेस, जुने फर्निचर विक्रीची दुकाने, वाहनांचे सुटे भाग, मोठ्या कंपन्यांमधील भंगारात काढलेले संगणक व अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य, रीमोल्डिंग टायर अशा कितीतरी वस्तू उपलब्ध असलेली दुकाने, गोदामे, पत्राशेड या भागात दाटीवाटीने उभारली आहेत. अरुंद गल्लीबोळ, बारमाही चिखल, दलदल असलेले छोटे रस्ते, दुर्गंधी, दलदल, कोठे तरी कचरा, वायर जाळण्यासाठी लावलेली आग, त्यामुळे कायम धुमसत असलेली आग, धुराचे लोळ अशा परिस्थितीत छोट्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये संसार थाटलेले, मिळेल ते काम करणारे कामगार असे चित्र कुदळवाडीत पहावयास मिळते. हाताला काम मिळवून देण्याची हमी असलेल्या कुदळवाडी भागात परप्रांतीयांचे लोंढे कायम येत आहेत. कुदळवाडी परिसर औद्योगिक गणला जात असला, तरी त्याआड काही अवैध धंदे राजरोसपणे चालवले जात आहेत. ४कुदळवाडी भागात भंगार गोदामे, छोटी वर्क शॉप या ठिकाणी काम करणारे कामगार प्रामुख्याने बिहार आणि उत्तरप्रदेशमधून आलेले आहेत. त्यांची रोजगार आणि राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते. कामगारांना राहण्याची व्यवस्था गोदामाला जोडून असलेल्या पत्राशेडमध्ये केली जात असल्याने त्यांना पोलिसांकडे भाडेकरू असल्याची नोंद करावी लागत नाही. या भागात नव्याने किती लोक येतात, किती परत जातात, याची आकडेवारी कोणाकडेही नाही. पिस्तूलविक्रीपासून अन्य गंभीर स्वरूपाच्या घटनांमधील आरोपींची पाळेमुळे या भागात आढळून आली आहेत. या भागात आश्रयाला येणाऱ्या गुन्हेगारांमुळे शहराची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरीकरणावरही नियंत्रण आणणे गरजेचे आहे.