शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

कुदळवाडीत परप्रांतीयांचे लोंढे

By admin | Updated: February 4, 2015 00:46 IST

नागरीकरणावर नियंत्रण आणण्याच्या उपाययोजना यशस्वी झाल्या. झोपडपट्ट्यांची वाढ थांबली. त्यामुळे शहराच्या विविध भागांतील झोपडपट्ट्यांमधील आश्रयस्थाने संपुष्टात आली आहेत.

संजय माने - पिंपरी नागरीकरणावर नियंत्रण आणण्याच्या उपाययोजना यशस्वी झाल्या. झोपडपट्ट्यांची वाढ थांबली. त्यामुळे शहराच्या विविध भागांतील झोपडपट्ट्यांमधील आश्रयस्थाने संपुष्टात आली आहेत. चिखली, कुदळवाडी भागात मात्र परप्रांतीयांचे लोंढे धडकू लागले आहेत. गुन्हेगारी कारवायांमध्ये प्रामुख्याने कुदळवाडीतील आरोपींचे संबंध असल्याचे पोलीस तपासात वारंवार निष्पन्न होऊ लागल्याने आगामी काळात कुदळवाडी हे गुन्हेगारी कारवायांचे केंद्र बनेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. १९९७ मध्ये महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांपैकी चिखली, कुदळवाडी हा परिसर आहे. भंगार मालाची दुकाने, मोठी गोदामे, छोटी वर्क शॉप, मेटल प्रेस, जुने फर्निचर विक्रीची दुकाने, वाहनांचे सुटे भाग, मोठ्या कंपन्यांमधील भंगारात काढलेले संगणक व अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य, रीमोल्डिंग टायर अशा कितीतरी वस्तू उपलब्ध असलेली दुकाने, गोदामे, पत्राशेड या भागात दाटीवाटीने उभारली आहेत. अरुंद गल्लीबोळ, बारमाही चिखल, दलदल असलेले छोटे रस्ते, दुर्गंधी, दलदल, कोठे तरी कचरा, वायर जाळण्यासाठी लावलेली आग, त्यामुळे कायम धुमसत असलेली आग, धुराचे लोळ अशा परिस्थितीत छोट्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये संसार थाटलेले, मिळेल ते काम करणारे कामगार असे चित्र कुदळवाडीत पहावयास मिळते. हाताला काम मिळवून देण्याची हमी असलेल्या कुदळवाडी भागात परप्रांतीयांचे लोंढे कायम येत आहेत. कुदळवाडी परिसर औद्योगिक गणला जात असला, तरी त्याआड काही अवैध धंदे राजरोसपणे चालवले जात आहेत. ४कुदळवाडी भागात भंगार गोदामे, छोटी वर्क शॉप या ठिकाणी काम करणारे कामगार प्रामुख्याने बिहार आणि उत्तरप्रदेशमधून आलेले आहेत. त्यांची रोजगार आणि राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते. कामगारांना राहण्याची व्यवस्था गोदामाला जोडून असलेल्या पत्राशेडमध्ये केली जात असल्याने त्यांना पोलिसांकडे भाडेकरू असल्याची नोंद करावी लागत नाही. या भागात नव्याने किती लोक येतात, किती परत जातात, याची आकडेवारी कोणाकडेही नाही. पिस्तूलविक्रीपासून अन्य गंभीर स्वरूपाच्या घटनांमधील आरोपींची पाळेमुळे या भागात आढळून आली आहेत. या भागात आश्रयाला येणाऱ्या गुन्हेगारांमुळे शहराची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरीकरणावरही नियंत्रण आणणे गरजेचे आहे.