शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

किस्सा कुर्सी का: यहाँ कभी मेरी सभा हुई थी क्यां?

By राजू इनामदार | Updated: April 6, 2024 17:46 IST

केंद्रातील सत्ता गेल्यानंतरही फाटाफूट न थांबलेल्या जनता पक्षाचे नेते बचावात्मक भूमिकेत होते, तर इंदिरा गांधी यांचा सततचा प्रवास, प्रचारसभा यातून काँग्रेसला बळ मिळत होते...

सन १९८० ची सार्वत्रिक निवडणूक. देशभर या निवडणुकीची चर्चा होती. आणीबाणीला विरोध करून सत्तेवर आलेला जनता पक्ष अवघ्या ३ वर्षात फुटला होता. आणीबाणीमुळेच पराभूत झालेल्या इंदिरा गांधी पुन्हा नव्या ऊर्जेने झपाटून देशभर प्रचार करत होत्या. प्रत्येक राज्यात त्यांचे दौरे होत होते. दौरे, प्रचारसभा यात त्या व्यस्त होत्या. केंद्रातील सत्ता गेल्यानंतरही फाटाफूट न थांबलेल्या जनता पक्षाचे नेते बचावात्मक भूमिकेत होते, तर इंदिरा गांधी यांचा सततचा प्रवास, प्रचारसभा यातून काँग्रेसला बळ मिळत होते.

पुण्यातही त्यांची एक सभा ठरली. त्यांचे उमेदवार होते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ. काकासाहेब गाडगीळ व नेहरू परिवाराचे संबंध स्वातंत्र्य चळवळीपासूनचे होते. त्यामुळे इंदिरा गांधी यांना गाडगीळ कुटुंबाची सगळी माहिती होती. त्यांनी अगदी जाणीवपूर्वक पुण्यातील ही सभा दिली होती. सभेचे स्थळ होते बाबूराव सणस मैदान. सभास्थानी इंदिरा गांधी आल्या. गर्दीने उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर त्या बसल्या, त्यावेळी आजूबाजूला उत्सुकतेने पाहत होत्या. त्यांना काहीतरी आठवत होते, पण काय ते लक्षात येत नसावे. व्यासपीठावर मोजकीच मंडळी होती, तीही एकमेकांमध्ये व्यस्त. त्यामुळे त्यांच्यापैकी काहींना विचारावे तर तेही त्यांना शक्य होईना.

उल्हास पवार यांना बोलावले :

स्टेजवरून इंदिरा गांधी यांनी सहज खाली नजर टाकली तर तिथे त्यांना उल्हास पवार दिसले. युवक काँग्रेसच्या कामामुळे ते वारंवार दिल्लीत येत-जात. त्यामुळे त्यांचा परिचय होता. त्यांनी व्यासपीठाच्या एका बाजूस उभे असलेल्या त्यांच्या स्वीय सहायकाला बोलावले आणि पवार यांना वर येण्यास सांगितले. सचिवाने निरोप दिल्यावर पवार लगेचच वर आले. इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारले, इसी मैदानपे पहले कभी मेरी सभा हुई थी क्या? पवार गप्पाजीरावांना म्हणाले, “इंदिरा गांधी यांच्या स्मरणशक्तीने थक्क झालो. ५ वर्षांपूर्वी याच मैदानावर इंदिरा गांधी यांची सभा झाली होती.” ती माहिती दिल्यावर त्यांची अस्वस्थता संपली. सौम्यसे हसून त्यांनी मान डोलावली.

झाले ते असे :

व्यासपीठावरील नेत्यांना, खाली उभे असणाऱ्या स्थानिक नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिसले ते चित्र साधारण असे होते. इंदिरा गांधी यांनी उल्हास पवार यांना वर बोलावून घेतले. त्यांनी पवार यांच्या कानात काहीतरी विचारले. पवार यांनीही त्यांना काहीतरी सांगितले. तिथून पुढे दोन दिवस पुण्यातील स्थानिक नेते अस्वस्थ होते. उल्हास पवार यांच्याशी मॅडम नक्की काय बोलल्या हे कळत नसल्यामुळे ही अस्वस्थता होती. मीही त्यांना बरेच दिवस काय बोलणे झाले ते सांगितलेच नाही. मिश्किल पवारांनी गप्पाजीरावांना असे सांगितले आणि टाळीसाठी हात पुढे केला.

- गप्पाजीराव

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडIndira Gandhiइंदिरा गांधीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक