शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

किस्सा कुर्सी का: यहाँ कभी मेरी सभा हुई थी क्यां?

By राजू इनामदार | Updated: April 6, 2024 17:46 IST

केंद्रातील सत्ता गेल्यानंतरही फाटाफूट न थांबलेल्या जनता पक्षाचे नेते बचावात्मक भूमिकेत होते, तर इंदिरा गांधी यांचा सततचा प्रवास, प्रचारसभा यातून काँग्रेसला बळ मिळत होते...

सन १९८० ची सार्वत्रिक निवडणूक. देशभर या निवडणुकीची चर्चा होती. आणीबाणीला विरोध करून सत्तेवर आलेला जनता पक्ष अवघ्या ३ वर्षात फुटला होता. आणीबाणीमुळेच पराभूत झालेल्या इंदिरा गांधी पुन्हा नव्या ऊर्जेने झपाटून देशभर प्रचार करत होत्या. प्रत्येक राज्यात त्यांचे दौरे होत होते. दौरे, प्रचारसभा यात त्या व्यस्त होत्या. केंद्रातील सत्ता गेल्यानंतरही फाटाफूट न थांबलेल्या जनता पक्षाचे नेते बचावात्मक भूमिकेत होते, तर इंदिरा गांधी यांचा सततचा प्रवास, प्रचारसभा यातून काँग्रेसला बळ मिळत होते.

पुण्यातही त्यांची एक सभा ठरली. त्यांचे उमेदवार होते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ. काकासाहेब गाडगीळ व नेहरू परिवाराचे संबंध स्वातंत्र्य चळवळीपासूनचे होते. त्यामुळे इंदिरा गांधी यांना गाडगीळ कुटुंबाची सगळी माहिती होती. त्यांनी अगदी जाणीवपूर्वक पुण्यातील ही सभा दिली होती. सभेचे स्थळ होते बाबूराव सणस मैदान. सभास्थानी इंदिरा गांधी आल्या. गर्दीने उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर त्या बसल्या, त्यावेळी आजूबाजूला उत्सुकतेने पाहत होत्या. त्यांना काहीतरी आठवत होते, पण काय ते लक्षात येत नसावे. व्यासपीठावर मोजकीच मंडळी होती, तीही एकमेकांमध्ये व्यस्त. त्यामुळे त्यांच्यापैकी काहींना विचारावे तर तेही त्यांना शक्य होईना.

उल्हास पवार यांना बोलावले :

स्टेजवरून इंदिरा गांधी यांनी सहज खाली नजर टाकली तर तिथे त्यांना उल्हास पवार दिसले. युवक काँग्रेसच्या कामामुळे ते वारंवार दिल्लीत येत-जात. त्यामुळे त्यांचा परिचय होता. त्यांनी व्यासपीठाच्या एका बाजूस उभे असलेल्या त्यांच्या स्वीय सहायकाला बोलावले आणि पवार यांना वर येण्यास सांगितले. सचिवाने निरोप दिल्यावर पवार लगेचच वर आले. इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारले, इसी मैदानपे पहले कभी मेरी सभा हुई थी क्या? पवार गप्पाजीरावांना म्हणाले, “इंदिरा गांधी यांच्या स्मरणशक्तीने थक्क झालो. ५ वर्षांपूर्वी याच मैदानावर इंदिरा गांधी यांची सभा झाली होती.” ती माहिती दिल्यावर त्यांची अस्वस्थता संपली. सौम्यसे हसून त्यांनी मान डोलावली.

झाले ते असे :

व्यासपीठावरील नेत्यांना, खाली उभे असणाऱ्या स्थानिक नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिसले ते चित्र साधारण असे होते. इंदिरा गांधी यांनी उल्हास पवार यांना वर बोलावून घेतले. त्यांनी पवार यांच्या कानात काहीतरी विचारले. पवार यांनीही त्यांना काहीतरी सांगितले. तिथून पुढे दोन दिवस पुण्यातील स्थानिक नेते अस्वस्थ होते. उल्हास पवार यांच्याशी मॅडम नक्की काय बोलल्या हे कळत नसल्यामुळे ही अस्वस्थता होती. मीही त्यांना बरेच दिवस काय बोलणे झाले ते सांगितलेच नाही. मिश्किल पवारांनी गप्पाजीरावांना असे सांगितले आणि टाळीसाठी हात पुढे केला.

- गप्पाजीराव

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडIndira Gandhiइंदिरा गांधीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक