शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

किस्सा कुर्सी का: यहाँ कभी मेरी सभा हुई थी क्यां?

By राजू इनामदार | Updated: April 6, 2024 17:46 IST

केंद्रातील सत्ता गेल्यानंतरही फाटाफूट न थांबलेल्या जनता पक्षाचे नेते बचावात्मक भूमिकेत होते, तर इंदिरा गांधी यांचा सततचा प्रवास, प्रचारसभा यातून काँग्रेसला बळ मिळत होते...

सन १९८० ची सार्वत्रिक निवडणूक. देशभर या निवडणुकीची चर्चा होती. आणीबाणीला विरोध करून सत्तेवर आलेला जनता पक्ष अवघ्या ३ वर्षात फुटला होता. आणीबाणीमुळेच पराभूत झालेल्या इंदिरा गांधी पुन्हा नव्या ऊर्जेने झपाटून देशभर प्रचार करत होत्या. प्रत्येक राज्यात त्यांचे दौरे होत होते. दौरे, प्रचारसभा यात त्या व्यस्त होत्या. केंद्रातील सत्ता गेल्यानंतरही फाटाफूट न थांबलेल्या जनता पक्षाचे नेते बचावात्मक भूमिकेत होते, तर इंदिरा गांधी यांचा सततचा प्रवास, प्रचारसभा यातून काँग्रेसला बळ मिळत होते.

पुण्यातही त्यांची एक सभा ठरली. त्यांचे उमेदवार होते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ. काकासाहेब गाडगीळ व नेहरू परिवाराचे संबंध स्वातंत्र्य चळवळीपासूनचे होते. त्यामुळे इंदिरा गांधी यांना गाडगीळ कुटुंबाची सगळी माहिती होती. त्यांनी अगदी जाणीवपूर्वक पुण्यातील ही सभा दिली होती. सभेचे स्थळ होते बाबूराव सणस मैदान. सभास्थानी इंदिरा गांधी आल्या. गर्दीने उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर त्या बसल्या, त्यावेळी आजूबाजूला उत्सुकतेने पाहत होत्या. त्यांना काहीतरी आठवत होते, पण काय ते लक्षात येत नसावे. व्यासपीठावर मोजकीच मंडळी होती, तीही एकमेकांमध्ये व्यस्त. त्यामुळे त्यांच्यापैकी काहींना विचारावे तर तेही त्यांना शक्य होईना.

उल्हास पवार यांना बोलावले :

स्टेजवरून इंदिरा गांधी यांनी सहज खाली नजर टाकली तर तिथे त्यांना उल्हास पवार दिसले. युवक काँग्रेसच्या कामामुळे ते वारंवार दिल्लीत येत-जात. त्यामुळे त्यांचा परिचय होता. त्यांनी व्यासपीठाच्या एका बाजूस उभे असलेल्या त्यांच्या स्वीय सहायकाला बोलावले आणि पवार यांना वर येण्यास सांगितले. सचिवाने निरोप दिल्यावर पवार लगेचच वर आले. इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारले, इसी मैदानपे पहले कभी मेरी सभा हुई थी क्या? पवार गप्पाजीरावांना म्हणाले, “इंदिरा गांधी यांच्या स्मरणशक्तीने थक्क झालो. ५ वर्षांपूर्वी याच मैदानावर इंदिरा गांधी यांची सभा झाली होती.” ती माहिती दिल्यावर त्यांची अस्वस्थता संपली. सौम्यसे हसून त्यांनी मान डोलावली.

झाले ते असे :

व्यासपीठावरील नेत्यांना, खाली उभे असणाऱ्या स्थानिक नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिसले ते चित्र साधारण असे होते. इंदिरा गांधी यांनी उल्हास पवार यांना वर बोलावून घेतले. त्यांनी पवार यांच्या कानात काहीतरी विचारले. पवार यांनीही त्यांना काहीतरी सांगितले. तिथून पुढे दोन दिवस पुण्यातील स्थानिक नेते अस्वस्थ होते. उल्हास पवार यांच्याशी मॅडम नक्की काय बोलल्या हे कळत नसल्यामुळे ही अस्वस्थता होती. मीही त्यांना बरेच दिवस काय बोलणे झाले ते सांगितलेच नाही. मिश्किल पवारांनी गप्पाजीरावांना असे सांगितले आणि टाळीसाठी हात पुढे केला.

- गप्पाजीराव

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडIndira Gandhiइंदिरा गांधीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक