शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

खुशबू मिश्रा खूनप्रकरणी ‘तारीख-पे-तारीख’

By admin | Updated: January 21, 2015 00:32 IST

बावीस वर्षीय संगणक अभियंता असलेल्या खुशबू मिश्रा हिच्या खून प्रकरणाला तब्बल सहा वर्षे उलटली आहेत. मात्र, अजूनही तिचे कुटुंबीय तिला न्याय कधी मिळणार, या प्रतीक्षेत आहेत.

पुणे : बावीस वर्षीय संगणक अभियंता असलेल्या खुशबू मिश्रा हिच्या खून प्रकरणाला तब्बल सहा वर्षे उलटली आहेत. मात्र, अजूनही तिचे कुटुंबीय तिला न्याय कधी मिळणार, या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे महिलांविषयक खटले तातडीने चालवून न्यायनिवाडा करण्यासाठी विशेष न्यायालये स्थापण्यात आली. तसेच, उच्च न्यायालयानेही ५ वर्षांपूर्वीचे खटले तातडीने निकाली काढण्याचा आदेश दिलेला असतानाही २००८ मध्ये घडलेल्या या घटनेला आणि खुशबू मिश्रा हिला न्याय कधी मिळणार, असा प्रश्न तिचे कुटुंबीय उपस्थित करीत आहेत. खुशबू मिश्रा खून खटला, तसेच संगणक अभियंता नयना पुजारी खून व बलात्कार घटनेनंतर दिल्ली येथे घडलेले निर्भया प्रकरण जलदगतीने चालवून त्यात आरोपींना शिक्षाही सुनावण्यात आली आहे. मात्र अद्याप हे प्रकरण तारखांच्या आणि कामकाजाच्या कचाट्यात अडकून पडलेले आहे. विशेष म्हणजे निर्भया प्रकरणानंतर महिलांसाठीच्या विशेष न्यायालयांची स्थापना झाली. त्यात हे प्रकरणही वर्ग करण्यात आले; मात्र अद्याप या प्रलंबित खटल्याला पुरेसा प्रतिसाद लाभत नसल्याची खंत मिश्रा कुटुंबीयांचे स्रेही व्यक्त करीत आहेत. खुशबू मिश्रा ही तळवडे येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करीत होती. यातील आरोपी मनू मोहिंदर अ‍ॅबरोल (वय २५) हा तिच्या कंपनीतच सहकारी होता. तो तिला वेळोवेळी एकतर्फी प्रेमातून त्रासही देत होता. याबाबत तिने कंपनीच्या व्यवस्थापकांना लेखी तक्रार देऊन कळविले होते. त्याला कंपनीने वॉर्निंग दिलेली होती. खुशबू व मनू यांचे प्रेमप्रकरण तुटले होते. या रागातून तसेच तिने त्याला विवाहास नकार दिल्यानेच मनूने २० आॅक्टोबर २००८ रोजी बालेवाडी येथील आदित्य ब्रिज पार्क सोसायटीतील तिच्या राहत्या घरी खून केला व त्यानंतर तो पळून गेला होता. पोलिसांनी नंतर त्याला भोपाळ येथून अटक केली होती. (प्रतिनिधी)