शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

शिवराज्याभिषेकानिमित्त जलकुंभ यात्रा

By admin | Updated: June 9, 2014 05:11 IST

संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरलेले छत्रपती शिवाजीमहाराज यांचा ३४१ वा राज्याभिषेक दिनविशेष सोहळा म्हणून रायगडावर साजरा केला जातो.

मार्गासनी : संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरलेले छत्रपती शिवाजीमहाराज यांचा ३४१ वा राज्याभिषेक दिनविशेष सोहळा म्हणून रायगडावर साजरा केला जातो. या सोहळ्यास राज्यभरातून शिवप्रेमी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतात. हा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण म्हणून घोषित करावा, अशी मागणी शिवप्रेमी वारंवार करीत आहेत. या अनोख्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी वेल्हा व भोर तालुक्यातील शिवाजी महाराजांचे हजारो मावळे जातात. ६ जून १६७४ रोजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी या गुंजन मावळ परिसरातील गडकोट व येथील नद्यांचे पाणी शिवराज्याभिषेकासाठी आणण्यात आले होते. याची स्फुर्ती घेऊन ही परंपरा तालुक्यातील मावळा जवान संघटनेने सुरू ठेवली असून, राजगड परिसरातून संघटनेच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर व पुरंदर या किल्ल्यांवरील व गुंजवणी, कानंदी, वेळवंडी, भामा-भीमा, इंद्रायणी, मुठा या सप्त नद्यांचे जलकुंभ यात्रा किल्ले तोरणा, राजगड ते रायगडपर्यंत केली जाते. या जलकुंभ यात्रेत मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सणस व ज्येष्ठ इतिहास तज्ञ दत्ताजी नलावडे, हनुमंत दिघे, मनोज ओव्हाळ, राहुल भोसले, दत्ता मळेकर, दिगंबर धुमाळ तसेच शिवधनुष्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश म्हेत्रे, विनायक कालेकर आदींसह लाखो शिवप्रेमी मावळे उपस्थित होते.पाच जून रोजी राजगडावरुन निघालेल्या जलकुंभ यात्रेचे स्वागत भोर येथील शिवाजी चौकात करण्यात आले. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीमहाराज यांच्यासमवेत मावळा संघटनेच्या मावळ्यांनी रायगड किल्ला पायी पन्नास मिनिटांत सर केला. (वार्ताहर)