शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

शिवराज्याभिषेकानिमित्त जलकुंभ यात्रा

By admin | Updated: June 9, 2014 05:11 IST

संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरलेले छत्रपती शिवाजीमहाराज यांचा ३४१ वा राज्याभिषेक दिनविशेष सोहळा म्हणून रायगडावर साजरा केला जातो.

मार्गासनी : संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरलेले छत्रपती शिवाजीमहाराज यांचा ३४१ वा राज्याभिषेक दिनविशेष सोहळा म्हणून रायगडावर साजरा केला जातो. या सोहळ्यास राज्यभरातून शिवप्रेमी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतात. हा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण म्हणून घोषित करावा, अशी मागणी शिवप्रेमी वारंवार करीत आहेत. या अनोख्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी वेल्हा व भोर तालुक्यातील शिवाजी महाराजांचे हजारो मावळे जातात. ६ जून १६७४ रोजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी या गुंजन मावळ परिसरातील गडकोट व येथील नद्यांचे पाणी शिवराज्याभिषेकासाठी आणण्यात आले होते. याची स्फुर्ती घेऊन ही परंपरा तालुक्यातील मावळा जवान संघटनेने सुरू ठेवली असून, राजगड परिसरातून संघटनेच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर व पुरंदर या किल्ल्यांवरील व गुंजवणी, कानंदी, वेळवंडी, भामा-भीमा, इंद्रायणी, मुठा या सप्त नद्यांचे जलकुंभ यात्रा किल्ले तोरणा, राजगड ते रायगडपर्यंत केली जाते. या जलकुंभ यात्रेत मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सणस व ज्येष्ठ इतिहास तज्ञ दत्ताजी नलावडे, हनुमंत दिघे, मनोज ओव्हाळ, राहुल भोसले, दत्ता मळेकर, दिगंबर धुमाळ तसेच शिवधनुष्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश म्हेत्रे, विनायक कालेकर आदींसह लाखो शिवप्रेमी मावळे उपस्थित होते.पाच जून रोजी राजगडावरुन निघालेल्या जलकुंभ यात्रेचे स्वागत भोर येथील शिवाजी चौकात करण्यात आले. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीमहाराज यांच्यासमवेत मावळा संघटनेच्या मावळ्यांनी रायगड किल्ला पायी पन्नास मिनिटांत सर केला. (वार्ताहर)