शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

औद्योगिक धोरणाने नागरिकांची कोंडी

By admin | Updated: November 16, 2016 02:55 IST

येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पातील वाढते अपघात जणू रोजच्या जीवनमानातील एक सामान्य घटना असल्याचे चित्र निर्माण होत असताना

कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पातील वाढते अपघात जणू रोजच्या जीवनमानातील एक सामान्य घटना असल्याचे चित्र निर्माण होत असताना, त्या सर्व घटनेशी संबंधित अधिकारी व प्रशासन यांचे हातावर घडी, तोंडावर बोट असाच काहीसा प्रकार सुरु आहे. मात्र, यामध्ये येथील सामान्य नागरिक व रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरवर्गाची मात्र मुस्कटदाबी होत आहे.रासायनिक प्रकल्पात वारवांर होणाऱ्या अपघाताच्या घटना खरतर खूप गांभीर्याने दखल घेण्याच्या आहेत. मात्र, दखल घेण्याचे अधिकार ज्यांच्या हातात आहे, तेच मूग गिळून गप्प बसण्याच्या प्रकाराने व कागदी घोडे नाचवून सर्व परवाने मिळवणाऱ्या उद्योजंकाच्या बोगस कारभाराने रोजंदारीने काम करणारा मजूरवर्ग किंवा पदवी प्राप्त केलेल्या बेरोजगार कामगारांना आपला जीव मुठीत धरुनच काम करण्यास भाग पडत आहे. या परिसरातील लोकप्रतिनिधींनी साधलेली चुप्पी त्यामुळे न्याय मागायचा तर कोणाकडे या चक्रव्यूहात येथील सामान्य नागरिक अडकलेला आहे. औद्योगिक क्षेत्रामधील गेल्या दोन महिन्यांपासून कुठल्यान कुठल्या कारणाने अपघात होत राहण्याच्या घटना घडत आहेत. या घटनांकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे भविष्यात मोठा अपघात झाल्यास जबाबदारी कुणाची? शनिवारी रात्री उशिरा झालेली अल्कली अमाईन्स या कंपनीतील घटना खरतर खूप काही सांगून जातेय. अगदीच काही अंतरावर असणाऱ्या लोकवस्तीवर याचा दुष्परिणाम होत आहे. तीव्र वास, पाण्याचे प्रदूषण व होणारा आवाज यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मध्यंतरीच्या एका व्यावसायिक रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी वारंवार होणाऱ्या अपघातावरील प्रश्नावर आमदार राहुल कुल यांनी प्रांताशी चर्चा करुन औद्योगिक क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकारी व सर्व कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या अधिकारी व जबाबदार व्यक्तीची बैठक बोलावून याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापपर्यंत त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात ईटरनीस या कंपनीत दोन कामगारांचा मृत्यू झाला व ही घटना पोलिसांपासून लपवण्याचा प्रयत्नही कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्या व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तरीही अपघातानंतरची परिस्थिती हाताळताना कंपनी प्रशासन प्रकरण दडपण्याचा प्रयास करत असल्याचा निर्वाळा अल्कली अमाईन्स या कंपनीने पोलिसांना गेटवरच थांबवून ठेवण्याच्या प्रकारावरुन दिसुन येत आहे. (वाार्ताहर)