शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक धोरणाने नागरिकांची कोंडी

By admin | Updated: November 16, 2016 02:55 IST

येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पातील वाढते अपघात जणू रोजच्या जीवनमानातील एक सामान्य घटना असल्याचे चित्र निर्माण होत असताना

कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पातील वाढते अपघात जणू रोजच्या जीवनमानातील एक सामान्य घटना असल्याचे चित्र निर्माण होत असताना, त्या सर्व घटनेशी संबंधित अधिकारी व प्रशासन यांचे हातावर घडी, तोंडावर बोट असाच काहीसा प्रकार सुरु आहे. मात्र, यामध्ये येथील सामान्य नागरिक व रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरवर्गाची मात्र मुस्कटदाबी होत आहे.रासायनिक प्रकल्पात वारवांर होणाऱ्या अपघाताच्या घटना खरतर खूप गांभीर्याने दखल घेण्याच्या आहेत. मात्र, दखल घेण्याचे अधिकार ज्यांच्या हातात आहे, तेच मूग गिळून गप्प बसण्याच्या प्रकाराने व कागदी घोडे नाचवून सर्व परवाने मिळवणाऱ्या उद्योजंकाच्या बोगस कारभाराने रोजंदारीने काम करणारा मजूरवर्ग किंवा पदवी प्राप्त केलेल्या बेरोजगार कामगारांना आपला जीव मुठीत धरुनच काम करण्यास भाग पडत आहे. या परिसरातील लोकप्रतिनिधींनी साधलेली चुप्पी त्यामुळे न्याय मागायचा तर कोणाकडे या चक्रव्यूहात येथील सामान्य नागरिक अडकलेला आहे. औद्योगिक क्षेत्रामधील गेल्या दोन महिन्यांपासून कुठल्यान कुठल्या कारणाने अपघात होत राहण्याच्या घटना घडत आहेत. या घटनांकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे भविष्यात मोठा अपघात झाल्यास जबाबदारी कुणाची? शनिवारी रात्री उशिरा झालेली अल्कली अमाईन्स या कंपनीतील घटना खरतर खूप काही सांगून जातेय. अगदीच काही अंतरावर असणाऱ्या लोकवस्तीवर याचा दुष्परिणाम होत आहे. तीव्र वास, पाण्याचे प्रदूषण व होणारा आवाज यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मध्यंतरीच्या एका व्यावसायिक रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी वारंवार होणाऱ्या अपघातावरील प्रश्नावर आमदार राहुल कुल यांनी प्रांताशी चर्चा करुन औद्योगिक क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकारी व सर्व कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या अधिकारी व जबाबदार व्यक्तीची बैठक बोलावून याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापपर्यंत त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात ईटरनीस या कंपनीत दोन कामगारांचा मृत्यू झाला व ही घटना पोलिसांपासून लपवण्याचा प्रयत्नही कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्या व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तरीही अपघातानंतरची परिस्थिती हाताळताना कंपनी प्रशासन प्रकरण दडपण्याचा प्रयास करत असल्याचा निर्वाळा अल्कली अमाईन्स या कंपनीने पोलिसांना गेटवरच थांबवून ठेवण्याच्या प्रकारावरुन दिसुन येत आहे. (वाार्ताहर)