शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वडिवळे धरणाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 10, 2017 02:29 IST

मावळ तालुक्यातील महत्त्वाच्या वडिवळे धरणाची भिंत खराब झाली आहे. धरणाचा पायाही कमकुवत होत आहे.

करंजगाव : मावळ तालुक्यातील महत्त्वाच्या वडिवळे धरणाची भिंत खराब झाली आहे. धरणाचा पायाही कमकुवत होत आहे. धरणाच्या दुरवस्थेकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्षच होत असल्याची तक्रार केली जात आहे. पाणी सोडले जाते त्या ठिकाणी पायाचे सिमेंट निघून चालले आहे. त्यामधील तारा, गज दिसू लागले आहेत. पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे आतील तारेला गंज लागण्याची शक्यता आहे. धरणाच्या पायथ्याच्या मध्यभागी पाणी सोडण्यासाठी चावीचा वापर केला जातो. तेथे जाण्यासाठी लोखंडी जिण्याला धरून जावे लागते. सुमारे ४५ फूट उंचीचा हा जिना गंजून मोडकळीस आला आहे. पाणी सोडण्यासाठी तेथून कामगारांना जोखीम पत्करूनच जावे लागते. धरणाच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर आतील पाया दुरुस्त करण्यात आला आहे. परंतु, बाहेरची भिंत, पाया दुरुस्तीसाठी कोणतीच पाऊले उचलण्यात आली नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.धरणाचा कालवा करंजगाव, गोवित्री, साबळेवाडी, कांबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नाणे, कोळवाडी व इतर गावांतून गेला आहे. या कालव्याच्या पाण्यावर दोन दशकांपूर्वी प्रत्येक शिवार हे हिरवेगार-सुजलाम-सुफलाम होते. परंतु, सध्या कालवा असूनही पाणी वेळेवर मिळत नाही. काही गावांना कालव्याचे पाणी बंद झाले आहे. कालवा बंद झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी काही ठिकाणी कालवा पूर्णपणे बुजवला असून, तेथे शेती केली जाते. कालवा काही ठिकाणी नादुरुस्त झाला असून, पाणीगळती होत आहे.धरण असूनही काही गावांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतीही ओसाड झाली आहे. अनेकांना नाईलाजाने वर्षात एकच पीक घ्यावे लागते. शेतीसाठी पावसाळ्याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नसतो. पूर्वीप्रमाणे कालवा सुरू होण्याची शेतकऱ्यांना दोन दशके प्रतीक्षा आहे. राज्यात दुष्काळग्रस्त भागात चारा-पाण्यासाठी जनावरांची छावनी सुरू केली जाते. येथे पाणी असूनही ते व्यवस्थीत मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. धरणावर विद्युतविषयक समस्याही अनेक वर्षांपासून सोडविल्या गेलेल्या नाहीत. फ्यूज, डीपी, वायर, बोर्ड, बटन खराब अवस्थेत आहे. काही ठिकाणी होल्डरला बल्ब नाही. वायर लोंबत आहेत. (वार्ताहर)पाण्याचे नियोजन : दुरुस्तीची कामे होणे आवश्यकनाणे मावळातील वडिवळे धरण १.४४ टीएमसी क्षमतेचे आहे. या धरणाची निर्मिती १९७८ मध्ये करण्यात आली. धरणाची पाणीसाठा क्षमता ४०.८७ दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त पाणीसाठा ३०.३९ दशलक्ष घनमीटर आहे. धरणाचा कालवा व नदीपात्राद्वारे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकासाठी सुमारे सहा हजार हेक्टर पाणलोट क्षेत्र आहे. त्यामुळे नाणे मावळ व आजुबाजूचा काही ठिकाणचा परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रांसाठी येथून पाणीपुरवठा होतो. धरणातील पाणी इतर गावांना सोडण्यासाठी कालव्याचा वापर केला जातो. या कालव्यालगत अनेक छोटी-मोठी झुडपे आहे. माळरानातून येणारी माती कालव्यामध्ये पडत आहे. कालवा व्यवस्थित करून पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. धरणावरील इतर दुरुस्तीची कामे करुन सुविधा पूर्ण क्षमतेने आणि सुरक्षितपणे उपलब्ध करुन देण्याची नागरिकांची मागणी आहे. नाणे मावळातील शिवारात पाणी देण्यासाठीच्या जलवाहिनीचे काम अर्धवट आहे. हे काम पूर्ण होण्याची शेतकरी वाट पाहत आहेत.