शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

...आता सगळं नशिबाच्याच हवाल्यावर

By admin | Updated: September 4, 2015 02:02 IST

दुष्काळ आमच्या पाचवीलाच पूजलेला आहे... माणसं कशीही जगतील... पण मुक्या जनावरांचं काय...त्यांना ना चारा ना पाणी...जिवापाड संभाळेलेल्या जनावरांची हाडं वर आली

चंद्रकांत साळुंके, काऱ्हाटीदुष्काळ आमच्या पाचवीलाच पूजलेला आहे... माणसं कशीही जगतील... पण मुक्या जनावरांचं काय...त्यांना ना चारा ना पाणी...जिवापाड संभाळेलेल्या जनावरांची हाडं वर आली... त्यामुळे चारा डेपो सुरू करा म्हणून सरकारी अधिकाऱ्यांना रोज विनवण्या केल्या... आंदोलने केली मात्र त्यांच्या कानापर्यंत आवाजच पोहोचेना... आता सगळं नशिबाच्याच हवाल्यावर सोडावं लागणार... अशी व्यथा बारामतीच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांनी मांडली. सलग चार वर्षांपासून पावसाच्या कमतरतेने खरीप हंगाम वाया गेला आहे. जनावरांच्या चाऱ्याची पिके घेतली नसल्याने शेतकऱ्यांना जिवापाड संभाळलेली जनावरे कसे जगवायची, या विचारात शेतकरी पडला आहे. काऱ्हाटी, बाबुर्डी, पानसरेवाडी, माळवाडी, फोंडवाडा, जळगाव सुपे, जळगाव क .प. देऊळगाव रसाळ आदी भागांत भीषण पाणीटंचाई आहे. (वार्ताहर)पावसाचे ३ महिने उलटले, तरी पाऊस पडेना; बहुतांश विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. असणारे पाणी क्षारयुक्त असल्याने नाइलाजास्तव जनावरांना पिण्याचे पाणी म्हणून पाजावे लागत आहे. हंगामातील बाजरी, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग, कांदा पिके वाया गेली आहेत. आजअखेर जनावरांना चारा विकत आणावा लागत आहे. साठवलेला चारा संपल्याने सर्व काही नशिबाच्या हवाल्यावर असल्याचे शेतकरी बोलत आहेत. निदान जनावरांचा चारा प्रश्न सुटला असता, तरी शेतकरी हतबल झाला नसता. शेती ओस पडली आहे. पिण्यास पाणी नाही. शेतीवर कर्ज काढले आहे. परतफेड कशी करायची. गोठ्यातील जनावरे उपाशीपोटी कशी ठेवायची. त्यांना पोटभर चारा कसा द्यायचा, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे असल्याचे शेतकरी शिवाजीराव वाबळे यांनी सांगितले.आवाक्याबाहेरील दराने शेतकरी हतबल बागायती भागातून जिरायती भागातील शेतकरी जनावरांचा चारा विकत घेत आहेत. मात्र, ऊस उत्पादक उसाचे दर चढ्या भावाने लावत आहेत. एका गुंठ्याला पाच ते सहा हजार रुपये बाजारभावाने ऊस विक्री सुरू आहे. या आवाक्याबाहेरील दराने जिरायती भागातील शेतकरी हतबल झाला आहे. जनावरांना चारा कसा द्यायचा. पैसे कोठुन आणायचे, अशा अनेक प्रश्नांनी शेतकरी अडचणीत सापडला आहे.