शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

जलसाक्षरता कार्यशाळेकडे ग्रामपंचायत, शाळांची पाठ

By admin | Updated: March 11, 2015 00:53 IST

सरकार जनतेसाठी काही करीत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते. यात तथ्य असले तरी सरकार राबवत असलेल्या जनहिताच्या

अमोल मचाले, पुणेसरकार जनतेसाठी काही करीत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते. यात तथ्य असले तरी सरकार राबवत असलेल्या जनहिताच्या उपक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद लाभत नाही, असाही विरोधाभास अनेकदा बघायला मिळतो. खडकवासला रस्त्यावर असलेल्या राष्ट्रीय जल आयोगामार्फत (एनडब्लूए) घेण्यात येणाऱ्या जलसाक्षरता कार्यशाळेबाबतही हेच चित्र बघायला मिळते. मोफत मार्गदर्शन मिळत असूनही याला ग्रामपंचायत, शाळांचा प्रतिसाद मिळत नाही.२००० मध्ये स्थापन झालेल्या या अकादमीत प्रशिक्षणाचे काम चालते. केंद्र आणि प्रसंगी राज्य सरकारच्या अखत्यारीतील विभागांच्या अधिकाऱ्यांना पाणी या विषयाशी संबंधित सर्वांगीण प्रशिक्षण येथे दिले जाते. केंद्रीय जल आयोगाचे हे देशातील एकमेव प्रशिक्षण केंद्र. वर्षभर येथे प्रशिक्षण चालते. याव्यतिरिक्त सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून एनडब्लूए ग्रामपंचायत, शाळा, एनजीओ यांच्यासाठी मोफत कार्यशाळा घेते. ‘‘यासाठी आम्ही परिसरातील ग्रामपंचायती, शाळा, एनजीओंना पत्र पाठवतो. शिवाय ँ३३स्र://ल्ल६ं.ेंँ.ल्ल्रू.्रल्ल/ या अकादमीच्या वेबसाईटवरही याबाबत माहिती दिलेली असते. मात्र, फार कमी प्रतिनिधी कार्यशाळेला येतात. हा विषय एक-दोन दिवसांत समजणे शक्य नसल्याने नंतर लोकांनी संपर्क साधल्यास मार्गदर्शन करण्यास आम्ही तयार आहोत. पण कार्यशाळेनंतर लोकांचा फिडबॅकही येत नाही आणि अधिक मार्गदर्शनासाठी ते संपर्कदेखील साधत नाहीत,’’ अशी खंत एनडब्लूएचे मुख्य अभियंता डॉ. एस. के. श्रीवास्तव यांनी मंगळवारी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.एनडब्लूएचे संचालक दत्तकुमार चासकर म्हणाले, ‘‘पुणे परिसरातील सुमारे १५० शाळांना आम्ही कार्यशाळेचे निमंत्रण पाठवतो. मात्र, यापैकी अर्ध्या शाळांचेदेखील शिक्षक प्रतिनिधी कार्यशाळेला येत नाहीत. ग्रामपंचायतींबाबतही हीच अवस्था आहे. वास्तविक पाहता, देशाच्या भावी नागरिकांना लहानपणापासून पाण्याचे महत्व कळावे, ते जलसाक्षर व्हावे, यादृष्टीने शाळांकडून मोठा प्रतिसाद अपेक्षित असतो. गावांकडे तर शहरी भागापेक्षा पाण्याची समस्या गंभीर असते. ती सोडवण्यासाठी उपयोगी असे मार्गदर्शन कार्यशाळेत केले जाते. आम्ही थेट गावात जाऊन त्यांचा प्रश्न सोडवून देऊ शकत नाही. मात्र, यासाठी मागणी केल्यास सविस्तर मार्गदर्शन नक्कीच करू शकतो. पण दुर्देवाने नेहमीच थंड प्रतिसाद लाभतो.’’कार्यशाळेस २०१२ मध्ये ४७, २०१३ मध्ये २७, तर २०१४ मध्ये केवळ ३४ शिक्षक उपस्थित होते. यापैकी कुणीही अधिक माहिती घेण्यामध्ये रस दाखवला नाही. २००८ मध्ये स्थानिक स्वराज संस्थासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. यासाठी राज्यातील अनेक ग्रामपंचायतींना निमंत्रित केले. मात्र, केवळ १७ प्रतिनिधी उपस्थित होते. २०११, २०१३ मध्येही असाच नकारात्मक प्रतिसाद होता. येत्या शुक्रवारी (दि. १३) ग्रामपंचायत, एनजीओ आणि माध्यम प्रतिनिधी यांच्यासाठी आयोजित कार्यशाळेलाही फारसा प्रतिसाद नाही.