शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

लोकचळवळ उभारली अन् पावसाचे पाणी अडले

By admin | Updated: September 1, 2014 05:14 IST

सततच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीतच मुरवायचे, ओढ्या- नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह पुन्हा निर्माण करून खोलीकरण, रुंदीकरणाच्या माध्यमातून पाणी साठवायचे

महेंद्र कांबळे, बारामतीसततच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीतच मुरवायचे, ओढ्या- नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह पुन्हा निर्माण करून खोलीकरण, रुंदीकरणाच्या माध्यमातून पाणी साठवायचे, असा कार्यक्रम बारामती तालुक्यात हाती घेण्यात आला होता. कृषी, पाटबंधारे, छोटे पाटबंधारे विभाग आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने लोक चळवळ उभारली. त्याला गावोगावच्या ग्रामस्थांनी सहकार्य केले. आता पडलेल्या पावसाचे पाणी वर्षभर साठण्याची क्षमता या ओढ्या- नाल्यांमध्ये बंधाऱ्यांच्या माध्यमातून झाले आहे. लोक चळवळ उभारली.... अन् पावसाचे पाणी अडवले, असेच चित्र आज बारामती तालुक्यात दिसत आहे. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असलेल्या तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून पावसाने सरासरीपेक्षा अत्यंत कमी हजेरी लावली. त्यातूनच पाणी प्रश्न निर्माण झाला. सुपे परगण्यातील सततचा दुष्काळ, २२ गावांतील कायम पाण्याचा प्रश्न पाहता तालुक्याचा अर्धा भाग अनेक वर्षांपासून बारमाही पाण्यापासून वंचित आहे. एकीकडे हिरवीगार बागायती शेती, तर दुसरीकडे उजाडलेली माळरान पाहण्याचे चित्र दिसते.या संदर्भात एन्व्हॉरर्मेंटल फोरमचे सुनिल मुसळे यांनी सांगितले, शासकीय कामाला लोकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच माझ्या गावातील पाणी माझ्या शेतात, शिवारात अडले पाहिजे, अशी भूमिका घेऊन ग्रामस्थांना समजावले. त्यामुळे त्यांचा सहभाग वाढला. त्यांच्या सहभागाने बारामती तालुक्यातील जलसंधारणाची चळवळ लोकचळवळ झाली. छोटे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता एल. एस. जगदाळे, तालुका कृषी अधिकारी डॉ. संतोष बरकडे आदींनी यासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले आहे.