शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पाच ते दहा टक्के करदाते शेवटच्या दिवशी होतात जागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST

पिंपरी : मार्चअखेरीस प्राप्तिकर विवरणपत्र भरणे बंधनकारक असल्याचे माहीत असूनही जवळपास पाच ते दहा टक्के करदाते शेवटच्या दिवशी दाखल ...

पिंपरी : मार्चअखेरीस प्राप्तिकर विवरणपत्र भरणे बंधनकारक असल्याचे माहीत असूनही जवळपास पाच ते दहा टक्के करदाते शेवटच्या दिवशी दाखल होतात. म्हणजेच सुमारे तीस ते साठ लाख करदाते अंतिम क्षणी जागे होतात.

मार्चअखेरीस विवरणपत्र भरण्याची तारीख असते. करदात्यांना वर्षानुवर्षे ही तारीख सवयीची आहे. बहुतांश व्यवसाय, उद्योग, भागीदारी संस्था, वैयक्तिक करदाते त्यासाठी आधीच सर्व प्रक्रिया पार पाडत असतात. असे असले तरी शेवटच्या दिवशी जागे होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशात वैयक्तिक आणि भागीदारी संस्थांकडून सहा कोटी आणि एक कोटी व्यवसाय आणि उद्योगांकडून विवरणपत्र दाखल करण्यात येतात. शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहणाऱ्यांमध्ये वैयक्तिक करदात्यांची संख्या अधिक आहे. या करदात्यांचे विवरणपत्र भरण्यासाठी कर सल्लागार, चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) बुधवारी (दि. ३१) उशिरापर्यंत झटत होते.

सीए दिलीप सातभाई म्हणाले, शेवटच्या दिवशी जागे होणाऱ्यांची संख्या किमान पाच टक्के असेल. त्यामुळे शेवटच्या दिवशीही विवरणपत्र भरण्यासाठी धावपळ सुरूच असते. एकाच वेळी अनेकांनी संकेतस्थळ वापरल्यास ताण येतो. काही काळ पॅनकार्ड लिंक करताना अडचण आली.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) कर विभागाचे प्रमुख चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले, की परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत जशी तयारी केली जाते, तसे शेवटच्या दिवशी विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशात सहा कोटी वैयक्तिक आणि भागीदारी फर्मचे करदाते आहेत. तर, उद्योग आणि व्यवसायाचे एक कोटी विवरणपत्र दाखल होतात. उद्योगांकडून शेवटच्या दिवसाची वाट पाहिली जात नाही. वैयक्तिक करदात्यांपैकी पाच ते दहा टक्के शेवटच्या दिवशी येतात.

----

शेवटची तारीख चुकल्यास पाच हजार दंड

विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख चुकल्यास संबंधित करदात्यास कमीतकमी पाच हजार रुपये शुल्क मोजावे लागू शकते. याशिवाय दरमहा एक टक्का याप्रमाणे करपात्र रकमेवर व्याजही भरावे लागते, असे सीए दिलीप सातभाई आणि चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले.

-----

मुद्रांक कार्यालयात मुद्रांकनाची धावपळ

मुद्रांक सवलतीचा शेवटचा दिवस असल्याने मुद्रांकनासाठी शहर आणि पिंपरी चिंचवड मधील दुय्यम निबंधक कार्यालयात धावपळ सुरु होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये २८ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. या कार्यालयात दस्त नोंदणी आणि मुद्रांकनासाठी गर्दी झाली होती. मुद्रांकन केल्यानंतर चार महिन्यात दस्त नोंदणी केली तरी चालते. सदनिकेवरील मुद्रांक शुल्कात मार्च अखेरीस दोन टक्के सवलत होती. या सवलतीचा फायदा घेण्यासाठी अनेकांनी मुद्रांकन केल्याचे समजते.

--------------