शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आधी कलाकृतींचा आस्वाद घ्या

By admin | Updated: April 10, 2017 02:45 IST

पडद्यावर हलणारी चित्रे आणि त्या अनुषंगाने उलगडणारी गोष्ट, यापलीकडे जाऊन चित्रपट पाहिला जात नाही

पुणे : पडद्यावर हलणारी चित्रे आणि त्या अनुषंगाने उलगडणारी गोष्ट, यापलीकडे जाऊन चित्रपट पाहिला जात नाही. तसेच कलाकृती आस्वाद न घेताच त्यावर टिप्पणी केली जाते, अशी खंत व्यक्त करीत ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी कलाकृती न पाहून स्वत:ला त्यापासून वंचित ठेवतोय का? हा विचार करून आधी कलाकृतीचा आस्वाद घ्या, असे आवाहन केले. व्यंकटेश माडगूळकर प्रतिष्ठान, आशय फिल्म क्लब आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीने माडगूळकर यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त आयोजित मराठी चित्रपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्वस्त ज्ञानदा नाईक, अभिनेत्री अधिश्री अत्रे आदी उपस्थित होते. ‘बनगरवाडी’ या माडगूळकर यांची कथा-पटकथा असलेल्या चित्रपटाने महोत्सवाची सांगता झाली.पालेकर यांनी ‘बनगरवाडी’ या चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया उलगडत माडगूळकर यांच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, ‘‘बनगरवाडीच्या रूपाने दिग्गजांनी नाकारलेली मुलगी माझ्या पदरात आली होती. त्यामुळे ही कलाकृती पडद्यावर उभी करण्याचे मोठे दडपण मनावर होते. पण पटकथालेखन करत असताना तात्यांच्या सान्निध्यात राहण्याचा योग आला. कलावंत, एक व्यावसायिक म्हणून आपल्या कलाकृतीकडे अलिप्तपणे पाहून त्यातील चुका स्वीकारण्याचे भान त्यांना होते. ही कलाकृती साकारत असताना त्यांनी कधीही मानपान, रुसवे आणले नाहीत, याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. गुणगुणत, एकाग्र होऊन लेखनाची त्यांची प्रक्रिया मनाला खूप भावली.’’ज्ञानदा नाईक यांनी या वेळी तात्यांच्या आठवणींंना उजाळा दिला. शुभांगी दामले यांनी सूत्रसंचालन केले, तर मोहन माडगूळकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)इतिहासात नोंद व्हावीतात्यांच्या लेखनाचा तसेच विविध कलागुणांचा ठेवा स्मृतिरंजनापुरता मर्यादित न ठेवता त्याची इतिहासात कुठेतरी नोंद झाली पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. सांस्कृतिक इतिहास जतन करणे महत्त्वाचे असते; पण हे आपण करीत नाही. तात्यांच्या आठवणी जागविण्यासाठी हे खूप मोलाचे ठरेल, अशी अपेक्षाही पालेकर यांनी व्यक्त केली.सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘‘लग्न होऊन आल्यानंतर आयकर रस्त्यावरील ‘अक्षर’ बंगला मला नेहमी खुणावत असे. त्यानंतर तात्यांच्या कुटुंबीयांशी स्नेह वाढत गेला. तात्यांनी म्हटल्याप्रमाणे, फुरसतीच्या जरतारी क्षणातूनच सृजनशील साहित्याचा जन्म होतो. हे क्षण जपून ठेवायला हवेत.’’