शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

आधी कलाकृतींचा आस्वाद घ्या

By admin | Updated: April 10, 2017 02:45 IST

पडद्यावर हलणारी चित्रे आणि त्या अनुषंगाने उलगडणारी गोष्ट, यापलीकडे जाऊन चित्रपट पाहिला जात नाही

पुणे : पडद्यावर हलणारी चित्रे आणि त्या अनुषंगाने उलगडणारी गोष्ट, यापलीकडे जाऊन चित्रपट पाहिला जात नाही. तसेच कलाकृती आस्वाद न घेताच त्यावर टिप्पणी केली जाते, अशी खंत व्यक्त करीत ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी कलाकृती न पाहून स्वत:ला त्यापासून वंचित ठेवतोय का? हा विचार करून आधी कलाकृतीचा आस्वाद घ्या, असे आवाहन केले. व्यंकटेश माडगूळकर प्रतिष्ठान, आशय फिल्म क्लब आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीने माडगूळकर यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त आयोजित मराठी चित्रपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्वस्त ज्ञानदा नाईक, अभिनेत्री अधिश्री अत्रे आदी उपस्थित होते. ‘बनगरवाडी’ या माडगूळकर यांची कथा-पटकथा असलेल्या चित्रपटाने महोत्सवाची सांगता झाली.पालेकर यांनी ‘बनगरवाडी’ या चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया उलगडत माडगूळकर यांच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, ‘‘बनगरवाडीच्या रूपाने दिग्गजांनी नाकारलेली मुलगी माझ्या पदरात आली होती. त्यामुळे ही कलाकृती पडद्यावर उभी करण्याचे मोठे दडपण मनावर होते. पण पटकथालेखन करत असताना तात्यांच्या सान्निध्यात राहण्याचा योग आला. कलावंत, एक व्यावसायिक म्हणून आपल्या कलाकृतीकडे अलिप्तपणे पाहून त्यातील चुका स्वीकारण्याचे भान त्यांना होते. ही कलाकृती साकारत असताना त्यांनी कधीही मानपान, रुसवे आणले नाहीत, याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. गुणगुणत, एकाग्र होऊन लेखनाची त्यांची प्रक्रिया मनाला खूप भावली.’’ज्ञानदा नाईक यांनी या वेळी तात्यांच्या आठवणींंना उजाळा दिला. शुभांगी दामले यांनी सूत्रसंचालन केले, तर मोहन माडगूळकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)इतिहासात नोंद व्हावीतात्यांच्या लेखनाचा तसेच विविध कलागुणांचा ठेवा स्मृतिरंजनापुरता मर्यादित न ठेवता त्याची इतिहासात कुठेतरी नोंद झाली पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. सांस्कृतिक इतिहास जतन करणे महत्त्वाचे असते; पण हे आपण करीत नाही. तात्यांच्या आठवणी जागविण्यासाठी हे खूप मोलाचे ठरेल, अशी अपेक्षाही पालेकर यांनी व्यक्त केली.सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘‘लग्न होऊन आल्यानंतर आयकर रस्त्यावरील ‘अक्षर’ बंगला मला नेहमी खुणावत असे. त्यानंतर तात्यांच्या कुटुंबीयांशी स्नेह वाढत गेला. तात्यांनी म्हटल्याप्रमाणे, फुरसतीच्या जरतारी क्षणातूनच सृजनशील साहित्याचा जन्म होतो. हे क्षण जपून ठेवायला हवेत.’’