शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आधी कलाकृतींचा आस्वाद घ्या

By admin | Updated: April 10, 2017 02:45 IST

पडद्यावर हलणारी चित्रे आणि त्या अनुषंगाने उलगडणारी गोष्ट, यापलीकडे जाऊन चित्रपट पाहिला जात नाही

पुणे : पडद्यावर हलणारी चित्रे आणि त्या अनुषंगाने उलगडणारी गोष्ट, यापलीकडे जाऊन चित्रपट पाहिला जात नाही. तसेच कलाकृती आस्वाद न घेताच त्यावर टिप्पणी केली जाते, अशी खंत व्यक्त करीत ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी कलाकृती न पाहून स्वत:ला त्यापासून वंचित ठेवतोय का? हा विचार करून आधी कलाकृतीचा आस्वाद घ्या, असे आवाहन केले. व्यंकटेश माडगूळकर प्रतिष्ठान, आशय फिल्म क्लब आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीने माडगूळकर यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त आयोजित मराठी चित्रपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्वस्त ज्ञानदा नाईक, अभिनेत्री अधिश्री अत्रे आदी उपस्थित होते. ‘बनगरवाडी’ या माडगूळकर यांची कथा-पटकथा असलेल्या चित्रपटाने महोत्सवाची सांगता झाली.पालेकर यांनी ‘बनगरवाडी’ या चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया उलगडत माडगूळकर यांच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, ‘‘बनगरवाडीच्या रूपाने दिग्गजांनी नाकारलेली मुलगी माझ्या पदरात आली होती. त्यामुळे ही कलाकृती पडद्यावर उभी करण्याचे मोठे दडपण मनावर होते. पण पटकथालेखन करत असताना तात्यांच्या सान्निध्यात राहण्याचा योग आला. कलावंत, एक व्यावसायिक म्हणून आपल्या कलाकृतीकडे अलिप्तपणे पाहून त्यातील चुका स्वीकारण्याचे भान त्यांना होते. ही कलाकृती साकारत असताना त्यांनी कधीही मानपान, रुसवे आणले नाहीत, याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. गुणगुणत, एकाग्र होऊन लेखनाची त्यांची प्रक्रिया मनाला खूप भावली.’’ज्ञानदा नाईक यांनी या वेळी तात्यांच्या आठवणींंना उजाळा दिला. शुभांगी दामले यांनी सूत्रसंचालन केले, तर मोहन माडगूळकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)इतिहासात नोंद व्हावीतात्यांच्या लेखनाचा तसेच विविध कलागुणांचा ठेवा स्मृतिरंजनापुरता मर्यादित न ठेवता त्याची इतिहासात कुठेतरी नोंद झाली पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. सांस्कृतिक इतिहास जतन करणे महत्त्वाचे असते; पण हे आपण करीत नाही. तात्यांच्या आठवणी जागविण्यासाठी हे खूप मोलाचे ठरेल, अशी अपेक्षाही पालेकर यांनी व्यक्त केली.सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘‘लग्न होऊन आल्यानंतर आयकर रस्त्यावरील ‘अक्षर’ बंगला मला नेहमी खुणावत असे. त्यानंतर तात्यांच्या कुटुंबीयांशी स्नेह वाढत गेला. तात्यांनी म्हटल्याप्रमाणे, फुरसतीच्या जरतारी क्षणातूनच सृजनशील साहित्याचा जन्म होतो. हे क्षण जपून ठेवायला हवेत.’’