शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कारगील युद्धातील सेनानी देशाचे प्रेरणास्त्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘‘कारगिल युद्धातील अनुभवी सेनानी देशासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत,’’ असे प्रतिपादन लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘‘कारगिल युद्धातील अनुभवी सेनानी देशासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत,’’ असे प्रतिपादन लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नेन यांनी केले. पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे सोमवारी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना जे. एस. नैन यांनी श्रद्धांजली वाहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विजयोत्सवाचे यंदाचे हे २२ वे वर्ष आहे.

कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत व पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला आॅपरेशन विजय नाव दिले होते. कारगिल युद्धाला सोमवारी २२ वर्षे पूर्ण झाली. भारतीय लष्कराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा ‘कारगिल विजय दिवस’

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे सोमवारी साजरा करण्यात आला. राष्ट्रीय यद्ध स्मारक येथे सकाळी लष्करातील वरिष्ठ अधिकारी, निवृत्त सैनिक उपस्थित होते. याप्रसंगी पुण्यातील सर्वात ज्येष्ठ सेनानी, मेजर जनरल हुक्कुर ए.के. (निवृत्त) यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

लेफ्टनंट जनरलर जे. एस. नैन म्हणाले, या युद्धातील शहिदांचा तसेच सहभागी झालेल्या वीर जवानांचा सर्वोच्च त्याग आणि देशसेवा कधीच विसरता येणार नाही. या या वीर योद्धांनी आखून दिलेल्या मार्गावरून भारतीय सेना मोठ्या ताकदीने योग्य दिशेने प्रगती करत आहे. भारतीय सैन्यदल देशासेवेप्रती संपूर्णतः कटिबद्ध आहे. भविष्यातील कोणत्याही संभाव्य घटनेला तोंड देण्यासाठी भारतीय सशस्त्रदल सुसज्ज आहे, अशी खात्री त्यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय युध्द स्मारक येथे उपस्थित असलेल्या सर्व निवृत्त सेनानींचा जे. एस. नैन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

चौकट

कारगिल विजय दिनानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारीतील सर्व लष्करी ठाण्यांवर आठवडाभर अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले. यामध्ये विविध सोहोळ्यात, शौर्य पुरस्कार विजेते, सेनेतील माजी अधिकारी आणि वीरनारी यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

------------------

चौकट

भारतीय जवानांनी दाखवला सर्वोच्च पराक्रम

६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या कारगिल युद्धामध्ये भारताचे ५२७

जवान शहीद झाले. १९६५ व १९७१ पेक्षा या युद्धाचे स्वरूप वेगळे होते. या दोन्ही

युद्धांमध्ये भारतीय सैन्य सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत घुसले होते. पण

कारगिल युद्धाच्या वेळी भारताने आपल्या हद्दीत राहून पाकिस्तानी सैन्याने

बळकावलेली ठाणी व भूप्रदेश पुन्हा ताब्यात घेतला. कारगिल युद्धामध्ये भारतीय

जवानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता सर्वोच्च पराक्रम दाखवला. ज्यामुळे शत्रू

फक्त चीत झाला नाही, तर त्याला तिथून पळ काढावा लागला होता.

फोटो : राष्ट्रीय युद्धस्मारक येथे कारगील युद्धातील शहिदांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहतांना दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन