शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांची पसंती ऊस पिकाला

By admin | Updated: July 8, 2015 01:33 IST

सध्या साखरेचे दर कोसळले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर मिळाला आहे. आगामी हंगामात टनाला १५०० रूपयेच दर मिळण्याची परीस्थती निर्माण झाली आहे.

सोमेश्वरनगर : सध्या साखरेचे दर कोसळले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर मिळाला आहे. आगामी हंगामात टनाला १५०० रूपयेच दर मिळण्याची परीस्थती निर्माण झाली आहे. मात्र तरीही शेतकऱ्याची ऊस पिकाकडून इतर पिकाकडे वळण्याची मानसिकता बदलत नाही. सध्या ऊसलागवड हंगाम सुरू आहे. जिल्हयातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील अडसाली ऊस लागवड एक लाख एकरांहूनही जादा होण्याची चिन्हे दिसत आहेत. साखरेचे घसरलेले दर, देशाच्या गरजेपेक्षा दरवर्षी तयार होणारी जादा साखर यामुळे राज्यातील साखर कारखानदारी ‘शॉर्ट मार्जीण’मध्ये गेली आहे. साखर कारखान्यांबरोबरच आता ऊसउत्पादक शेतकरी ही शॉर्ट मार्जीणमध्ये गेल्याने ऊस पिक शेतकऱ्यांसाठी बेभरवशाचे झाले असले आहे. मात्र मजुरांच्या तुटवडयामुळे शेतकरी ऊस पिक सोडून इतर पिकांकडे वळण्याचे नाव घेत नाही. यावर्षी साखर कारखान्यांनी सन २०१५— १६ चा ऊस लागवड हंगाम बुधवार पासून (दि. १ जुलै)जाहीर केला आहे. जिल्हयात सुमारे एक लाख एकरांपेक्षाही जादा ऊस लागवड होण्याची चिन्हे आहेत.एकीकडे ऊसाला दर नाही. तर दुसरीकडे शेतीला होण्याऱ्या खर्चात काही फरक पडला नाही. नांगरट, सरी, ऊसलागवड, व रासायनिक खते आदी चे दर कमी होण्यापेक्षा दिवसेदिवस वाढतच आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एकीकडे शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे.तर दूसरीकडे ही ऊसाची एकरी सरासरी पडली आहे. राज्यातील अनेक कारखान्यांची एकरी सरासरी ४० ते ४२ टनाच्या आसपास आहे. त्यामुळे ऊसाला कमी मिळणारा दर लक्षात घेता आता कमी खर्चात ऊसशेती करण्याची गरज आहे. यासाठी योग्य बेणे निवड करणे गरजेचे आहे. हे करत असताना ऊसाचे एकरी टनांची सरासरी कशी वाढेल हे पाहणे आवश्यक आहे. तसेच राज्यातील ऊसउत्पादकांना अजून त्यांची ऊसाची एफआरपी मिळाली नाही. त्यामुळे सद्या शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. (वार्ताहर)