शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

शेतकऱ्यांची पसंती ऊस पिकाला

By admin | Updated: July 8, 2015 01:33 IST

सध्या साखरेचे दर कोसळले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर मिळाला आहे. आगामी हंगामात टनाला १५०० रूपयेच दर मिळण्याची परीस्थती निर्माण झाली आहे.

सोमेश्वरनगर : सध्या साखरेचे दर कोसळले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर मिळाला आहे. आगामी हंगामात टनाला १५०० रूपयेच दर मिळण्याची परीस्थती निर्माण झाली आहे. मात्र तरीही शेतकऱ्याची ऊस पिकाकडून इतर पिकाकडे वळण्याची मानसिकता बदलत नाही. सध्या ऊसलागवड हंगाम सुरू आहे. जिल्हयातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील अडसाली ऊस लागवड एक लाख एकरांहूनही जादा होण्याची चिन्हे दिसत आहेत. साखरेचे घसरलेले दर, देशाच्या गरजेपेक्षा दरवर्षी तयार होणारी जादा साखर यामुळे राज्यातील साखर कारखानदारी ‘शॉर्ट मार्जीण’मध्ये गेली आहे. साखर कारखान्यांबरोबरच आता ऊसउत्पादक शेतकरी ही शॉर्ट मार्जीणमध्ये गेल्याने ऊस पिक शेतकऱ्यांसाठी बेभरवशाचे झाले असले आहे. मात्र मजुरांच्या तुटवडयामुळे शेतकरी ऊस पिक सोडून इतर पिकांकडे वळण्याचे नाव घेत नाही. यावर्षी साखर कारखान्यांनी सन २०१५— १६ चा ऊस लागवड हंगाम बुधवार पासून (दि. १ जुलै)जाहीर केला आहे. जिल्हयात सुमारे एक लाख एकरांपेक्षाही जादा ऊस लागवड होण्याची चिन्हे आहेत.एकीकडे ऊसाला दर नाही. तर दुसरीकडे शेतीला होण्याऱ्या खर्चात काही फरक पडला नाही. नांगरट, सरी, ऊसलागवड, व रासायनिक खते आदी चे दर कमी होण्यापेक्षा दिवसेदिवस वाढतच आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एकीकडे शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे.तर दूसरीकडे ही ऊसाची एकरी सरासरी पडली आहे. राज्यातील अनेक कारखान्यांची एकरी सरासरी ४० ते ४२ टनाच्या आसपास आहे. त्यामुळे ऊसाला कमी मिळणारा दर लक्षात घेता आता कमी खर्चात ऊसशेती करण्याची गरज आहे. यासाठी योग्य बेणे निवड करणे गरजेचे आहे. हे करत असताना ऊसाचे एकरी टनांची सरासरी कशी वाढेल हे पाहणे आवश्यक आहे. तसेच राज्यातील ऊसउत्पादकांना अजून त्यांची ऊसाची एफआरपी मिळाली नाही. त्यामुळे सद्या शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. (वार्ताहर)